AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : सराव सामन्यातील विजयानंतर टीम इंडिया दूर करतेय उणीवा, श्रीलंकेत घेतला असा निर्णय

भारत आणि श्रीलंका कसोटी मालिकेचं महत्त्व माहिती असल्याने सर्वांचा नजरा खिळल्या आहे. दोन्ही संघांना वर्ल्ड चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. सराव सामन्यात भारताने बाजी मारली. पण असं असूनही टीम इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

IND vs SL : सराव सामन्यातील विजयानंतर टीम इंडिया दूर करतेय उणीवा, श्रीलंकेत घेतला असा निर्णय
IND vs SL : सराव सामन्यातील विजयानंतर टीम इंडिया़ दूर करतेय उणीवा, श्रीलंकेत घेतला असा निर्णयImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 10, 2026 | 2:40 PM
Share

IND vs SL Test Series: भारत श्रीलंका कसोटी मालिकेला 15 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय संघ पास झाला आहे. पण मालिकेत खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघाने आराम करण्याऐवजी सराव सुरू ठेवण्यावर भर दिला आहे. सराव सामना संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी टीम इंडिया कामाला लागली आहे. सरावादरम्यान टीम इंडियाने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला. मालिकेदरम्यान वर्कलोडकडे लक्ष ठेवून संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाजांना आराम देण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांना आराम दिला गेला आहे. पण युवा वेगवान गोलंदाज आकिब नबीला मात्र सराव करण्यास भाग पाडलं. सरावादरम्यान आकिब नबी हा एकमेव गोलंदाज गोलंदाजी करत होता.

आकिब नबीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं कठीण!

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी आकिब नबीची वर्णी लागली आहे. आता त्याला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळेल की नाही हे सांगणं कठीण आहे. दुसरीकडे, त्याला वॉर्मअप सामन्यात सर्वात कमी गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. पहिल्या डावात तर त्याने एकही चेंडू टाकला नाही. दुसऱ्या डावात त्याला संधी मिळाली, पण फक्त 5 षटकं टाकली. त्यात त्याला एकही विकेट मिळाला नाही. त्यामुळे त्याचा पहिल्या सामन्यात प्लेइंग 11 साठी फार काही विचार केला जात नाही. पण एक बॅकअप प्लान म्हणून संघ व्यवस्थापन त्याच्याकडून नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करून घेत आहेत.

सरफराज खान कसोटीसाठी सज्ज

सरफराज खानला पुन्हा एकदा टीम इंडियात जागा मिळाली आहे. साई सुदर्शन जखमी असल्याने त्याच्या जागी सरफराजला संधी दिली आहे. सरफराज खान शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर 2024 मध्ये खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत दीड वर्षांच्या कालावधी लोटला आणि आता कुठे संधी मिळाली. या संधींचं सोनं करण्यासाठी सरावात घाम गाळत आहे. सरफराज खानला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. आता संधी मिळाल्यानंतर काय करतो याकडे लक्ष असेल. या मालिकेत जर फेल गेला तर त्याला टीम इंडियात पुन्हा संधी मिळणं खूप कठीण होईल.

Follow Us
मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
Pratap Sarnaik | मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक?
MNS | राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक; भांडूपच्या राजकारणात नवं समीकरण?
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! शरद पवारांबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी? अमोल कोल्हेंनी सगळंच सांगितलं
चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर....
Mumbai Local News | चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; लोकल उशिराने
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल...
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल, पण... नेमकं काय म्हणाले बाबासाहेब पाटील?
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा..
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या?
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळेंची खासदारांसह पंतप्रधानांच्या भेट
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर
बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही...
Chandrashekhar Bawankule | कुणबी प्रमाणपत्रावरून मोठा ट्विस्ट! बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही; अधिकाऱ्याचं पत्र आलं समोर
अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
Manoj Jarange VS Chandrashekhar Bawankule | अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; बावनकुळेंवरही जोरदार हल्लाबोल
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं थेट विधान
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले...