AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ankita Lokhande: “विकीच्या जागी दुसरा कोणी असता तर..”, सुशांतच्या मृत्यूनंतरच्या काळाविषयी अंकिता झाली व्यक्त

अंकिता आणि सुशांतचं 2016 मध्ये ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर दोन वर्षांनी 2018 पासून ती विकीला डेट करू लागली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंकिता आणि विकीने लग्नगाठ बांधली.

Ankita Lokhande: विकीच्या जागी दुसरा कोणी असता तर.., सुशांतच्या मृत्यूनंतरच्या काळाविषयी अंकिता झाली व्यक्त
Sushant, Ankita and Vicky JainImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 06, 2022 | 3:26 PM
Share

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांनी ‘स्मार्ट जोडी’ या रिॲलिटी शोचं विजेतेपद पटकावलं. या शोमध्ये अंकिता-विकी त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने व्यक्त झाले. 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर आमच्या नात्यासमोर मोठं आव्हान उभं राहिल्याचं विकीने यावेळी सांगितलं. त्यावेळी एकीकडे अंकिताला ट्रोलिंगचा सामना करावा लागत होता, तर दुसरीकडे अंकिता आणि समोर असलेल्या परिस्थितीला कसं सामोरं जावं याबद्दल विकीसमोर बरेच प्रश्न होते. अंकिता आणि सुशांतचं 2016 मध्ये ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर दोन वर्षांनी 2018 पासून ती विकीला डेट करू लागली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंकिता आणि विकीने लग्नगाठ बांधली.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली, “सुशांतच्या निधनानंतर लोकांनी मला प्रचंड ट्रोल केलं. सुशांतसाठी अंकिता बेस्ट होती, तिने त्याच्यासोबत राहायला पाहिजे होतं, असं अनेकजण म्हणत होते. अनेकांनी विकीवर टीका केली आणि मला सोडून जाण्याचा सल्ला त्याला दिला. आपल्या होणाऱ्या पत्नीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल टेलिव्हिजनवर व्यक्त होणं कोणालाच आवडलं नसतं. कोणत्याही व्यक्तीसाठी हे पाहणं सोपं नसतं. त्यावेळी दररोज सुशांतविषयी काहीतरी नवी माहिती समोर यायची आणि मी सतत त्याच्याविषयी बोलत होती. विकीच्या जागी जर दुसरा कोणता पुरुष असता तर त्याने मला कधीच सोडलं असतं. पण त्याने माझी खूप साथ दिली. सुशांतसाठी जे चांगलं आहे ते तू कर, असं तो मला म्हणाला. विकीच्या कुटुंबीयांनीही माझी साथ दिली.”

इन्स्टा पोस्ट-

स्मार्ट जोडी हा शो स्टार प्लस वाहिनीवर फेब्रुवारीपासून सुरू झाला. अंकिता आणि विकीने डिसेंबरमध्ये लग्न झाल्यानंतर लगेचच या शोमध्ये भाग घेतला. या शोमध्ये टेलिव्हिजनवरील इतरही लोकप्रिय दाम्पत्यांनी भाग घेतला होता. त्यात अर्जुन बिजलानी-नेहा स्वामी, भाग्यश्री-हिमालय दासानी, नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा, नताल्या इलिना- राहुल महाजन, पल्लवी शुक्ला-अंकित तिवारी, मोनालिसा-विक्रांत सिंग यांचाही त्यात समावेश होता.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?