AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aai Kuthe Kay Karte| ‘आईचा मित्र कधी असूच शकत नाही!’, अभिषेकही जाणार अरुंधतीच्या विरोधात

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या एका नव्या वळणावर जात आहे. ही मालिका प्रचंड गाजते आहे. मालिकेचं भावनिक कथानक आणि एका आईची गगनभरारी असा आशय घेऊन पुढे चाललेली ही मालिका प्रेक्षकांना देखील प्रचंड भावते आहे.

Aai Kuthe Kay Karte| ‘आईचा मित्र कधी असूच शकत नाही!’, अभिषेकही जाणार अरुंधतीच्या विरोधात
Aai Kuthe Kay Karte
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 2:18 PM
Share

मुंबई : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या एका नव्या वळणावर जात आहे. ही मालिका प्रचंड गाजते आहे. मालिकेचं भावनिक कथानक आणि एका आईची गगनभरारी असा आशय घेऊन पुढे चाललेली ही मालिका प्रेक्षकांना देखील प्रचंड भावते आहे. मात्र, आता मालिकेत एक नवं वळण आलं आहे. घटस्फोट झाल्यानंतर आता आई अर्थात ‘अरुंधती’च्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. या व्यक्तीमुळे आता अरुंधतीचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे.

अभिनेता ओंकार गोवर्धन याची या मालिकेत एन्ट्री झाली आहे. ओंकार या मालिकेत अरुंधतीचा मित्र ‘आशुतोष केळकर’ म्हणून दिसतो आहे. अरुंधतीच्या महाविद्यालयीन जीवनातील हा मित्र पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात आला आहे. यासोबतच मालिकेत एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. आता आशुतोषच्या अरुंधतीच्या आयुष्यात येण्याने आता तिचं संपूर्ण कुटुंबं तिच्या विरोधात जाताना पाहायला मिळणार आहे.

अनिरुद्धचा जळफळाट

नुकतीच आशुतोषने अरुंधतीला त्याच्या अल्बममध्ये गाण्याची ऑफर दिली आहे. शिवाय अरुंधती ज्या संस्थेत काम करते ही संस्था आशुतोषची आई यांची आहे. त्यामुळे योगायोगाने अरुंधती आणि आशुतोषची सतत भेट होते. दरम्यान एका दिवशी अरुंधतीला कामावर उशीर झाल्याने आशुतोष अरुंधतीला घरी सोडण्यास जातो. याच वेळी अनिरुद्ध आणि संजना त्यांना पाहतात. यावरून अनिरुद्ध तिला काही बोल देखील लगावतो. मात्र, अरुंधती त्याला नजरंदाज करून तिथून निघून जाते.

आईचा मित्र असूच शकत नाही!

दुसऱ्या दिवशी अनिरुद्धची आई अरुंधतीला म्हणते की, आशुतोषचं सतत असं येणं बरं दिसत नाही. यावर अरुंधती आईंना उलट उत्तर देते की, गेली 13 वर्ष संजना अनिरुद्धची मैत्रीण म्हणून या घरात येत होती, तेव्हा कोणी असा प्रश्न केला नाही. यानंतर घरातील माहोल बदलतो. या वादात उडी घेत अभिषेक देखील अरुंधतीला म्हणतो की हे चुकीचं आहे, कारण आईचा मित्र असूच शकत नाही. अर्थात आता स्वतः मुलगा देखील आईच्या विरोधात जाताना दिसणार आहे. त्यामुळे आता घरात आई विरुद्ध मुलगा असा नवा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

पाहा नवा प्रोमो :

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अरुंधतीला मिळणार मोठी संधी

मालिकेत आता आशुतोष केळकर हा भारतात त्याची संगीत अकादमी सुरु करण्याची योजना आखत असल्याचे दाखवले गेले आहे. यानंतर आता तो हे संगीत अकादमी सुरु करून, त्यात अरुंधतीला नोकरी देऊ करेल किंवा तिचा या नव्या उद्योगात भागीदार करून घेईल. यामुळे अरुंधतीच्या आयुष्यात तिला आता नवीन संधी मिळणार आहे.

हेही वाचा :

Marathi Movie | कौतुकास्पद पाऊल, देशाच्या शेतकऱ्यांना समर्पित होणार मराठी चित्रपट ‘अजिंक्य’!

Hruta Durgule | लाखो दिलों की धडकन… ‘फुलपाखरू’ फेम हृता दुर्गुळे पडलीये प्रेमात, कोण आहे ‘हा’ खास व्यक्ती?

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.