AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जे माझं आहे ते तुला कधीच मिळणार नाही”; अभिषेक बच्चनला बिग बी असं का म्हणाले?

अमिताभ बच्चन लवकरच कौन बनेगा करोडपती या शोचा पंधरावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. 2000 मध्ये या शोची सुरुवात झाली होती. ABCL ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर बिग बींनी 'केबीसी' हा शो सुरू केला. याच शोने त्यांचं करिअर सावरलं आणि अभिनेते म्हणून त्यांनी नवी सुरुवात केली होती.

जे माझं आहे ते तुला कधीच मिळणार नाही; अभिषेक बच्चनला बिग बी असं का म्हणाले?
Abhishek and Amitabh BachchanImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 17, 2023 | 11:23 AM
Share

मुंबई | 17 जुलै 2023 : बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन हे चित्रपटांमधील विविध भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकतात. मात्र त्याचसोबत छोट्या पडद्यावरील त्यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा रिॲलिटी शोसुद्धा तितकाच गाजतो. या शोमध्ये ते विविध पाहुण्यांनाही आमंत्रित करतात. बच्चन कुटुंबातील सदस्यसुद्धा अनेकदा या शोमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र शोच्या एका एपिसोडमध्ये जेव्हा अभिषेक बच्चन पाहुणा म्हणून आला, तेव्हा बिग बी स्पर्धक म्हणून हॉटसीटवर बसले होते. 2017 मधील हा एपिसोड आहे. अभिषेकने या शोमध्ये अनेकदा हजेरी लावली होती. ‘हॅपी न्यू इअर’ या चित्रपटातील सहकलाकार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसोबत यांच्यासोबतही तो एका एपिसोडमध्ये उपस्थित होता.

सप्टेंबर 2017 मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’चा हा खास एपिसोड पार पडला होता. या जुन्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हे हॉटसीटवर स्पर्धक म्हणून बसले आहेत तर अभिषेक बच्चन शोचं सूत्रसंचालन करताना दिसतोय. स्पर्धकाची ओळख करून देताना अभिषेक म्हणतो, “माझ्यासमोर मुंबईहून आलेले स्पर्धक श्री. अमिताभ बच्चन बसलेले आहेत. हे एक अभिनेते आहेत आणि हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केलं आहे. यांना गाणं गाण्याची आणि सतत काम करण्याची फार आवड आहे. जर हे या शोमधून मोठी रक्कम जिंकत असतील तर ती रक्कम ते त्यांच्या मुलाला देऊ इच्छितात.”

अभिषेकचं हे वक्तव्य ऐकताच अमिताभ बच्चन म्हणतात, “हे तुम्हाला कोणी सांगितलं?” त्यावर अभिषेक म्हणतो, “तुम्हीच तर मला शिकवलंत की जे माझं आहे ते तुझंही आहे.” मुलाचं उत्तर ऐकून बिग बगी लगेच म्हणतात, “पण आज जे माझं आहे ते माझं आहे. हे तुझं होणार नाही कारण ते माझंच आहे.” या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या आहेत.

अमिताभ बच्चन लवकरच कौन बनेगा करोडपती या शोचा पंधरावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. 2000 मध्ये या शोची सुरुवात झाली होती. ABCL ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर बिग बींनी ‘केबीसी’ हा शो सुरू केला. याच शोने त्यांचं करिअर सावरलं आणि अभिनेते म्हणून त्यांनी नवी सुरुवात केली होती. आता पंधराव्या सिझनचं सूत्रसंचालनसुद्धा बिग बीच करणार आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.