AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गर्दी दिसली की एक अनामिक भीती वाटते..’; पहलगाम हल्ल्यानंतर विशाखा सुभेदारकडून भावना व्यक्त

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेत्री विशाखा सुभेदारने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून तिने हल्ल्यानंतरच्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. गर्दी दिसली की एक अनामिक भीती वाटते, असं तिने म्हटलंय.

'गर्दी दिसली की एक अनामिक भीती वाटते..'; पहलगाम हल्ल्यानंतर विशाखा सुभेदारकडून भावना व्यक्त
Vishakha SubhedarImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 28, 2025 | 10:09 AM
Share

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण पहायला मिळतंय. या हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपले प्राण गमावले. काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. एकीकडे दहशतवादाविरोधात आणि घडलेल्या घटनेबद्दल संताप असतानाच दुसरीकडे लोकांच्या मनात भीतीसुद्धा निर्माण झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री विशाखा सुभेदारनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ‘आनंद आणि विरंगुळा मिळावा म्हणून गेलेले पर्यटक, त्याची ही अशी अवस्था व्हावी. हे सगळंच अस्वस्थ करणारं आहे,’ असं तिने लिहिलंय.

विशाखा सुभेदारची पोस्ट-

‘इंटरनेट, सोशल मीडिया सध्या सगळीकडे एकाच विषयावर बोलणं सुरू आहे.. पहलगाममध्ये घडलेली भयावह घटना! हिंसेला, आतंकवादाला वृत्ती जबाबदार की मती? “असं व्हायला नको” “तसं व्हायला हवं” “यांनी हे करायला हवं, त्यांनी तसं बोलायला हवं” पण ज्यांच्यावर तो प्रसंग ओढवला त्यांनी काय करायचं? आपलं माणूस गमावल्याचं दुःख, शोक करायचा आणि जाब विचारायचा तर तो कोणाला? ही गमावलेली माणसं येतील का परत?

जात, धर्म, वर्ण, भेद त्याचं केलं जाणारं राजकारण अशा आणि बऱ्याच गोष्टी आहेत. पण एखाद्या निष्पाप माणसाला जीवे मारण्याची वृत्ती ही येते कशी आणि कुठून? ही शिकवण देणारे आणि ती आपल्या चांगल्याचसाठी आहे हे मानणारे यांना कसे थांबवायचे? आनंद आणि विरंगुळा मिळावा म्हणून गेलेले पर्यटक, त्याची ही अशी अवस्था व्हावी. हे सगळंच अस्वस्थ करणारं आहे. गर्दी दिसली की एक अनामिक भीती वाटते. खूप खदखद आहे मनात. राहून राहून सारखे तेच विचार येतात. समजा आपण त्या जागी असतो तर?,’ अशा शब्दांत विशाखाने भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) औपचारिकपणे हाती घेतला आहे. या हल्ल्यासंबंधी पुरावे शोधण्यासाठी तपास मोहीम तीव्र करण्यात आली असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत, असं अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितलं. केंद्रीय गृह विभागाच्या आदेशानंतर एनआयएने जम्मूमध्ये गुन्हा दाखल केला आहे आणि तपासासाठी अनेक पथकं तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.