AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ती मला दांडक्याने मारायची..”; जेव्हा श्वेता तिवारीच्या पूर्व पतीने केले होते आरोप

अभिनेत्री श्वेता तिवारीने 2013 मध्ये अभिनव कोहलीशी दुसरं लग्न केलं होतं. मात्र तिचा संसार फार काळ टिकला नाही. मुलाच्या जन्मानंतर दोघांमध्ये सतत भांडणं होऊ लागली होती. श्वेताने अभिनववर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. त्याविरोधात अभिनवनेही तिच्यावर काही धक्कादायक आरोप केले होते.

ती मला दांडक्याने मारायची..; जेव्हा श्वेता तिवारीच्या पूर्व पतीने केले होते आरोप
श्वेता तिवारीImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 30, 2024 | 12:01 PM
Share

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. श्वेताने दोनदा लग्न केलं. मात्र दोन्ही वेळा तिचा संसार टिकला नाही. तिने अभिनेता राजा चौधरीशी पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर अभिनव कोहलीशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती. श्वेताने तिच्या दोन्ही पतींवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. राजा चौधरीला घटस्फोट दिल्याच्या काही काळानंतर तिने अभिनव कोहलीशी दुसरं लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगासुद्धा आहे. मात्र लग्नाच्या काही वर्षांतच दोघं विभक्त झाले. श्वेताने अभिनव विरोधात पोलिसांत तक्रारसुद्धा दाखल केल होती. तिने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. मात्र नंतर अभिनवने आपली बाजू मांडली तेव्हा त्याने श्वेतावरच काही धक्कादायक आरोप केले होते.

एका मुलाखतीत अभिनव म्हणाला होता, “मी कधीच श्वेतावर हात उचलला नाही. पलकने खुल्या पत्रात याचा उल्लेख केला होता, पण मी तसं कधीच वागलो नाही. मी कानाखाली वाजवल्यासाठी दोनदा तिची माफी मागितली होती. मात्र श्वेताने माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली आहे. माझ्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप सिद्ध होण्यासाठी ती असं म्हणतेय, पण यात तथ्य काहीच नाही. मी कधीच महिलेवर हात उचलला नाही. किंबहुना त्या दाव्यांविरोधात श्वेतानेच मला दांडक्याने मारलं होतं. मी कोणालाच मारलं नव्हतं, पण श्वेताने माझ्यावर हात उचलला होता. तिने तिच्या मुलीचा वापर करून माझ्यावर चुकीचे आरोप लावले. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.”

जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर श्वेता आणि अभिनवने 2013 मध्ये लग्न केलं होतं. ‘जाने क्या बात हुई’ या मालिकेच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. लग्नानंतर या दोघांना रेयांश हा मुलगा झाला. मात्र मुलाच्या जन्मानंतरच त्यांच्यात भांडणं होऊ लागली होती. मुलाला एकटं घरी सोडून श्वेता ‘खतरों के खिलाडी’ या शोच्या शूटिंगसाठी केपटाऊनला निघून गेल्याचा आरोप अभिनवने केला होता. त्यानंतर श्वेताने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत अभिनववर काही आरोप केले होते. श्वेताची मुलगी पलकनेही समोर येत अभिनववर निशाणा साधला होता. अखेर ऑगस्ट 2019 मध्ये श्वेताना अभिनवविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती.

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.