AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गोष्टीला वैतागून अनुष्का-विराटने लंडनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला; मोठं कारण आलं समोर

अनुष्का आणि विराटने अचानक लंडनला जाण्याचा निर्णय का घेतला? माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

या गोष्टीला वैतागून अनुष्का-विराटने लंडनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला; मोठं कारण आलं समोर
Anushka and Virat Image Credit source: instagram
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Apr 26, 2025 | 7:41 PM
Share

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानली जाते. हे कपल नेहमी चर्चेत असतात. कधी त्यांच्या फॅमिली पिकनीकमुळे तर कधी त्यांच्या अध्यात्माच्या प्रवासामुळे. आणि जेव्हा ही जोडी एकत्र असते तेव्हा सर्वांचेच लक्ष वेधून घेते. विराटसोबत लग्न झाल्यावर आणि बाळ झाल्यानंतर अनुष्का शर्मा फिल्मी जगापासून दूरच राहिली आहे. तसेच अनुष्का आणि विराट कोहली 2024 पासून लंडनमध्ये राहत आहेत. पण अचानक त्यांनी भारत सोडून लंडनला स्थायिक होण्याचं कारण जाणून घेण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक होते.

अनुष्का आणि विराट कोहलीने भारत सोडून लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला?

आता त्याच्या लंडनला जाण्यामागील खरे कारण समोर आले आहे. विशेष म्हणजे माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी विराट-अनुष्का दोघांनीही भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला याचं कारण स्पष्ट केलं.

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने, जे हेल्थ अँड वेलनेस यूट्यूब चॅनल चालवतात, त्यांनी अलीकडेच यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने त्याच्या पॉडकास्टवर आमंत्रित केले होते. डॉ. श्रीराम नेने यांनी या मुलाखतीत अनुष्का आणि विराटने लंडनला जाण्याचा निर्णय का घेतला हे सांगितले.

डॉक्टर नेनेंनी सांगितलं खरं कारण 

संभाषणादरम्यान, डॉ. नेने यांनी अनुष्कासोबत झालेल्या संभाषणाची आठवण करून दिली आणि म्हणाले, “एक दिवस अनुष्काशी बोलताना तिने मला सांगितले की ते लंडनला जाण्याचा विचार करत आहेत कारण त्यांना इथे मिळालेल्या यशाचा योग्य आनंद घेता येत नाही. आम्हाला त्यांची समस्या समजते कारण ते जे काही करतात ते नेहमीच लोकांचं लक्ष वेधून घेतात, ज्यामुळे कधीकधी त्यामुळे त्रासही होऊ शकतो.”

मुलांना या सर्वांपासून दूर ठेवायचं होतं…

डॉ. नेने यांनी पुढे सांगितले की, अनुष्का आणि विराट देखील लंडनला जाण्यामागे आणखी एक कारण म्हणजे त्यांना त्यांच्या मुलांना सर्व प्रसिद्धीपासून दूर ठेवायचं होतं. त्यांनी पुढे म्हटलं , “आम्ही सर्वांशी मिळून मिसळून राहतो, मी खूप बिंदास (कूल) आहे. पण कधीकधी ते आव्हानात्मक बनते. सर्वत्र सेल्फी मोमेंट हा असतोच. ते इतके वाईट नाही पण काही काळानंतर ते नकोस होतं. विशेषतः जेव्हा तुम्ही डिनर किंवा लंचसाठी बाहेर जाता. तेव्हा तुम्हाला सभ्यतेत राहावं लागतं. ते माझ्या पत्नीसाठी एक समस्या बनते. पण अनुष्का आणि विराट खूप गोड लोक आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलांना सामान्य पद्धतीने वाढवायचे आहे.”

म्हणून अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलांना या झगमगत्या जगापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत