“तो खूपच अस्वस्थ..”; सुशांत सिंह राजपूतविषयी ‘केदारनाथ’च्या दिग्दर्शकाचा खुलासा

| Updated on: Mar 05, 2024 | 3:24 PM

सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेला 'केदारनाथ' हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी सुशांतची मानसिक अवस्था कशी होती, याचा खुलासा दिग्दर्शक अभिषेक कपूरने सहा वर्षांनंतर केला आहे.

तो खूपच अस्वस्थ..; सुशांत सिंह राजपूतविषयी केदारनाथच्या दिग्दर्शकाचा खुलासा
Sushant Singh Rajput
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 5 मार्च 2024 | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ‘केदारनाथ’ आणि ‘काय पो चे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला दिग्दर्शक अभिषेक कपूर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. केदारनाथच्या शूटिंगदरम्यान सुशांत फार अस्वस्थ होता असं त्याने सांगितलं. 14 जून 2020 रोजी सुशांत वांद्रे इथल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. सुशांतने आत्महत्या केल्याची नोंद सुरुवातीला मुंबई पोलिसांनी केली होती. मात्र सर्वच स्तरांतून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर याप्रकरणी मोठ्या तपासाला सुरुवात झाली.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने ‘काय पो चे’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला. “ऑडिशनच्या वेळी सुशांतचं वजन खूप जास्त होतं. मी त्याला एका अमेरिकी अभिनेत्याला फोटो दाखवला आणि त्याच्यासारखं दिसण्यास सांगितलं होतं. कारण त्याला एका क्रिकेटरची भूमिका साकारायची होती. त्यावेळी तो फार काही बोलला नाही. कारण तो तसा मितभाषीच होता. पण पुढील तीन महिन्यात त्याने स्वत:वर खूप मेहनत घेतली. तो सकाळी सहा वाजता क्रिकेटच्या सरावासाठी आणि जिम ट्रेनिंगसाठी यायचा”, असं त्याने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

सुशांतशी खास कनेक्शन जोडलं गेल्याने त्याला ‘फितूर’ चित्रपटातही भूमिका द्यायचा विचार अभिषेकने केला होता. मात्र तसं होऊ न शकल्याने ‘केदारनाथ’साठी त्याने सुशांतला साइन केलं होतं. “केदारनाथ या चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलसाठी सारा आणि सुशांतने अत्यंत थंड वातावरणात शूटिंग केलं होतं. त्यांना रात्रभर पावसाचा सीन शूट करायचा होता. अत्यंत थंडीत रात्रभर भिजत सुशांतने शूटिंग पूर्ण केलं होतं. कामाप्रती असलेली त्याची मेहनत पाहून सारासुद्धा प्रभावित झाली होती,” असं अभिषेक पुढे म्हणाला.

“सुशांतने त्याची सुरुवात केली होती. त्याने पूर्णपणे भिजून शूटिंग करण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी सारासुद्धा त्याच्याकडे पाहून पूर्ण मेहनतीने काम करू लागली होती. सुशांतमुळे तिने चित्रपटासाठी अधिक मेहनत घेतली होती. पण सुशांत त्या दिवसांत अस्वस्थ होता. तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तसा खूप स्ट्राँग होता. पण मनातल्या मनात कोणती तरी गोष्ट त्याला सतावत होती. तो स्वत:ला सर्वांपासून दूर नेत होता “, असा खुलासा अभिषेकने केला.