AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय, पण किती अंडी खायची माहितीये? जाणून घ्या महत्त्वाच्या टीप्स

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. त्यामुळे अनेक समस्या डोकं वर काढतात. त्यामधील एक समस्या म्हणजे वाढणारं वजन... अशात अनेक जण वजन कमी करण्यासाठी ठराविक आहार घेतात. त्यामुळे जाणून घ्या योग्य टीप्स...

वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय, पण किती अंडी खायची माहितीये? जाणून घ्या महत्त्वाच्या टीप्स
| Updated on: Jun 05, 2026 | 1:06 PM
Share

वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायामच नाही तर, आहार देखील तितकाच महत्त्वाचा असतो. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी आहारात अंडी असणं फार महत्त्वाचं आहे… पण वजन कमी करताना किती अंडी खायची? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो. एवढंच नाही तर, आपण अंड्यातील पिवळा बलक खाऊ शकतो का? असे अनेक प्रश्न आणि शंका आपल्या मनात येतात. त्यामुळे जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आणि टीप्स माहिती असल्या पाहिजे…

ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांना अंड्यातील पिवळा बलक पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. अंड्याच्या पांढऱ्या भागात फक्त प्रथिने असतात. पण, पिवळ्या बलकामध्ये जीवनसत्त्वे ए, डी, ई, बी12, लोह, जस्त, ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि कोलीन असतात, जे मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये कोलेस्ट्रॉल असतं. पण आहारातील कोलेस्ट्रॉलचा आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलवर तितक्या लवकर परिणाम होत नाही.

जर तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हृदयरोग असेल, तरच तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अंड्यातील पिवळ्या बलकाचे प्रमाण कमी करा. ज्यांना हे आजार नाहीत, त्यांच्यासाठी दिवसातून एक पिवळा बलक खाल्ल्याने वजन कमी होण्यास अडथळा येणार नाही, उलट शरीराला आवश्यक ऊर्जा मिळेल. केवळ अंडी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होणार नाही, ते तुम्ही ती कशी शिजवता यावर अवलंबून आहे.

ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी सकाळी नाश्त्यासोबत उकडलेली अंडी खाणं उत्तम आहे. यामुळे दिवसभर शरीराची चयापचय क्रिया चांगली राहण्यास मदत होईल. जर ऑम्लेट बनवायचंच असेल, तर ते नॉन-स्टिक पॅनमध्ये थोडेसे ऑलिव्ह तेल किंवा खोबरेल तेल वापरून बनवणे उत्तम. तेल जास्त झाल्यास, अंडी खाण्याचे सर्व फायदे नाहीसे होतील.

जर तुम्ही जिममध्ये जात असाल किंवा जोरदार व्यायाम करत असाल, तर तुमच्या शरीराला अधिक प्रथिनांची गरज असते. एका मोठ्या उकडलेल्या अंड्यामध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रथिने असतात. डॉक्टर लहान मुलांना देखील अंडी खाण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला कोणत्या समस्या असतील तर, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या… ज्यामुळे कोणती अडचण येणार नाही.

Follow Us
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
Chhatrapati Sambhajinagar | महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त, आकडा जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!