AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेलकट पदार्थ खूप खाल्लेत ? करा केवळ ‘हे’ उपाय, अपचन, गॅसेसचा होणार नाही त्रास

बऱ्याच वेळेस जास्त तेलकट पदार्थ खाल्याने पोट फुगतं. अपचन आणि गॅसेसचा त्रास होऊ लागतो. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर हे उपाय करुन पहा.

तेलकट पदार्थ खूप खाल्लेत ? करा केवळ 'हे' उपाय, अपचन, गॅसेसचा होणार नाही त्रास
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 19, 2023 | 9:21 AM
Share

नवी दिल्ली – अनेक वेळा लोकं एखादे फंक्शन, पार्टी किंवा लग्नात जास्त तेलकट पदार्थ (oily food) खातात. जेवण आवडलं म्हणून दोन घास जास्तीचे खाल्ले जातात. हे पदार्थ चविष्ट तर असतात पण त्यामुळे पोटात गॅस (gases) तयार होतो. तसेच पोट फुगणे, अपचन होणे, (indigestion) आंबट-करपट ढेकर येणे, असा त्रास होऊ लागतो. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला परत कुठलाच पदार्थ खायची इच्छा होत नाही. तुम्हालाही कधी असा त्रास होतो का ? तसं असेल तर पुढल्या वेळेस तेलकट पदार्थ खाल्यानंतर काही उपाय करून पहा. यामुळे तुमचा त्रास (stomach problem) कमी होऊ शकेल.

पण जास्त तेलकट पदार्थ खाणं आरोग्यासाठी हानिकारक असते. जास्त तेलकट अन्न खाल्ल्याने गॅसेस, अपचन, पोट आणि छातीत जळजळ होणे असे त्रास तर होतातच, त्याशिवाय हृदय आणि यकृताचे नुकसानही होते. तेलकट पदार्थांमध्ये कॅलरीज, ट्रान्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात, ज्यामुळे लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे, टाइप-2 मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब इत्यादी समस्या किंवा आजार उद्भवू शकतात. मात्र काही उपायांच्या मदतीने तेलकट पदार्थ खाल्यानंतर होणारा त्रास कमी करता येतो. पुढल्या वेळेस जर तुम्ही तेलकट पदार्थ खाल्ले, तर काही महत्त्वाच्या गोष्टी पाळा.

तेलकट पदार्थ खाल्यावर काय काळजी घ्यावी ?

कोमट पाणी प्यावे

जर तुम्ही जास्त तेलकट पदार्थ खाल्ले असतील तर अनेक वेळा अपचन, आंबट ढेकर येणे, पोट फुगणे, गॅस इत्यादी समस्या निर्माण होतात.तुम्हालाही असा त्रास झाला तर लगेच कोमट पाणी प्यावे. त्यामुळे पचनसंस्था सक्रिय होते. पाणी पोटाला थंडावा देते. जर तुम्ही पुरेसे पाणी प्यायले नाही तर लहान आतडे अन्न नीट पचवू शकत नाही. अनेक वेळा जास्त तेलकट आणि जंक फूड खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. कोमट पाणी प्यायल्याने ही समस्या दूर होते, पोट साफ राहते.

शतपावली केल्याने मिळेल आराम

जर तुम्ही जास्त पदार्थ खाल्ले असतील व त्यामुळे त्रास होत असेल तर थोडा वेळ फेऱ्या माराव्यात किंवा चालायला जावे. जास्त जड जेवण किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने पोट जड होते. चालण्याने आपली पचनशक्ती सुधारते. पचन सुधारण्यासाठी 15 ते 30 मिनिटे चालावे. केवळ तेलकट पदार्थ खाल्यवरच नव्हे तर रोजच्या जेवणानंतरही 15 मिनिटे चालल्यास किंवा फेऱ्या मारल्यास पचनसंस्था आणि आतडे सक्रिय राहण्यास मदत होते. पचन सुधारते व पोटाला त्रास होत नाही.

प्रोबायोटिक्स सेवन करा

प्रोबायोटिक्स युक्त पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया तयार होतात तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते. प्रोबायोटिक्स युक्त दह्याचे दररोज सेवन करा. तेलकट पदार्थ खाल्ल्याने त्रास होत असेल तर एक वाटी दही खा. त्याने पोटाला आराम मिळेल.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Follow Us
5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब...
मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...