AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीच्या दिवसात संत्री खाण्याचे 5 जबरदस्त फायदे, जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ

आपल्यातील प्रत्येकाला संत्र हे फळ खूप आवडत असेल. परंतु अशी काही लोक आहेत जे संत्र हे हंगामी फळं खाण्यास नकार देतात. कारण त्यांच्या घश्यात सेवनाने खोकला आणि खवखव होत असते.

थंडीच्या दिवसात संत्री खाण्याचे 5 जबरदस्त फायदे, जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ
संत्राच्या फायदा काय
| Updated on: Nov 22, 2024 | 1:55 PM
Share

थंडी सुरु झाली कि संत्र या फळाचा हंगाम सुरु झाला. तसेच चवीला आंबट-गोड असलेला हे फळ सगळ्यांच्या आवडीचे असतं. पण या हंगामी फळाचा आस्वाद घेणं अनेक लोकं टाळतात. कारण संत्र्याला आंबट चव असते आणि बहुतेक लोकांना थंडीच्या दिवसात खोकला आणि घसा खवखवण्याचा त्रास होतो. म्हणून अनेक जण संत्र खात नाही.

त्यातच अशी काही लोकं आहेत ज्यांना हंगामी फळ खाण्याची खूप इच्छा असते, परंतु लोकांना वाटते की या फळांची चव आंबट असल्याने घशाशी संबंधित समस्या वाढू शकते. तुमचाही असाच विश्वास आहे का? चला तर मग जाणून घेऊया आणि संत्र खाण्याची योग्य वेळ आणि या फळाचे जबरदस्त फायदे

संत्री का खावी?

हिवाळ्यात आपल्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती लक्षणीयरीत्या कमी होत असते. ज्यामुळे ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव वाटणे अश्या समस्या खूप लवकर होत असतात. त्यामुळे हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. विशेषतः या ऋतूत हंगामी फळे आणि भाज्या रोज खाव्यात. प्रत्येक हंगामी फळे आणि भाज्यांचे त्या ऋतूत खाण्याचे फायदे आहेत. संत्रा हे हिवाळ्यात येणाऱ्या हंगामी फळांपैकी एक आहे, जे या ऋतूत खाणे खूप चांगले मानले जाते. हे हिवाळ्यातील सुपरफूड आहे, या फळामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात.

हे फळ खूप फायदेशीर आहे

१) प्रतिकारशक्तीसाठी सर्वोत्तम

संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि मुक्त रॅडिकल्सपासून होणारे नुकसान टाळण्यास मदत करते. हे रोज खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

२) हृदयाचे आरोग्य वाढेल

अहवालात असे म्हटले आहे की संत्री आणि द्राक्ष ही फळ खाल्ल्याने स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते. संत्र्यात असलेले फ्लेव्होनॉइड्स हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करतात.

३) सर्दीपासून बचाव होतो

थंडीत मध्ये आपल्या शरीरात व्हिटॅमिनसची कमतरता झाल्याने सर्दी होते. शरीरात सामान्य सर्दीमध्ये व्हिटॅमिन सी फायदेशीर असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हिवाळ्यात संत्री खाल्ल्याने सर्दीपासून बचाव होतो.

४) वजन कमी होण्यास मदत होईल

संत्र्यांमध्ये असलेले फायबर तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. कारण संत्र्यातील फायबर आपल्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते किंवा जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करते. यात फायबरदेखील चांगल्या प्रमाणात असते, जे पाचन आरोग्यास प्रोत्साहित करते.

५) त्वचेसाठी सर्वोत्तम

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे त्वचेसाठी चांगलं मानलं जातं. हे दररोज खाल्ल्याने त्वचा मुलायम आणि गुळगुळीत राहण्यास मदत होते.

संत्री किती वाजता खावी

तुम्हाला जरा हे हंगामी फळ खायचे असल्यास सकाळच्या सुमारास म्हणजे दुपारी १२ च्या आसपास संत्र खाऊ शकता. यामुळे तुम्हाला खोकला तसेच घश्यात खवखव देखील होणार नाही. तसेच संत्र संध्याकाळी किंवा रात्री खाणे टाळा.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल