अनिल अंबानी यांच्या लव्हस्टोरीत भूकंपाचा काय संबंध ? जाणून घ्या

| Updated on: Feb 11, 2022 | 2:33 PM

त्यावेळी सुरूवातीला भेटलेल्या दोघांच्या विचारामध्ये एकता असल्याने दोघेही एकमेकांचे चांगले मित्र झाले. तसेच दोघाचे विचार एकमेकांशी जुळत असल्याने दोघे एकमेकांना भेटत होते.

अनिल अंबानी यांच्या लव्हस्टोरीत भूकंपाचा काय संबंध ? जाणून घ्या
फाईल फोटो
Follow us on

मुंबई – अनेकांच्या आयुष्यात आपली प्रेम कहानी यशस्वी व्हावी असं वाटतं. परंतु ते अनेकांच्या आयुष्यात शक्य होत असं नाही. कारण आपल्याकडे अशी अनेक उदाहरण आहेत की, ज्याचं प्रेम अधुर राहिलेलं आहे. आज आपण चर्चा करणार आहोत धिरूभाई अंबानी (dhirubhai ambani) यांच्या मुलाची म्हणजे अनिल अंबानी (anil ambani) यांनी कारण ते त्यांनी त्यांच्या आयुष्य़ात प्रेम केलेल्या मुलीसोबत लग्न झालं आहे. तसेच भारतातल्या मोठ्या चार कंपन्याचे मालक सुध्दा आहेत. त्यामुळे त्यांना यशस्वी उद्योजक म्हणून अनेकजण बघतात. त्यांच्या उद्योजकतेमध्ये ते जसे यशस्वी राहिलेले आहेत. तसेच ते त्यांच्या खासगी आयुष्यात सु्ध्दा यशस्वी राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना यशस्वी पुरूष म्हणून अनेकजण संबोधतात. तर त्याची ती एक लव्ह स्टोरी (love story) आहे. ही लव्हस्टोरी तयार होण्यात एका भूकंपाचा मोठा वाटा आहे असं अनेकजण म्हणतात. त्यामुळे नेमकं त्याची लव्हस्टोरी काय आहे किंवा भूकंपाचा वाटा काय आहे हे आपण पाहणार आहोत.

1986 मध्ये लग्न

अनिल अंबानी यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटातल्या नटाप्रमाणे राहिलेलं आहे. कारण वडिलांपासून त्यांच्या घरात उद्योग सुरू झाले. त्याचबरोबर त्यांना सुरूवातीपासून म्हणजे घरातून व्यवसायाचे धडे मिळाले. त्यामुळे त्यांना आपला व्यवसाय करण अत्यंत सोप गेल अस म्हणायला हरकत नाही. अनिल यांचा प्रेमविवाह अभिनेत्री टीना मुनीम यांच्यासोबत झाला. त्यानंतर त्यांना दोन मुले देखील झाली आहेत. 1986 मध्ये अनिल आणि टीना यांची भेट झाली. परंतु ही भेट टीनाच्या भाच्यामुळे झाली. त्यावेळी सुरूवातीला भेटलेल्या दोघांच्या विचारामध्ये एकता असल्याने दोघेही एकमेकांचे चांगले मित्र झाले. तसेच दोघाचे विचार एकमेकांशी जुळत असल्याने दोघे एकमेकांना भेटत होते. त्यामुळे दोघांच्यात एकमेकांबाबत प्रेम निर्माण झाल.

अनिल अंबानी रिलायन्सचे मालक असल्याचे माहित नव्हते

ज्यावेळी पहिल्यांदा अनिल अंबानी यांना टीना भेटण्यासाठी गेली. तेव्हा ती साध्या कपड्यांमध्ये होती. पहिल्या भेटीत ते दोघे एकमेकांना आवडले तसेच एकमेकांच्या प्रेमात देखील पडले. दोघे प्रेमात पडले पण एकमेकांच्या व्यवसाय किंवा कामाबाबत एकमेकांना अजिबात माहित नव्हते. तसेच दोघेही एकमेकांच्या प्रेमात आखंड बुडाल्याने दोघांनीही एकमेकांच्या बाबत सुरूवातीला अजिबात चौकशी केली नाही. त्यामुळे एकमेकांच्या कामाबद्दल दोघांनाही माहिती नव्हती. विशेष म्हणजे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स व्यवसायाबाबत त्यांना अजिबात माहिती नव्हती. तसेच टीना यांनी अनिल यांना शुटिंगच्या तारखामुळे अनेकदा डावलले, पण एक दिवस असा आला की दोघांची अखेर भेट झाली.

घरच्यांचा विरोध असल्याने झाले होते विभक्त…

अमेरिकेत असताना एक भूकंप झाला. त्यावेळी टीना यांनी अनिल अंबानी यांना फोन केला आणि तिथून पुढे पुन्हा एकदा दोघांच्या प्रेम सुरू झाले. कारण टीना अभिनेत्री असल्याने अंबानी कुटुंबियांना ती पसंत नव्हती. त्यामुळे दोघांनी प्रेम थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पण एका भूकंपामुळे दोघांच्या प्रेमात पुन्हा रस वाढला. चौकशीसाठी फोन केल्यानंतर पुन्हा दोघांनी एकमेकांशी बोलणे सुरु केले. 1991 मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केले.

सुखाचे चांदणे, आई कुठं काय करते? मधलं अरुंधतीचं मच अवेटेड गाणं तुम्ही ऐकलात का? का ढसाढसा रडला अनिरुद्ध देशमुख?

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आर्या आंबेकरचं खास गाणं ‘भरली उरा मधी’ प्रेक्षकांच्या भेटीला

काय घालायचं ज्याचा त्याचा प्रश्न, दिशा पाटनीच्या बिकिनी अवताराला तुम्ही म्हणणार, नार गुलजार!