AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गोष्टीला वैतागून अनुष्का-विराटने लंडनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला; मोठं कारण आलं समोर

अनुष्का आणि विराटने अचानक लंडनला जाण्याचा निर्णय का घेतला? माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

या गोष्टीला वैतागून अनुष्का-विराटने लंडनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला; मोठं कारण आलं समोर
Anushka and Virat Image Credit source: instagram
| Updated on: Apr 26, 2025 | 7:41 PM
Share

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानली जाते. हे कपल नेहमी चर्चेत असतात. कधी त्यांच्या फॅमिली पिकनीकमुळे तर कधी त्यांच्या अध्यात्माच्या प्रवासामुळे. आणि जेव्हा ही जोडी एकत्र असते तेव्हा सर्वांचेच लक्ष वेधून घेते. विराटसोबत लग्न झाल्यावर आणि बाळ झाल्यानंतर अनुष्का शर्मा फिल्मी जगापासून दूरच राहिली आहे. तसेच अनुष्का आणि विराट कोहली 2024 पासून लंडनमध्ये राहत आहेत. पण अचानक त्यांनी भारत सोडून लंडनला स्थायिक होण्याचं कारण जाणून घेण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक होते.

अनुष्का आणि विराट कोहलीने भारत सोडून लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला?

आता त्याच्या लंडनला जाण्यामागील खरे कारण समोर आले आहे. विशेष म्हणजे माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी विराट-अनुष्का दोघांनीही भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला याचं कारण स्पष्ट केलं.

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने, जे हेल्थ अँड वेलनेस यूट्यूब चॅनल चालवतात, त्यांनी अलीकडेच यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने त्याच्या पॉडकास्टवर आमंत्रित केले होते. डॉ. श्रीराम नेने यांनी या मुलाखतीत अनुष्का आणि विराटने लंडनला जाण्याचा निर्णय का घेतला हे सांगितले.

डॉक्टर नेनेंनी सांगितलं खरं कारण 

संभाषणादरम्यान, डॉ. नेने यांनी अनुष्कासोबत झालेल्या संभाषणाची आठवण करून दिली आणि म्हणाले, “एक दिवस अनुष्काशी बोलताना तिने मला सांगितले की ते लंडनला जाण्याचा विचार करत आहेत कारण त्यांना इथे मिळालेल्या यशाचा योग्य आनंद घेता येत नाही. आम्हाला त्यांची समस्या समजते कारण ते जे काही करतात ते नेहमीच लोकांचं लक्ष वेधून घेतात, ज्यामुळे कधीकधी त्यामुळे त्रासही होऊ शकतो.”

मुलांना या सर्वांपासून दूर ठेवायचं होतं…

डॉ. नेने यांनी पुढे सांगितले की, अनुष्का आणि विराट देखील लंडनला जाण्यामागे आणखी एक कारण म्हणजे त्यांना त्यांच्या मुलांना सर्व प्रसिद्धीपासून दूर ठेवायचं होतं. त्यांनी पुढे म्हटलं , “आम्ही सर्वांशी मिळून मिसळून राहतो, मी खूप बिंदास (कूल) आहे. पण कधीकधी ते आव्हानात्मक बनते. सर्वत्र सेल्फी मोमेंट हा असतोच. ते इतके वाईट नाही पण काही काळानंतर ते नकोस होतं. विशेषतः जेव्हा तुम्ही डिनर किंवा लंचसाठी बाहेर जाता. तेव्हा तुम्हाला सभ्यतेत राहावं लागतं. ते माझ्या पत्नीसाठी एक समस्या बनते. पण अनुष्का आणि विराट खूप गोड लोक आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलांना सामान्य पद्धतीने वाढवायचे आहे.”

म्हणून अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलांना या झगमगत्या जगापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.