AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बींसोबतच्या केमिस्ट्रीमुळे धर्मेंद्र यांनी ‘बागबान’ पाहण्यास दिला होता नकार? हेमा मालिनी यांनी दिलं उत्तर

याच मुलाखतीत हेमा मालिनी त्यांच्या लग्नाविषयीही मोकळेपणे व्यक्त झाल्या. हेमा यांनी 1980 मध्ये धर्मेंद्र यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यावेळी धर्मेंद्र आधीच विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्यानंतर हेमा मालिनी वेगळ्या राहू लागल्या.

बिग बींसोबतच्या केमिस्ट्रीमुळे धर्मेंद्र यांनी 'बागबान' पाहण्यास दिला होता नकार? हेमा मालिनी यांनी दिलं उत्तर
बिग बींसोबतच्या केमिस्ट्रीमुळे धर्मेंद्र यांनी 'बागबान' पाहण्यास दिला होता नकार? Image Credit source: Youtube
| Updated on: Jul 13, 2023 | 12:54 PM
Share

मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांचा 2003 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बागबान’ हा चित्रपट चांगलाच गाजला. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी खुलासा केला की ‘बागबान’मध्ये चार मुलांच्या आईची भूमिका साकारण्याची त्यांची इच्छाच नव्हती. मात्र आईच्या आग्रहाखातर त्यांनी ही भूमिका स्वीकारली होती. चित्रपटाची कथा ऐकताना हेमा मालिनी यांच्यासोबतच त्यांच्या आईसुद्धा होत्या. त्यांनी कथा खूपच आवडली होती आणि म्हणूनच हेमाने नकार दिल्यानंतरही त्यांनी तो चित्रपट करण्याचा आग्रह केला. याच मुलाखतीत हेमा यांना या चित्रपटावरून झालेल्या आणखी एका चर्चेविषयी प्रश्न विचारण्यात आला.

‘लेहरे रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत हेमा यांना विचारण्यात आलं की, “पती धर्मेंद्र यांनी तुमची आणि अमिताभ बच्चन यांच्यातील केमिस्ट्रीमुळे बागबान चित्रपट पाहण्यास नकार दिला होता का?” त्यावर हेमा मालिनी हसल्या आणि म्हणाल्या, “मला त्याबद्दल काहीच माहीत नाही.”रवी चोप्रा दिग्दर्शित ‘बागबान’ या चित्रपटात सलमान खान, महिमा चौधरी, अमन वर्मा आणि समीर सोनी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

मोठ्या पडद्यापासून बराच काळ दूर राहिल्याने पुनरागमन करताना आईची भूमिका साकारावी का, याबद्दल हेमा मालिनी साशंक होत्या. रवी चोप्रा जेव्हा कथा सांगत होते तेव्हा हेमा यांच्या आई त्यांच्या बाजूलाच बसल्या होत्या. “चार मोठ्या मुलांच्या आईची भूमिका मी साकारावी असं ते म्हणतायत. हे कसं शक्य आहे”, असा सवाल हेमा यांनी कथा ऐकल्यावर त्यांच्या आईकडे केला होता. मात्र त्यांचा नकार असतानाही हेमा यांच्या आईने तो चित्रपट स्वीकारण्यासाठी आग्रह केला. त्यांना चित्रपटाची कथा फार आवडली होती.

याच मुलाखतीत हेमा मालिनी त्यांच्या लग्नाविषयीही मोकळेपणे व्यक्त झाल्या. हेमा यांनी 1980 मध्ये धर्मेंद्र यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यावेळी धर्मेंद्र आधीच विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्यानंतर हेमा मालिनी वेगळ्या राहू लागल्या. लग्नानंतर पती आणि पतीच्या कुटुंबापासून वेगळं राहण्याच्या निर्णयामुळे समाजात स्त्रीवादी प्रतिमा कशी निर्माण झाली आणि तसं असूनही धर्मेंद्र यांनी कशी साथ दिली, याविषयी त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.

“कोणालाच तसं राहायला आवडत नाही. पण कधी कधी घटना तशा घडतात. त्यामुळे जे घडतं ते तुम्हाला स्वीकारावं लागतं. अन्यथा कोणालाच असं आयुष्य जगायला आवडणार नाही. प्रत्येक महिलेला पती, मुलं आणि सर्वसामान्य कुटुंब हवं असतं. पण कुठेतरी गोष्टी हातापलीकडे गेल्या. पण मला त्याविषयी अजिबात वाईट वाटत नाही किंवा त्याची तक्रार मी करत नाही. मी माझ्यासाठी खुश आहे. माझ्या दोन मुली आहेत आणि त्या दोघींचं संगोपन मी उत्तमरित्या केलं”, असं त्या म्हणाल्या.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....