AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बींसोबतच्या केमिस्ट्रीमुळे धर्मेंद्र यांनी ‘बागबान’ पाहण्यास दिला होता नकार? हेमा मालिनी यांनी दिलं उत्तर

याच मुलाखतीत हेमा मालिनी त्यांच्या लग्नाविषयीही मोकळेपणे व्यक्त झाल्या. हेमा यांनी 1980 मध्ये धर्मेंद्र यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यावेळी धर्मेंद्र आधीच विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्यानंतर हेमा मालिनी वेगळ्या राहू लागल्या.

बिग बींसोबतच्या केमिस्ट्रीमुळे धर्मेंद्र यांनी 'बागबान' पाहण्यास दिला होता नकार? हेमा मालिनी यांनी दिलं उत्तर
बिग बींसोबतच्या केमिस्ट्रीमुळे धर्मेंद्र यांनी 'बागबान' पाहण्यास दिला होता नकार? Image Credit source: Youtube
| Updated on: Jul 13, 2023 | 12:54 PM
Share

मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांचा 2003 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बागबान’ हा चित्रपट चांगलाच गाजला. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी खुलासा केला की ‘बागबान’मध्ये चार मुलांच्या आईची भूमिका साकारण्याची त्यांची इच्छाच नव्हती. मात्र आईच्या आग्रहाखातर त्यांनी ही भूमिका स्वीकारली होती. चित्रपटाची कथा ऐकताना हेमा मालिनी यांच्यासोबतच त्यांच्या आईसुद्धा होत्या. त्यांनी कथा खूपच आवडली होती आणि म्हणूनच हेमाने नकार दिल्यानंतरही त्यांनी तो चित्रपट करण्याचा आग्रह केला. याच मुलाखतीत हेमा यांना या चित्रपटावरून झालेल्या आणखी एका चर्चेविषयी प्रश्न विचारण्यात आला.

‘लेहरे रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत हेमा यांना विचारण्यात आलं की, “पती धर्मेंद्र यांनी तुमची आणि अमिताभ बच्चन यांच्यातील केमिस्ट्रीमुळे बागबान चित्रपट पाहण्यास नकार दिला होता का?” त्यावर हेमा मालिनी हसल्या आणि म्हणाल्या, “मला त्याबद्दल काहीच माहीत नाही.”रवी चोप्रा दिग्दर्शित ‘बागबान’ या चित्रपटात सलमान खान, महिमा चौधरी, अमन वर्मा आणि समीर सोनी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

मोठ्या पडद्यापासून बराच काळ दूर राहिल्याने पुनरागमन करताना आईची भूमिका साकारावी का, याबद्दल हेमा मालिनी साशंक होत्या. रवी चोप्रा जेव्हा कथा सांगत होते तेव्हा हेमा यांच्या आई त्यांच्या बाजूलाच बसल्या होत्या. “चार मोठ्या मुलांच्या आईची भूमिका मी साकारावी असं ते म्हणतायत. हे कसं शक्य आहे”, असा सवाल हेमा यांनी कथा ऐकल्यावर त्यांच्या आईकडे केला होता. मात्र त्यांचा नकार असतानाही हेमा यांच्या आईने तो चित्रपट स्वीकारण्यासाठी आग्रह केला. त्यांना चित्रपटाची कथा फार आवडली होती.

याच मुलाखतीत हेमा मालिनी त्यांच्या लग्नाविषयीही मोकळेपणे व्यक्त झाल्या. हेमा यांनी 1980 मध्ये धर्मेंद्र यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यावेळी धर्मेंद्र आधीच विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्यानंतर हेमा मालिनी वेगळ्या राहू लागल्या. लग्नानंतर पती आणि पतीच्या कुटुंबापासून वेगळं राहण्याच्या निर्णयामुळे समाजात स्त्रीवादी प्रतिमा कशी निर्माण झाली आणि तसं असूनही धर्मेंद्र यांनी कशी साथ दिली, याविषयी त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.

“कोणालाच तसं राहायला आवडत नाही. पण कधी कधी घटना तशा घडतात. त्यामुळे जे घडतं ते तुम्हाला स्वीकारावं लागतं. अन्यथा कोणालाच असं आयुष्य जगायला आवडणार नाही. प्रत्येक महिलेला पती, मुलं आणि सर्वसामान्य कुटुंब हवं असतं. पण कुठेतरी गोष्टी हातापलीकडे गेल्या. पण मला त्याविषयी अजिबात वाईट वाटत नाही किंवा त्याची तक्रार मी करत नाही. मी माझ्यासाठी खुश आहे. माझ्या दोन मुली आहेत आणि त्या दोघींचं संगोपन मी उत्तमरित्या केलं”, असं त्या म्हणाल्या.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.