AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही फळं खाल्ल्यावर चुकूनही पाणी पिऊ नका, नाहीतर…

Water After Fruits Good Or Bad : अनेक फळं अशी असतात, जी खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळावे. नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो.

ही फळं खाल्ल्यावर चुकूनही पाणी पिऊ नका, नाहीतर...
Image Credit source: freepik
| Updated on: Aug 26, 2023 | 5:23 PM
Share

नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : फळांचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते, हे सर्वांनाच माहीत आहे. फळांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, सुक्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लूकोज मुबलत असतात, ज्यामुळे शरीराला एनर्जी आणि पोषक तत्वं मिळतात. फळं खाणे आरोग्यासाठी व तब्येतीसाठी लाभदायक असते. पण फळं खाण्याची योग्य पद्धतदेखील माहिती असली पाहिजे. अशी अनेक फळं आहेत, ज्यांचे सेवन केल्यानंतर पाणी पिणे (Never Drink Water After Eat These Fruits) टाळले पाहिजे. अन्यथा फळांपासून फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. अशी फळे कोणती हे जाणून घेऊया.

ही फळं खाल्ल्यावर पिऊ नये पाणी

केळी

केळं काल्ल्याने बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. पण केळं खाल्ल्यावर लगेचच पाणी प्यायले तर त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

पेरू

फायबर, व्हिटॅमिन ए आणि सी , फॉलिक ॲसिड, पोटॅशिअम आणि कॉपर ही पोषक तत्वा मुबलक प्रमाणात असलेला पेरू आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक असतो. मात्र पेरू खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. त्यामुळे तुमची पचनसंस्था बिघडू शकते. पेरूवर पाणी प्यायल्यास पचनक्रिया ठप्प होते.

टरबूज

टरबूजामध्ये भरपूर पाणी असते. हे फळ पाण्याने भरलेले आहे. मात्र, टरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो.

डाळिंब

डाळिंब हे अतिशय रसाळ, मधुर, गोड फळ आहे. याच्या सेवनामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. डाळिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीरही असते. डाळिंब खाल्ल्याने रक्त तर वाढतेच पण रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते. मात्र, डाळिंब खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नका. नाहीतर ॲसिडिटी आणि उलटीचा त्रास होऊ शकतो.

आंबट फळांवरही पाणी पिणे टाळावे

संत्र, द्राक्ष, आवळा आणि मोसंब, अशी आंबट फळ खाल्ल्यानंतरही पाणी पिऊ नये. आंबट फळांच्या सेवनानंतर पाणी प्यायलं तर पीएच लेव्हल बिघडू शकते, त्यामुळे पचनसंस्था खराब होण्याची शक्यता असते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....