AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : वातावरण बदलतंय | आजारी पडण्यापासून वाचायचं असेल तर संध्याकाळी हे 3 पदार्थ खाणं टाळा, जाणून घ्या!

या दिवसांमध्ये आपण अनेक वेगवेगळे पदार्थ खात असतो. पण काही असे पदार्थ असतात जे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला हानी पोहोचू शकते. तर आता आपण काही अशा पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत जे खाणे टाळले पाहिजे. जेणेकरून तुम्हाला गंभीर समस्यांच्या सामना करावा लागणार नाही.

Health : वातावरण बदलतंय | आजारी पडण्यापासून वाचायचं असेल तर संध्याकाळी हे 3 पदार्थ खाणं टाळा, जाणून घ्या!
| Updated on: Oct 19, 2023 | 10:11 AM
Share

मुंबई : सध्या हवामानात अचानक बदल होत आहेत. बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजार पसरताना दिसत आहेत. त्यामुळे बहुतेक लोक मोठ्या प्रमाणात आजारी पडताना दिसत आहेत. मग सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू  मलेरिया अशा अनेक आजारांचा सामना लोकांना करावा लागत आहे. तसेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. त्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. तर या बदलत्या वातावरणाच्या दिवसांमध्ये संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी योग्य तो आहार घेणं खूप गरजेचे आहे.

बदलत्या वातावरणामध्ये तुमच्या आहारात काकडीचा समावेश करू नका. कारण काकडी खाल्ल्यामुळे पोट थंड होते, त्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकल्याचा त्रास निर्माण होऊ शकतो. तसेच संध्याकाळच्या वेळी काकडी खाणे टाळावे नाहीतर तुम्हाला खोकल्याची समस्या निर्माण होऊ शकते. तर संध्याकाळच्या वेळी जास्तीत जास्त गरम पदार्थ खा.

सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये बहुतेक लोक संध्याकाळच्या वेळी दही खातात. काही लोक कोशिंबीर, रायता मोठ्या प्रमाणात खाताना दिसतात. पण हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाहीये. संध्याकाळच्या वेळी दही खाल्ल्यामुळे सर्दी, खोकला, कफ या समस्या निर्माण होतात. तसेच तुम्हाला फुफ्फुसाशी संबंधित समस्या देखील निर्माण होतात. त्यामुळे तुम्ही दुपारी दही खा पण संध्याकाळच्या वेळी दही चुकूनही खाऊ नका.

नारळ पाणी हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण या बदलत्या वातावरणामध्ये नारळ पाणी पिऊ नका. संध्याकाळच्या वेळी तर चुकूनही नारळ पाणी पिऊ नका. कारण आता हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि ह्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा नाही तर उबदार वाटणे आवश्यक असते. त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही नारळ पाणी पिऊ नका, नाहीतर तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास निर्माण होऊ शकतो.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.