AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करिश्मा,करीना 19 वर्ष वडिलांपासून राहिल्या वेगळ्या; आई बबिताने एकटीनेच केला दोघींचा सांभाळ

करिश्मा कपूर आणि करीना 19 वर्ष वडिलांपासून वेगळ्या राहिल्या होत्या. त्यांची आई  बबिताने दोन्ही मुलींचा सांभाळ एकटीने केला आहे.

करिश्मा,करीना 19 वर्ष वडिलांपासून राहिल्या वेगळ्या; आई बबिताने एकटीनेच केला दोघींचा सांभाळ
Why Karisma and Kareena Kapoor stayed away from their father for 19 years Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 29, 2025 | 2:19 PM
Share

बॉलिवूडमधील चर्चेत राहणाऱ्या कुटुंबामधील एक कुटुंब म्हणजे कपूर. या घरातील जवळपास सर्वच पिढीने फिल्म इंडस्ट्रीवर राज्य केलं आहे. या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला सर्वांनाच उत्सुकता असते. या कुटुंबातील एक गोष्ट अशीही आहे ज्याबद्दल फार कमी जणांना माहित आहे. हे कुटुंब नेहमी सर्वाच सणांमध्ये, कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. पण करिश्मा आणि करीना या दोघी मात्र 19 वर्ष वडिलांपासून लांब राहिल्या होत्या.

आई बबिताचा संघर्ष, वडिलांपासून वेगळे होणे

बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात करिश्मा कपूर आणि करीना कपूर ही प्रसिद्ध नावे आहेत. यांचे आयुष्य पडद्यावर जितके रंगीत होते तितकेच ते खऱ्या आयुष्यातही चढ-उतारांनी भरलेले होते. विशेषतः त्यांचे कौटुंबिक जीवन. ज्यामध्ये त्यांची आई बबिताचा संघर्ष, वडिलांपासून वेगळे होणे आणि त्यांच्या संगोपनाची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही

लग्नानंतर चित्रपटांना निरोप द्यावा लागला

करिश्मा, करीनाची आई बबिता देखील एक अभिनेत्री होत्या आणि त्यांनी 1970 च्या दशकात काही चित्रपटांमध्ये काम केले. 1971 मध्ये बबिता यांनी कपूर कुटुंबाचा मुलगा रणधीर कपूरशी लग्न केले, परंतु एका अटीवर लग्नानंतर तिला चित्रपटांना निरोप द्यावा लागला. कपूर कुटुंबाची परंपरा होती की त्यांच्या सुना चित्रपटात काम करणार नाहीत. प्रेमात असल्याने बबिताने ही अट मान्य केली.

आर्थिक संकट आणि सवयींमुळे अंतर वाढले

लग्नाच्या काही वर्षांपर्यंत सर्व काही ठीक चालले. पण रणधीर कपूर यांची चित्रपट कारकीर्द घसरू लागली, आर्थिक समस्या आणि दारूच्या व्यसनाचा त्यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ लागला. 1980 च्या दशकात, रणधीर यांची कारकीर्द जवळजवळ संपली होती आणि त्यांना दारूचे व्यसन लागले होते. बबिताला हे सर्व मान्य नव्हते, विशेषतः जेव्हा त्यांच्यावर दोन मुलींची जबाबदारी होती, करिश्मा आणि करिना.

1988 मध्ये वेगळे झाले, पण घटस्फोट झाला नाही

अखेर 1987 मध्ये बबिताने रणधीरपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आणि 1988 मध्ये त्यांनी रणधीर यांच्यापासून त्या कायमच्या वेगळ्या झाल्या. तथापि, त्यांचा कधीही घटस्फोट झाला नाही. बबिता दोन्ही मुलींसह वेगळ्या राहू लागल्या आणि त्यांनी दोघींनाही एकटीनेच वाढवले आहे.

बबिताने परंपरा मोडली, तिच्या मुलीला अभिनेत्री बनवले

कपूर कुटुंबात एक परंपरा होती की कुटुंबातील सून आणि मुली चित्रपटात काम करत नव्हत्या. पण बबिताने ही परंपरा मोडली आणि करिश्माला अभिनेत्री बनवण्याचा निर्णय घेतला. अनेक संघर्ष आणि सामाजिक टीकेला तोंड देत, करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ चित्रपटातून पदार्पण केले.

बबिताच्या कठोर परिश्रम आणि धाडसाचेच फळ होते की करिश्मा 90 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक बनली. नंतर, करीना कपूरनेही तिच्या आई आणि बहिणीच्या पाठिंब्याने ‘रेफ्यूजी’ चित्रपटाद्वारे अभिनय जगात प्रवेश केला.

19 वर्षांनंतर दोघांमध्ये समेट झाला

जवळजवळ 19 वर्षे वेगळे राहिल्यानंतर, 2007 मध्ये रणधीर आणि बबिता यांच्यात समेट झाला. त्यांच्या मुलींसाठी देखील हा एक भावनिक क्षण होता. रणधीर आणि बबिता अजूनही वेगळे राहत असले तरी, त्यांच्यातील कटुता बऱ्याच प्रमाणात संपली आहे. ते अनेकदा त्यांच्या मुलींच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आणि खास प्रसंगी एकत्र दिसतात

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.