AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahid Kapoor | ‘कबीर सिंग’मध्ये प्रितीच्या कानाखाली मारणं कितपत योग्य? शाहिद कपूरने दिलेलं उत्तर चर्चेत

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'कबीर सिंग' या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगाने केलं होतं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. जगभरात या चित्रपटाने जवळपास 350 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

Shahid Kapoor | 'कबीर सिंग'मध्ये प्रितीच्या कानाखाली मारणं कितपत योग्य? शाहिद कपूरने दिलेलं उत्तर चर्चेत
Kabir SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 09, 2023 | 11:46 AM
Share

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर हा बॉलिवूडमधल्या दमदार अभिनेत्यांमध्ये गणला जातो. नुकताच तो ‘ब्लडी डॅडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक झालं. शाहिदने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अशा बऱ्याच दमदार भूमिका साकारल्या आहेत. ज्यामध्ये ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं जातं. कियारा अडवाणीसोबतचा त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या दोघांच्या नव्या जोडीलाही चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. मात्र यातील एका सीनवरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. या सीनमध्ये कबीर त्याच्या गर्लफ्रेंडच्या म्हणजेच प्रितीच्या कानाखाली मारतो. मुलीवर हात उचलल्याच्या या सीनवरून अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यावर आता शाहिदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.

‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत शाहिद म्हणाला, “ही एक अत्यंत साधी मुलगी आणि हुशार, आक्रमक, अस्वस्थ मुलाची प्रेमकहाणी होती. अशा गोष्टी रोजच्या जीवनात घडतच असतात. देवदासचं उदाहरण द्यायचं झाल्यास, प्रत्येक नायक हा चांगला माणूसच असेल असं नाही. देवदास जसं पारोचं शारीरिक शोषण करत होता, तसा तो खरा व्यक्ती नव्हता. मीसुद्धा माझ्या लहानपणा शारीरिक शोषण होताना पाहिलंय. देवदास हा उत्तम चित्रपट आहे. पण त्याचप्रमाणे कबीर सिंगच्या व्यक्तिरेखेकडे मी हिरो किंवा अँटी-हिरो म्हणन पाहत नाही. मी त्याच्याकडे चित्रपटाचा नायक म्हणून पाहतो. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की प्रेमात आपल्याकडून कधीच कोणती चूक झाली नाही का? आपण सर्वजण परफेक्ट व्यक्ती आहोत का?”

कबीर सिंगच्या पात्राविषयी तो पुढे म्हणाला, “प्रत्येकजण दुसऱ्या संधीस पात्र आहे, मग ती व्यक्ती कितीही वाईट का असेना. जर तुम्ही म्हणत असाल की हा माणूस चांगला आहे आणि त्याने आजपर्यंत सर्वकाही चांगलंच केलं. तर असं कोणीही म्हणत नाही. तुम्ही प्रोमो पाहिला असेल तर त्यात असंच म्हटलं गेलंय की तो अस्वस्थ आहे. तो स्वत: एक समस्या आहे. रागावर नियंत्रण न ठेवण्याची मोठी समस्या त्याला आहे. त्याला समाज स्वीकारू शकत नाही आणि तो स्वत: विनाशकारी आहे. प्रोमोच्या सुरुवातीलाच आम्ही हे स्पष्ट केलंय की हा चित्रपट अशा प्रकारच्या पात्रावर आधारित आहे. कुठेच तो महान आहे असं म्हटलं नव्हतं. पण मला वाटतं काही लोकांना तो चुकीचा किंवा बरोबर वाटू शकतो. जीवनात सर्व प्रकारच्या गोष्टी घडतात आणि आपण त्या पडद्यावर दाखवू शकतो.”

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगाने केलं होतं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. जगभरात या चित्रपटाने जवळपास 350 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.