AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजूबाबाची पहिल्या बायकोच्या निधनानंतर कशी झालेली अवस्था? अनेक वर्षांनंतर अभिनेत्याच्या बहिणीने सोडलं मौन

Sanjay Dutt first Wife Richa Sharma : वयाच्या 32 व्या वर्षी संजूबाबाच्या पहिल्या बायकोने घेतला अखेरचा श्वास, तिच्या निधनानंतर कशी झालेली अभिनेत्याची अवस्था? अनेक वर्षांनंतर अभिनेत्याच्या बहिणीने सोडलं मौन... चर्चांना उधाण

संजूबाबाची पहिल्या बायकोच्या निधनानंतर कशी झालेली अवस्था? अनेक वर्षांनंतर अभिनेत्याच्या बहिणीने सोडलं मौन
| Updated on: Apr 25, 2025 | 12:19 PM
Share

Sanjay Dutt first Wife Richa Sharma: बॉलिवूड अभिनेत्री संजय दत्त त्याच्या सिनेमांमुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. संजूबाबाने अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं. खासगी आयुष्यात संजूबाबाला अनेक संकटांचा सामना कराला लागला, ज्याचा परिणाम अभिनेत्याच्या प्रोफेशनल आयुष्यावर देखील झाला. संजूबाबावर दुःखाचा डोंगर कोसळला जेव्हा त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा हिचा वयाच्या 32 व्या वर्षी मृत्यू झाला. पहिल्या पत्नीच्यान निधनानंतर संजूबाबा पूर्णपणे कोलमडला होता. नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्याची बहीण प्रिया दत्त हिने ऋचाच्या निधनाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

प्रिया दत्त म्हणाल्या, ‘ऋचाच्या निधनानंतर संजय पूर्णपणे एकटा पडला होता. तो प्रचंड दुःखी होता. फार कमी वयात ऋचा हिला ब्रेन ट्यूमरचं निदान झालं होतं. ऋचाचं निधन संजयसाठी फार मोठा फटका होता. पण त्याने स्वतःला सावरलं. जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या समस्या पाहत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या समस्या फार मोठ्या वाटतात… देवाच्या कृपाने संजयने सर्व संकटांवर मात केली. आम्ही सर्वांत चांगले आणि वाईट क्षण देखील अनुभवले आहेत. संजय दत्त कायम वाईट परिस्थितींवर स्वतःच्या अंदाजात मात करतो.’ असं देखील प्रिया दत्त म्हणाल्या.

संजय दत्त याच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, संजय आणि ऋचा यांनी 1987 मध्ये अमेरिकेत लग्न केलं. लग्नानंतर दोघांनी लेक त्रिशाला हिचं देखील जगात स्वागत केलं. पण लग्नाच्या 2 वर्षांनंतर ऋचा हिला ब्रेन ट्यूमरचं निदान झालं आणि न्यूयॉर्कमध्ये तिचं निधन झालं.

पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर संजूबाबाने दुसरं लग्न रिया पिल्लाई (rhea pillai) हिच्यासोबत केलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजयने व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत रियाला प्रपोज केलं आणि 1998 मध्ये लग्न केलं. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही.

दोन लग्न अपयशी ठरल्यानंतर संजूबाबाने तिसरं लग्न मान्यता हिच्यासोबत केलं. 2008 मध्ये मान्यता आणि संजय दत्त यांनी लग्न केलं. लग्नानंतर मान्यता हिने जुळ्या मुलांना देखील जन्म दिला. संजूबाबाच्या मुलाचं नाव शाहरान आणि मुलीचं नाव इकरा असं आहे.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.