AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘प्रेम संपतं असं…” विजय वर्मासोबत ब्रेकअपच्या चर्चांनंतर तमन्ना भाटीया पहिल्यांदाच थेट बोलली

तमन्ना भाटीया आणि विजय वर्मा यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनंतर तमन्नाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तिने प्रेम आणि नातेसंबंध यावर ती थेटच बोलली आहे. प्रेम का संपत याबद्दल तिने मोकळेपणाने सांगितलं आहे. दरम्यान त्यांच्या नात्याच्या अचानक झालेला शेवट हा चाहत्यांसाठीही मोठा धक्काच आहे.

'प्रेम संपतं असं... विजय वर्मासोबत ब्रेकअपच्या चर्चांनंतर तमन्ना भाटीया पहिल्यांदाच थेट बोलली
| Updated on: Mar 08, 2025 | 10:18 AM
Share

Tamanna Bhatia And Vijay Varma Break Up: तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या ब्रेकअपची गेल्या दोन-तीन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. दोघांनीही 2022 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. चाहत्यांना दोघांमधील सुंदर केमिस्ट्री देखील आवडली. नातं उघड केल्यानंतर दोघेही कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसायचे. ही लोकप्रिय जोडी लवकरच लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात होतं.

प्रेमाबद्दल तमन्ना भाटीयाचं महत्त्वाचं विधान

पण मग दोघांमध्ये असं काय झालं की, त्यांनी नाते संपवण्याचा निर्णय घेतला? त्यांच्या ब्रेकअपची बातमी आल्यापासून लोकांच्या मनात हाच प्रश्न घोळत आहे. दरम्याव यावर दोघांनी तेव्हा प्रतिक्रिया दिली नव्हती. पण ब्रेकअपच्या चर्चांनंतर पहिल्यांदाच अभिनेत्री तमन्ना भाटीयाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. तमन्ना भाटीयाने प्रेमाबद्दल काही महत्त्वाची विधानं केली आहेत.

“त्याच क्षणाला प्रेम संपतं…”

तमन्ना आणि विजय वर्मा यांचे ब्रेकअप झाल्याची फक्त चर्चा आहे. या दोघांनीही आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या दोघांनीही आपापल्या समाजमाध्यम खात्यावरील एकमेकांचे फोटो डिलीट केल्याचं सांगितलं जातंय. असे असताना तमान्ना भाटीयाने एका मुलाखतीत प्रेमाविषयी तिचं मतं मांडलं आहे. ती म्हणाली की, “मला प्रेमाबद्दल नुकत्याच काही नव्या गोष्टी समजल्या. लोक प्रेम आणि नातं यात गफलत करतात. हे फक्त स्त्री आणि पुरुष यांच्या नात्यासोबतच होत नाही. ते मित्रांमध्येही घडतं. जेव्हा प्रेमात अटी आणि नियम येतात त्याच क्षणाला प्रेम संपतं असं मला वाटतं. प्रेमात कोणत्याही अटी आणि नियम नसावेत असं मला वाटत,”अशी प्रतिक्रिया तमन्ना भाटीया यांनी दिली आहे.

“त्या व्यक्तीला बंधनातून मुक्त केल पाहिजे”

तसेच पुढे ती म्हणाली की, “दोन वेगवेगळ्या व्यक्ती एकमेकांवर प्रेम करत असतात. पण प्रेम हे एकतर्फी करायची गोष्ट आहे. तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीला बंधनातून मुक्त केल पाहिजे. तुम्ही तुमचे विचार त्या व्यक्तीवर थोपवून प्रेम करू शकत नाही. संबंधित व्यक्ती सध्या जशी आहे, त्यामुळेच तर तुम्ही प्रेमात पडता,” असंही मत तमन्ना भाटीयाने व्यक्त केलं आहे.

चाहत्यांची मोठी नाराजी

दरम्यान, तमन्ना आणि विजय वर्मा हे लस्ट स्टोरी वेबसिरीजच्या दुसऱ्या सिझनच्या शूटिंगदरम्यान एकमेकांजवळ आले. त्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. हीच मैत्री नंतर प्रेमात बदलली. एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी आपलं नातं जाहीर केलं आहे. रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर हे दोघे अनेकदा एकत्रही दिसले. विमानतळ, वेगवेगळ्या कार्यक्रमांत सोबत स्पॉटही झाले. आता मात्र ते वेगळे झाल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांची मोठी नाराजी झाली आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.