AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshaya Tritiya 2023 : अक्षय तृतीयेच्या दिवशी देवाला दाखवा या पदार्थांचा नैवेद्य, मिळेल सुख समृद्धीचा आशीर्वाद

यावर्षी 22 एप्रिला म्हणजेच उद्या अक्षय्य तृतीया व्रत पाळण्यात येणार आहे. त्याची शुभ वेळ सकाळी 07:49 ते दुपारी 12:20 दरम्यान असेल. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते.

Akshaya Tritiya 2023 : अक्षय तृतीयेच्या दिवशी देवाला दाखवा या पदार्थांचा नैवेद्य, मिळेल सुख समृद्धीचा आशीर्वाद
अक्षय तृतीयेचा नैवेद्य Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 21, 2023 | 1:09 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला (Akshaya Tritiya 2023) विशेष महत्त्व आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी नवीन काम सुरू करणे किंवा संपत्ती खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी सोने-चांदी, वाहन, घर, गुंतवणूक इत्यादी गोष्टी अत्यंत शुभ आणि लाभदायक मानल्या जातात. यावर्षी 22 एप्रिला म्हणजेच उद्या अक्षय्य तृतीया व्रत पाळण्यात येणार आहे. त्याची शुभ वेळ सकाळी 07:49 ते दुपारी 12:20 दरम्यान असेल. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. जर तुम्ही व्रत पाळत असाल तर अशा पदार्थांचा नैवेद्य दाखवा जे भगवान विष्णूला खूप प्रिय आहेत. विशेष म्हणजे त्यांना अर्पण केल्यानंतर कुटुंबातील सदस्यही प्रसादाच्या रूपात त्यांचा स्वीकार करू शकतात. जाणून घेउया  अर्पण केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि तुम्हाला पूर्ण फळ देईल.

केशर पिवळा गोड भात

पिवळ्या तांदळाच्या गोड भाताचा प्रसाद हा भगवान विष्णूला प्रसन्न करण्याचा अतिशय सोपा उपाय आहे. धार्मिक मान्यतेनुसार, पिवळा रंग भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. त्यामुळे त्यांना पिवळ्या वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही देवाला गोड पिवळ्या भाताचा नैवेद्य दाखवू शकता आणि नंतर प्रसाद म्हणून घेऊ शकता.

श्रीखंड

उपवासात श्रीखंडाचा प्रसाद अर्पण करणे आणि खाणे फार शुभ मानले जाते. धार्मिक महत्त्वासोबतच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. दूध आणि फळांपासून तयार केल्याने शरीराला ताकद मिळते आणि उपवासातही खाता येते. मुलांनाही ते खूप आवडते.

पुरण पोळी

ही एक प्रकारची गोड भाकरी आहे जी बहुतेक महाराष्ट्रात खाल्ली जाते. पिवळा आणि गोड असल्याने भगवान विष्णूला नैवेद्य दाखवणे चांगले मानले जाते. ते बनवण्यासाठी हरभरा डाळ आणि गूळ किंवा साखर वापरली जाते. हे उपवासाच्या वेळी देखील खाल्ले जाऊ शकते.

लौकीची खीर

लौकीचा हलवा किंवा खीर खूप चविष्ट असते. अनेक ठिकाणी याला दुधी हलवा असेही म्हणतात. हा पदार्थ, दूध आणि साखर घालून तयार केला जातो. उपवासाच्या वेळी हे फराळ म्हणूनही खाता येते.

थालीपीठ

हा एक पोळीचाच प्रकार आहे. जे वेगवेगळ्या  पिठांपासून बनविले जाते. भरपूर प्रमाणात पोषक असल्याने ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तांदूळ, बाजरी, बेसन आणि गव्हाचे पीठ मिसळून हा मराठी पदार्थ तयार केला जातो.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.