AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जब एक प्रतिमा ढहती है तो..; शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी स्वानंद किरकिरेंची मार्मिक पोस्ट

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याप्रकरणी विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. प्रसिद्ध लेखक, गीतकार आणि गायक स्वानंद किरकिरे यांनीसुद्धा घटनेवर पोस्ट लिहिली आहे.

जब एक प्रतिमा ढहती है तो..; शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी स्वानंद किरकिरेंची मार्मिक पोस्ट
स्वानंद किरकरेंची पोस्टImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 29, 2024 | 1:09 PM
Share

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फूट उंच पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कोसळला. वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे हा पुतळा कोसळल्याचा दावा राज्य शासनाने केला आहे. या घटनेनंतर राज्यभरात शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. इतकंच नव्हे तर पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून राजकारण रंगात आलं असून बुधवारी किल्ल्यावर त्याचे प्रतिबिंब उमटले. या घटनेवरून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच प्रसिद्ध गीतकार, गायक आणि लेखक स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

स्वानंद किरकिरे यांची पोस्ट-

‘जब एक प्रतिमा ढहती है, तो कई और प्रतिमाएँ ढह जाती हैं.. लोगों के दिलों में,’ (जेव्हा एखादी प्रतिमा ढासळते, तेव्हा लोकांच्या मनात इतरही अनेकांच्या प्रतिमा ढासळतात) असं त्यांनी लिहिलंय.

नौदल दिनानिमित्त गेल्या वर्षी 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. या पुतळ्याची उभारणी नौदलामार्फत करण्यात आली होती, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं. ताशी 45 किमी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं, असं त्यांनी सांगितलंय. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजप नेते नारायण राणे बुधवारी राजकोट किल्ल्यावर एकाच वेळी पोहोचले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची आणि दगडफेक झाली. यात दोन महिला पोलीस आणि काही कार्यकर्ते जखमी झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दु:खद आहे. नौदल याबाबत चौकशी करत असून त्या घटनेवरून राजकारण करू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. “नौदलाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे. ते चौकशी करून उचित कारवाई करतील. प्रत्येक गोष्टीतून राजकारण शोधून काढायचं. त्याकडे निवडणुकीच्या चष्म्यातून पाहायचं हे चुकीचं आहे”, असंही ते म्हणाले. शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून रविवारी 1 सप्टेंबर रोजी मुंबईत ‘जोडे मारा’ आंदोलनाची घोषणा केली आहे. मालवणमधील हाणामारीच्या घटनेनंतर विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत.

Follow Us
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.