AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ती मला दांडक्याने मारायची..”; जेव्हा श्वेता तिवारीच्या पूर्व पतीने केले होते आरोप

अभिनेत्री श्वेता तिवारीने 2013 मध्ये अभिनव कोहलीशी दुसरं लग्न केलं होतं. मात्र तिचा संसार फार काळ टिकला नाही. मुलाच्या जन्मानंतर दोघांमध्ये सतत भांडणं होऊ लागली होती. श्वेताने अभिनववर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. त्याविरोधात अभिनवनेही तिच्यावर काही धक्कादायक आरोप केले होते.

ती मला दांडक्याने मारायची..; जेव्हा श्वेता तिवारीच्या पूर्व पतीने केले होते आरोप
श्वेता तिवारीImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 30, 2024 | 12:01 PM
Share

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. श्वेताने दोनदा लग्न केलं. मात्र दोन्ही वेळा तिचा संसार टिकला नाही. तिने अभिनेता राजा चौधरीशी पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर अभिनव कोहलीशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती. श्वेताने तिच्या दोन्ही पतींवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. राजा चौधरीला घटस्फोट दिल्याच्या काही काळानंतर तिने अभिनव कोहलीशी दुसरं लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगासुद्धा आहे. मात्र लग्नाच्या काही वर्षांतच दोघं विभक्त झाले. श्वेताने अभिनव विरोधात पोलिसांत तक्रारसुद्धा दाखल केल होती. तिने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. मात्र नंतर अभिनवने आपली बाजू मांडली तेव्हा त्याने श्वेतावरच काही धक्कादायक आरोप केले होते.

एका मुलाखतीत अभिनव म्हणाला होता, “मी कधीच श्वेतावर हात उचलला नाही. पलकने खुल्या पत्रात याचा उल्लेख केला होता, पण मी तसं कधीच वागलो नाही. मी कानाखाली वाजवल्यासाठी दोनदा तिची माफी मागितली होती. मात्र श्वेताने माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली आहे. माझ्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप सिद्ध होण्यासाठी ती असं म्हणतेय, पण यात तथ्य काहीच नाही. मी कधीच महिलेवर हात उचलला नाही. किंबहुना त्या दाव्यांविरोधात श्वेतानेच मला दांडक्याने मारलं होतं. मी कोणालाच मारलं नव्हतं, पण श्वेताने माझ्यावर हात उचलला होता. तिने तिच्या मुलीचा वापर करून माझ्यावर चुकीचे आरोप लावले. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.”

जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर श्वेता आणि अभिनवने 2013 मध्ये लग्न केलं होतं. ‘जाने क्या बात हुई’ या मालिकेच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. लग्नानंतर या दोघांना रेयांश हा मुलगा झाला. मात्र मुलाच्या जन्मानंतरच त्यांच्यात भांडणं होऊ लागली होती. मुलाला एकटं घरी सोडून श्वेता ‘खतरों के खिलाडी’ या शोच्या शूटिंगसाठी केपटाऊनला निघून गेल्याचा आरोप अभिनवने केला होता. त्यानंतर श्वेताने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत अभिनववर काही आरोप केले होते. श्वेताची मुलगी पलकनेही समोर येत अभिनववर निशाणा साधला होता. अखेर ऑगस्ट 2019 मध्ये श्वेताना अभिनवविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती.

Follow Us
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा