AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विकास सेठीच्या निधनाचं खरं कारण आलं समोर; पत्नी म्हणाली “फंक्शनमध्ये गेलो तेव्हा अचानक..”

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता विकास सेठीचं रविवारी कार्डिॲक अरेस्टने निधन झालं. वयाच्या 48 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. विकासच्या निधनाचं खरं कारण त्याची पत्नी जान्हवी सेठने पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. ते दोघं नाशिकला एका कार्यक्रमाला गेले होते.

विकास सेठीच्या निधनाचं खरं कारण आलं समोर; पत्नी म्हणाली फंक्शनमध्ये गेलो तेव्हा अचानक..
Vikas SethiImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 09, 2024 | 8:41 AM
Share

रविवारी टीव्ही इंडस्ट्रीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली. ‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता विकास सेठीचं निधन झालं. हे वृत्त वाचून अनेकांना मोठा धक्का बसला होता. वयाच्या 48 व्या वर्षी विकासचं कार्डिॲक अरेस्टने निधन झालं. त्याच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित सहवेदना व्यक्त केल्या. विकासचं निधन झोपेतच झाल्याची माहिती समोर येत आहे.

विकासने ‘कहीं तो होगा’, ‘दो दिल बंधे एक डोरी से’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’, ‘ससुराल सिमर का’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. त्याने करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती. यामध्ये तो रॉबीच्या भूमिकेत होता. मात्र गेल्या बऱ्याच काळापासून तो टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोविडच्या आधीपासूनच त्याच्या हातात कोणतंच काम नव्हतं. त्याने मालिकेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण त्याला कोणत्या भूमिका मिळत नव्हत्या. हळूहळू विकास टीव्ही इंडस्ट्रीतील त्याच्या मित्रांपासूनही दूर होऊ लागला होता. त्याने सर्वांसोबतचा संपर्क तोडला होता. गेल्या काही काळापासून तो आर्थिक समस्यांसाचाही सामना करत होता.

View this post on Instagram

A post shared by Vikas Sethi (@vikass.sethi)

हाती काम नव्हतं आणि आर्थिक समस्यांमुळे विकास सतत तणावात होता. अशातच रविवारी झोपेत त्याला कार्डिअॅक अरेस्ट आला आणि विकासने आपले प्राण गमावले. विकासची पत्नी जान्हवी सेठने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की “आम्ही एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नाशिकला गेलो होतो. कार्यक्रमादरम्यानच अचानक विकासची प्रकृती बिघडली. त्याला उल्ट्या आणि जुलाबचा त्रास होऊ लागला होता. डॉक्टरांनी त्याचं चेकअप केलं आणि त्यानंतर तो झोपून गेला. सकाळी 6 वाजताच्या सुमारास मी विकासला उठवायला गेले, तेव्हा त्याची प्राणज्योत मालवली होती.” विकासच्या पश्चात त्याची पत्नी आणि जुळी मुलं असा कुटुंब आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.