AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup जिंकल्यानंतर विराटचा अनुष्काला व्हिडीओ कॉल; भरभरून प्रेमाचा वर्षाव

या विजयानंतर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या यांच्यासह प्रशिक्षक राहुल द्रविड यांना अश्रू अनावर झाले. सध्या देशभरातून टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींनीही खास पोस्ट लिहिल्या आहेत.

T20 World Cup जिंकल्यानंतर विराटचा अनुष्काला व्हिडीओ कॉल; भरभरून प्रेमाचा वर्षाव
विराट कोहलीImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 30, 2024 | 1:39 PM
Share

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या दमदार यशानंतर प्रत्येक भारतीय खुश आहे. देशभरात ढोल-ताशे वाजत आहेत. विजयानंतर रात्री उशिरापर्यंत अनेकांनी जल्लोष साजरा केला. वर्ल्ड कपवर भारताचं नाव कोरल्यानंतर क्रिकेटच्या मैदानातील काही खास क्षण कॅमेरामध्ये टिपण्यात आले आहेत. यातील एक व्हिडीओ विराट कोहलीचा असून तो वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद त्याच्या कुटुंबीयांसोबत शेअर करताना दिसत आहे. वर्ल्ड कपचा अंतिम सामना बार्बाडोसमध्ये पार पडला. यावेळी विराटची पत्नी अनुष्का शर्मा तिथे उपस्थित नव्हती. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणानंतर विराटने सर्वांत आधी अनुष्काला व्हिडीओ कॉल केला. यावेळी तो मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांच्याही बोलताना दिसला. सोशल मीडियावर विराटचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.

व्हिडीओ कॉलवर बोलताना विराटच्या चेहऱ्यावरील आनंद सहज पहायला मिळतोय. फोनवर बोलताना तो फ्लाइंग किस देतानाही दिसतोय. तर चिमुकल्या अकायशी बोलताना हो आनंदाने हातवारे करताना दिसतोय. मॅचनंतर विराट नेहमीच त्याच्या कुटुंबीयांसोबत आनंद साजरा करताना दिसतो. यावेळीही त्याने थेट मैदानातून पत्नीला व्हिडीओ कॉल केला. विराटचा हाच अंदाज चाहत्यांना खूप आवडतो. टीम इंडियाच्या विजयानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा आणि भावनिक पोस्ट्सचा वर्षाव होऊ लागला. अनुष्कानेही विराटसाठी सोशल मीडियावर अत्यंत खास पोस्ट लिहिली आहे. ‘सर्व खेळाडूंना टीव्हीवर रडताना पाहिल्यानंतर माझ्या मुलीची सर्वांत मोठी चिंता हीच होती की त्या सर्वांना मिठी मारण्यासाठी कोणीतरी असेल का? तर होय.. त्यांना 1.5 अब्ज लोकांनी मिठी मारली. अत्यंत अभूतपूर्व विजय आणि महान कामगिरी. चॅम्पियन्सचं अभिनंदन’, असं तिने लिहिलंय.

पहा व्हिडीओ-

बार्बाडोसमध्ये शनिवारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत टीम इंडियाने टी-20 प्रकारातील दुसरं जगज्जेतेपद पटकावलं. रोहित शर्माचं नेतृत्व, जसप्रीत बुमराची भेदक गोलंदाजी, हार्दिक पांड्या – सूर्यकुमार यादव – अक्षर पटेल – अर्शदीपसारख्या गुणी क्रिकेटपटूंचं योगदान, विराट कोहलीची मोक्याच्या क्षणी केलेली खेळी.. या सर्व घटकांमुळे हा विजय मिळवणं शक्य झालं. भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांना यापेक्षा मोलाची निरोपाची भेट मिळणार नव्हती.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा