टाकाऊतून टिकाऊ ! आवळ्याच्या बियांपासून पतंजलीने रचला इतिहास; आयुर्वेदाच्या ताकदीला जगाचा सलाम
आवळ्याच्या बियांना आधी फेकून दिले जायचे आणि आता पतंजली त्यास खरेदी करत आहे. ७० हजाराहून जास्त शेतकऱ्यांना नवा कमाईचा मार्ग मिळाला आहे. ज्यामुळे गावातील लोकांना प्रोत्साहन मिळाले आहे.

आवळ्याला भारतात आर्युर्वेदीक फळ म्हणून मोठे स्थान आहे. इम्युनिटीपासून ते पचनापर्यंत प्रत्येक घरात या फळाची महती माहिती आहे. परंतू या फळाच्या बियांकडे आजपर्यंत कोणाचे लक्ष गेले नव्हते. या बियांना नेहमीच फेकले जायचे. मात्र या बेकार समजू नये.आता पतंजली रिसर्चने या जुन्या विचारांना बदलले आहे.आचार्य बालकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्रीय दृष्टीकोणातून या आवळ्यांच्या बियांवर अभ्यास केला आहे.
या अभ्यासात आढळले की आवळ्याच्या बियांमध्ये फळाच्या गरापेक्षा जास्त न्युट्रिएंट्स असतात. संशोधनातून कळते की या छोट्या बियांमध्ये एंटीऑक्सीडेंट्स, ओमेगा फॅटी एसिड्स, लिनोलिक एसिड, क्वेरसेटिन, कॅटेचिन, गॅलिक एसिड, फ्लेव्होनॉयड्स आणि सॅपोनिन्स खूप जास्त असते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर या बियामध्ये असे एलिमेंट्सचा एक पॉवरफूल मिक्सर असते. जे हृदय, त्वचा, केस, इम्युनिटी आणि एवढेच नव्हे तर मेंटल हेल्थला देखील सपोर्ट करते.
अनेक आयुर्वेदिक प्रोडक्ट्स
या निकालाचा वापर करुन पतंजलीने अनेक आयुर्वेदिक उत्पादने तयार केली आहेत. यात हृदयास सपोर्ट करणारे कॅप्सुल, स्कीन आणि केसांच्या देखभालीसाठी फायटोन्युट्रिएंट ऑईल, स्ट्रेस आणि सूज कमी करण्यास मदत करणारी हर्बल टॅबलेट्स, डायबिटीज मॅनेजमेंटसाठी खास सप्लीमेंट्स सामील आहे. याच यशावर कोणाचेही लक्ष गेले नाही.
आयुष मंत्रालय, CSIR आणि अनेक आंतरराष्ट्रीय सायन्टीफिक बॉडीजने मॉडर्न आयुर्वेदात याच्या योगदानाच्या रिसर्चला मान्यता दिली आहे. एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की हे संशोधन नैसर्गिक मेडिसिनमध्ये ग्लोबल लीडर म्हणून भारताची स्थिती मजबूत होते. या स्टडीचा परिणाम प्रयोगशाळांवर देखील झाला आहे. यामुळे तीन गोष्टींत बदल झाला आहे.
70 हजार शेतकऱ्यांचा फायदा
आवळ्याच्या बियांना आधी फेकले जात होते. आता त्यांची खरेदी पतंजली करत आहे. ७० हजाराहून अधिक शेतकऱ्यांना कमाईचे नवे साधन मिळाले आहे.ग्रामीण क्षेत्रात रोजगार मिळत आहे. बियांमुळे झिरो वेस्ट हर्बल शेतीला प्रोत्साहन मिळाले आहे. आता फळाचे कोणताही भाग वाया जात नाही. ज्यामुळे ही प्रक्रिया इको फ्रेंडली झाली आहे. आवळ्याच्या बियांपासून तयार केलेले प्रोडक्ट आता अमेरिका, युरोप आणि साऊथ ईस्ट आशियात एक्सपोर्ट केले जात आहे. ज्यामुळे भारतासाठी व्यापारसाठी नवीन संधी खुल्या होणार आहेत.
नॅशनल टार्गेटला पूर्ण करते हे संशोधन
पतंजलीच्या आवळ्या बियांच्या संशोधनातून आर्थिक सुधारणा, पर्यावरणाची स्थिरता आणि सायन्टीफिक इनोव्हेशनशी संबंधित आहे. ग्रामीण आर्थिक परिणाम : शेतकरी नेहमी आवळा बियांना कचरा समजत होते. परंतू आता बिया खरेदी करण्याची प्रोग्रॅम अंतर्गत शेतकरी आता बिया खरेदी करत आहेत. ज्यामुळे त्यांना उत्पन्नाचे एक साधन मिळाले आहे. पतंजलीने एक संघटित पुरवठा चेन बनवली होती. ज्यामुळे अनेक राज्यात ७५ हजाराहून जास्त शेतकरी कुटुंबांना फायदा मिळत आहे.
पर्यावरणाची स्थिरता: हर्बल फॉर्म्युला बनवण्यासाठी आवळा बियांचा वापर करुन पतंजलीने एक सर्क्युलरी इकॉनॉमी मॉडेलला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे फळाच्या सर्व भागाचा उपयोग होतो आहे. ज्यामुळे ऑर्गेनिक कचरा कमी होतो आणि हर्बल सोर्सिंग टिकाऊ होतो.
सायटिफिक इव्होवेशन: पतंजलीच्या संशोधनातून कळले की आवळ्याच्या बियांमध्ये प्रोटीनने भरपूर ऑईल असते. लिनोलिक एसिड आणि ओमेगा फॅटी एसिड असते, त्वचेचे उपोषण आणि हार्मोनल रेग्युलेशनसाठी योग्य बनवते. यामुळे फंक्शनल फूड्स, आयुर्वेद-बेस्ड कॉस्मेटिक्स आणि थेराप्यूटिक सप्लीमेंट्ससाठी नवे दालन उघडले आहे.
अनेक पेटेंटसाठी दावा
2024 मध्ये ,पतंजलीने आवळा बियाच्या एक्सट्रॅक्ट फॉर्म्युलेशनवर अनेक पेटेन्ट फाईल केले आहे. ज्यामुळे भारताला हर्बल इनोव्हेशनमध्ये ग्लोबल ओळख मिळाली आहे. संशोधनाचे निकाल एकेडमिक जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहे. ज्यात AYUSH,इंडियन जर्नल ऑफ नेच्युरल प्रोडक्ट्स आणि इंटरनॅशलन जर्नल ऑफ हर्बल रिसर्चचा समावेश आहे. त्यामुळे हर्बल सायन्समध्ये भारताची पत मजबूत झाली आहे. पतंजलीचा आवळा सीड रिसर्च आयुर्वेदिक इनोव्हेशन, सस्टेनेबिलीटी आणि नॅशनल प्राईडमध्ये एक केस स्टडी बनली आहे. जे दाखवते कसे देशी ज्ञान, जेव्हा सायन्टीफिक व्हॅलिडेशनला सपोर्ट होतो तेव्हा जगासाठी ब्रेकथ्रु हेल्थ सोल्युशन लावू शकते.
