Bollywood actors: अभिनयातच नव्हेतर शिक्षणातही पुढे आहेत ‘हे’ बॉलीवूड कलाकार

आपल्या अभिनयाच्या जोरावर देशात आणि जगात ठसा उमटवणारे हे बॉलिवूड कलाकार अभ्यासातही खूप पुढे आहेत. अनेकांनी परदेशात आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

Bollywood actors: अभिनयातच नव्हेतर शिक्षणातही पुढे आहेत 'हे' बॉलीवूड कलाकार
Bollywood actors in EducationImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 4:43 PM

आपल्या अभिनयाच्या जोरावर देशात आणि जगात ठसा उमटवणारे हे बॉलिवूड (Bollywood)कलाकार अभ्यासातही खूप पुढे आहेत. अनेकांनी परदेशात आपले शिक्षणपूर्ण (Education)केला आहे. प्रीती झिंटा, सोहा अलीखान , जॉन अब्राहम, शाहरुख खान यासारख्या अनेक कलाकारांनी (actor) शिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण केले आहे.

प्रीती झिंटा

सुंदर अभिनेत्री प्रीती झिंटाने तिचे महाविद्यालयीन शिक्षण शिमल्यातील प्रसिद्ध सेंट बीड्स कॉलेजमधून केले. प्रीतीने इंग्रजीमध्ये बीए ऑनर्सही केले आहे. एवढेच नाही तर प्रीती झिंटाने क्रिमिनल सायकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे.

जॉन अब्राहम

अभिनेता जॉन अब्राहमने बॉम्बे स्कॉटिक स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी जय हिंद महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदवी घेतली असून एमबीएची पदवीही प्राप्त केली आहे. यासोबतच तो त्याच्या कॉलेजमधील फुटबॉल संघाचा कर्णधारही राहिला आहे.

हे सुद्धा वाचा

शाहरुख खान

बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खानच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे शालेय शिक्षण दिल्लीतील सेंट कोलंबस स्कूलमधून झाले आहे. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्र ग्रॅज्युएशन केले .  त्यानंतर जामिया मिलिया इस्लामियामधून मास कम्युनिकेशनची पदवी घेतली.

परिणीती चोप्रा

परिणीती चोप्राने कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरीमध्ये आपले शिक्षण सुरू केले. त्यानंतर ती लंडनला गेली. येथे त्यांनी मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून व्यवसाय, वित्त आणि अर्थशास्त्र या विषयात ऑनर्सचे शिक्षण घेतले.

अनुष्का शर्मा

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला लहानपणापासूनच लिहिता-वाचण्याची आवड होती. अनुष्का शर्माचे वडील लष्करात अधिकारी होते. ती तिच्या शाळा-कॉलेजमध्ये टॉपर असायची. त्यांनी अर्थशास्त्रात एमए केले आहे.

सारा अली खान

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे. 2016 मध्ये त्यांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.

आयुष्मान खुराना

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना हा खूप शिकलेला कलाकार आहे. त्यांनी इंग्रजी साहित्यात पदवी संपादन केली आणि त्यानंतर पंजाब विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कम्युनिकेशनमधून मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.

सोहा अली खान

सैफ अली खानची बहीण सोहा अली खानने ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी घेतली आहे. तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून आंतरराष्ट्रीय संबंधात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

रणदीप हुड्डा

हायवे, सरबजीत आणि किक सारखे हिट चित्रपट देणारा अभिनेता रणदीप हुड्डा याने दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर ते मास्टर्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटसाठी ऑस्ट्रेलियामधून पूर्ण केलं आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.