AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराटने अनुष्काशी लग्न करायला नको होतं म्हणताच चाहत्यांनी शोएबला घेरले; म्हणाले…

पाकिस्थानचे माजी खेळाडू शोएब अख्तर आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी प्रसिध्द असतो. त्यातचं त्याचा सोशल मीडियावर समाचार घेणारे सुध्दा सोशल मीडियावर अधिक सक्रीय असतात.

विराटने अनुष्काशी लग्न करायला नको होतं म्हणताच चाहत्यांनी शोएबला घेरले; म्हणाले...
फोटो - सोशल मीडिया
| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 11:41 AM
Share

मुंबई – मागच्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावरती अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या मुलगी वामिकाची खूप चर्चा सुरू आहे. काही फोटो सोशल मीडियावरती (social media) प्रचंड व्हायरल झाले झाले आहेत. विराट कोहलीच्या देशभरातील चाहत्यांनी त्यावर कमेंट केली आहे. त्यामध्ये विराट कोहली यांनी कर्णधारपद सोडल्याची सुध्दा चर्चा झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामध्ये पाकिस्थानचे माजी खेळाडू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) सुध्दा सामील आहे. शोएब अख्तरने विराट आणि अनुष्का यांच्या लग्नावर एक टिपणी केली आहे, त्यामध्ये तो म्हणतो की विराट अनुष्काशी लग्न करायला नको होते. त्यानंतर दोघांच्या चाहत्यांनी अख्तरला घेरले आणि जाब विचारला.

अशी केली होती टिप्पणी

पाकिस्थानचे माजी खेळाडू शोएब अख्तर आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी प्रसिध्द असतो. त्यातचं त्याचा सोशल मीडियावर समाचार घेणारे सुध्दा सोशल मीडियावर अधिक सक्रीय असतात. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने एएनआयशी बोलताना सांगितले की, जर मी भारतात असतो आणि वेगवान गोलंदाज असतो. तर मी लग्न केले नसते. मी माझ्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले असते, हा माझा विचार आहे. हा कोहलीचा वैयक्तिक निर्णय आहे. तुम्ही मला विचाराल तर मी माझ्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करेन. गेल्या वर्षी कोहलीने आपल्या आयुष्यातील शेवटचा निर्णय घेतला, त्याने टी-20 चे कर्णधारपद सोडले, त्यानंतर त्याला वनडेचे कर्णधारपदही गमवावे लागले. आता त्याने कसोटी सामन्याचे कर्णधारपदही सोडले आहे. या निर्णयावर प्रत्येकाचे मत वेगळे आहे, मात्र विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांना शोएबचे मत पसंत पडलेले नाही.

या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका

एका चाहत्याने ट्विटरवर लिहिले आहे की, “त्याच्या मते करिअर हे सर्व काही असेल तर, प्रेम जीवन, कुटुंब, आनंद तुम्हाला याचा काहीचं फरक पडत नाही. मला वाटते अशा लोकांनी तोंड बंद ठेवावे.” जिमी नावाच्या युजरने विराटचा रिलेशनशिपनंतरचा रेकॉर्ड समोर ठेवला आणि म्हणाला की, विराटचे करिअर शिखरावर होते, तेव्हा तो अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये होता. शोएबच्या या वक्तव्यासाठी सोशल मीडियावर जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.

दोनच दिवसांपूर्वी वामिकाचा फोटो व्हायरल झाला होता. यावर अनुष्काने आपल्या मुलीचा फोटो व्हायरल होऊ नये, अशी प्रतिक्रिया दिली होती. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये अनुष्का आणि वामिकाला कॅमेऱ्याने कैद केले होते.

Pooja Sawant Birthday : हॅप्पी बर्थ डे कलरफुल!, वाढदिवसानिमित्त पूजा सावंतचे ‘रंगीन’ फोटो आणि लक्षवेधी माहिती

8 व्या वर्षी पहिले पारितोषिक, त्यानंतर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित; असं घडलं कविता कृष्णमूर्ती यांचं करिअर

Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकरांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, टीमकडून पुन्हा प्रार्थनेची विनंती!

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.