AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : वातावरण बदलतंय | आजारी पडण्यापासून वाचायचं असेल तर संध्याकाळी हे 3 पदार्थ खाणं टाळा, जाणून घ्या!

या दिवसांमध्ये आपण अनेक वेगवेगळे पदार्थ खात असतो. पण काही असे पदार्थ असतात जे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला हानी पोहोचू शकते. तर आता आपण काही अशा पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत जे खाणे टाळले पाहिजे. जेणेकरून तुम्हाला गंभीर समस्यांच्या सामना करावा लागणार नाही.

Health : वातावरण बदलतंय | आजारी पडण्यापासून वाचायचं असेल तर संध्याकाळी हे 3 पदार्थ खाणं टाळा, जाणून घ्या!
| Updated on: Oct 19, 2023 | 10:11 AM
Share

मुंबई : सध्या हवामानात अचानक बदल होत आहेत. बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजार पसरताना दिसत आहेत. त्यामुळे बहुतेक लोक मोठ्या प्रमाणात आजारी पडताना दिसत आहेत. मग सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू  मलेरिया अशा अनेक आजारांचा सामना लोकांना करावा लागत आहे. तसेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. त्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. तर या बदलत्या वातावरणाच्या दिवसांमध्ये संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी योग्य तो आहार घेणं खूप गरजेचे आहे.

बदलत्या वातावरणामध्ये तुमच्या आहारात काकडीचा समावेश करू नका. कारण काकडी खाल्ल्यामुळे पोट थंड होते, त्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकल्याचा त्रास निर्माण होऊ शकतो. तसेच संध्याकाळच्या वेळी काकडी खाणे टाळावे नाहीतर तुम्हाला खोकल्याची समस्या निर्माण होऊ शकते. तर संध्याकाळच्या वेळी जास्तीत जास्त गरम पदार्थ खा.

सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये बहुतेक लोक संध्याकाळच्या वेळी दही खातात. काही लोक कोशिंबीर, रायता मोठ्या प्रमाणात खाताना दिसतात. पण हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाहीये. संध्याकाळच्या वेळी दही खाल्ल्यामुळे सर्दी, खोकला, कफ या समस्या निर्माण होतात. तसेच तुम्हाला फुफ्फुसाशी संबंधित समस्या देखील निर्माण होतात. त्यामुळे तुम्ही दुपारी दही खा पण संध्याकाळच्या वेळी दही चुकूनही खाऊ नका.

नारळ पाणी हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण या बदलत्या वातावरणामध्ये नारळ पाणी पिऊ नका. संध्याकाळच्या वेळी तर चुकूनही नारळ पाणी पिऊ नका. कारण आता हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि ह्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा नाही तर उबदार वाटणे आवश्यक असते. त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही नारळ पाणी पिऊ नका, नाहीतर तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास निर्माण होऊ शकतो.

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.