AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही अभिनेत्री कधीकाळी हॉटेलमध्ये करत होती काम, आज ठरली सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री, एका एपिसोडची फी पाहून…

मनोरंजनसृष्टीतील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री, जी कधीकाळी घर चालवण्यासाठी करत होती हॉटेलमध्ये काम. आज एका एपिसोडसाठी घेते 3 ते 3.5 लाख रुपये.

ही अभिनेत्री कधीकाळी हॉटेलमध्ये करत होती काम, आज ठरली सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री, एका एपिसोडची फी पाहून...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 29, 2026 | 12:26 PM
Share

मनोरंजनसृष्टीत अनेक कलाकारांचे आयुष्य बदलले असले तरी या चमकदार दुनियेच्या मागे मोठा संघर्ष दडलेला असतो. अशाच एका अभिनेत्रीची प्रेरणादायी कहाणी सध्या चर्चेत आहे. आपण ज्यांच्याबद्दल बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे लोकप्रिय टीव्ही मालिका अनुपमा मधील मुख्य अभिनेत्री रुपाली गांगुली.

रुपाली गांगुली ही दिग्दर्शक अनिल गांगुली यांची मुलगी आहेत. तिने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात खूप कठीण परिस्थितीचा सामना केला. एका मुलाखतीत रुपालीने सांगितले की, तिच्या वडिलांचे दोन चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती खूपच बिकट झाली होती. त्या काळात घर चालवण्यासाठी रुपालीला हॉटेलमध्ये काम करावे लागले, कधी बुटीकमध्ये काम केले तर कधी केटरिंगसारखी कामेही केली.

नंतर तिने पृथ्वी थिएटर येथे काम करण्यास सुरुवात केली. तिथे तिने दिनेश ठाकुर यांच्या ‘आत्मकथा’ या नाटकात भूमिका साकारली. या पहिल्या नाटकासाठी तिला फक्त 50 रुपये मानधन मिळाले होते.

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक

चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर रुपालीने टीव्हीकडे वळण्याचा निर्णय घेतला. साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत ‘मोनिशा’ची भूमिका साकारत तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली. मात्र त्यानंतर काही काळ तिला मोठे प्रोजेक्ट्स मिळाले नाहीत.

यानंतर 2020 साली राजन शाही यांच्या अनुपमा या मालिकेने तिच्या करिअरला नवे वळण दिले. मध्यमवर्गीय स्त्रीची भूमिका साकारणाऱ्या ‘अनुपमा’मुळे रुपाली घराघरात पोहोचल्या. गेल्या सहा वर्षांपासून ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर आहे आणि त्यामुळे रुपाली गांगुली आज टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे.

टीआरपीनंतप मानधनात वाढ

अहवालानुसार, रुपाली गांगुली सध्या एका एपिसोडसाठी सुमारे 3 ते 3.5 लाख रुपये मानधन घेते. मालिकेच्या सुरुवातीला तिला प्रति एपिसोड सुमारे 1.5 लाख रुपये मिळत होते. मात्र मालिकेच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि सातत्याने उच्च टीआरपीमुळे तिच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली. दरम्यान, संघर्षातून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलेली रुपाली गांगुलीची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?