AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान – ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपचं कारण समोर, सोहैल खानकडून मोठा खुलासा

Salman Khan - Aishwarya Rai: लग्नापर्यंत येवून पोहोचलेलं सलमान - ऐश्वर्या यांचं नातं का तुटलं? भाईजानचा भाऊ सोहैल खान याच्याकडून अखेर सत्य समोर, आजही चाहते विसरू शकले नाहीत सलमान खान - ऐश्वर्या राय यांच्या जोडील...

सलमान खान - ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपचं कारण समोर, सोहैल खानकडून मोठा खुलासा
| Updated on: Jul 29, 2024 | 12:01 PM
Share

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांनी 90 च्या दशकात एकमेकांना डेट केलं. चाहत्यांनी देखील सलमान – ऐश्वर्या या जोडीला प्रचंड प्रेम दिलं. सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याची सुरुवात दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके’ सिनेमातून झाली. जवळपास 6 वर्ष ऐश्वर्या – सलमान यांनी एकमेकांना डेट केलं. दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. पण सलमान – ऐश्वर्या यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. 2001 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. सलमान – ऐश्वर्या यांच्या ब्रेकअपनंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आणि दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगू लागल्या…

ऐश्वर्या राय हिने सांगितलं होतं ब्रेकअपचं कारण

जेव्हा सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागल्या तेव्हा खुद्द अभिनेत्रीने घडलेला प्रकार चाहत्यांना सांगितला होता. एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्या राय हिने सलमान खान याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला होता. अभिनेत्रीने सलमानवर अनेक गंभीर आरोप लावले होते.

ऐश्वर्या राय म्हणाली होती, ‘सलमान खान याच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे अनेक अडचणींचा सामना केला आहे. शाब्दिक, शारीरिक आणि भावनिक अत्याचार, फसवणूक आणि अपमानाचा सामना करावा लागला.’ याच कारणामुळे ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यासोबत असलेले सर्व संबंध संपवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, ऐश्वर्या राय हिने सलमान खान याच्याबद्दल वाईट वक्तव्य केल्यामुळे सोहैल खान याने अभिनेत्रीवर निशाणा साधला होता. सलमान सोबत असलेलं नातं ऐश्वर्याने कधीच मान्य केलं नव्हतं… असं म्हणत सोहैल म्हणाला, ‘ऐश्वर्या कायम घरी यायची आणि कुटुंबियांसोबत आनंदाने राहायची. पण तिने कधीच सलमान सोबत असलेल्या नात्याचा स्वीकार केला नाही.’

‘आता ऐश्वर्या सर्वांसमोर रडत असते. जेव्हा सलमानसोबत फिरत होती, सलमानसोबत कायम घरी यायची, एखाद्या सदस्याप्रमाणे कुटुंबियांसोबत राहात होती. पण कधीच सलमान सोबत असलेल्या नात्याचा स्वीकार केला आहे. त्यामुळे सलमानला असुरक्षित वाटत होतं. त्याला जाणून घ्यायचं होतं, ऐश्वर्याच्या मनात नक्की काय होतं.’ असं सोहैल खान म्हणाला होता.

Follow Us
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.