AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी जिवंत असे पर्यंत तरी हे होऊ देणार नाही, श्रीदेवींच्या या प्रश्नावर का चिडले बोनी कपूर

श्रीदेवी यांच्या निधनानंतर ही त्यांच्या चाहत्यांच्या त्या आठवणीत आहेत. श्रीदेवी यांनी अनेक हिट चित्रपट केले आहेत. श्रीदेवी यांनी त्यांच्या अभिनयाने अनेकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. आता बोनी कपूर यांना जेव्हा श्रीदेवी यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिले जाणून घ्या.

मी जिवंत असे पर्यंत तरी हे होऊ देणार नाही, श्रीदेवींच्या या प्रश्नावर का चिडले बोनी कपूर
श्रीदेवी, बोनी कपूर
| Updated on: Apr 03, 2024 | 5:18 PM
Share

बोनी कपूर यांचा ‘मैदान’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या सिनेमात अजय देवगण हा मुख्य भूमिकेत आहे. सध्या या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. आता नुकताच बोनी कपूर यांना श्रीदेवीच्या बायोपिकबद्दल प्रश्न विचारण्यात आला. श्रीदेवी यांचा बायोपिक बनवावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे असा प्रश्न विचारताच त्यानी याला नकार दिला. कदाचित हे उत्तर ऐकून श्री देवी यांच्या चाहत्यांना पण धक्का बसेल.

बोनी कपूर म्हणाले की, ‘श्रीदेवी अतिशय खाजगी व्यक्ती होती आणि तिचे आयुष्य खाजगी ठेवले पाहिजे. त्यामुळे तिच्यावर बायोपिक बनण्याची शक्यता नाही आणि मी जिवंत असेपर्यंत तरी असं होऊ देणार नाही.

राष्ट्रीय पुरस्कार

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या मा या चित्रपटात त्या दिसल्या होत्या. या सिनेमातील श्रीदेवीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. ज्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. मात्र, पुरस्कार मिळण्यापूर्वीच श्रीदेवी यांचे निधन झाले होते. श्रीदेवी यांच्या निधनामुळे नंतर बोनी कपूर, जान्हवी आणि खुशी यांना हा पुरस्कार स्वीकारला होता. 2018 साली प्रदर्शित झालेल्या झिरो चित्रपटात श्रीदेवी कॅमिओ करताना दिसल्या होत्या.

श्रीदेवी यांचे 2018 मध्ये निधन

24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचे दुबईत निधन झाले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. श्रीदेवी यांचे पार्थिव त्यानंतर भारतात आणण्यात आले होते आणि येथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. बोनी कपूर म्हणाले की, “मी माझ्या पहिल्या पत्नीशी प्रामाणिक होतो. लग्नाआधी श्रीही मोनासोबत घरी राहायची. त्यावेळी माझ्या आईने श्रीच्या हातात थाळी दिली आणि मला राखी बांधायला सांगितली होती. बोनी कपूर यांच्या श्रीदेवीबद्दल असलेल्या भावना त्यांना माहित होत्या. तेव्हा बोनी कपूर म्हणाले की, थाट ठेव. तुला काही करण्याची गरज नाही. कारण मोनाला माझ्या आणि श्रीबद्दल सगळं माहीत होतं, पण मी काहीच करू शकत नव्हतो. कारण आम्ही एकमेकांवर प्रेम करतो.”

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.