AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : फळे खाल्ल्यानंतर ताबडतोब चुकूनही पिऊ नका पाणी, अन्यथा होतील या समस्या

फळं खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे पचन प्रक्रिया धीमी होते, ज्यामुळे अन्न पचन होत नाही. आपल्या पचनाशी संबंधित अवयवांचे पीएच पातळी बिघडते. (Do not drink water immediately after eating fruit, otherwise these problems will occur)

Health Tips : फळे खाल्ल्यानंतर ताबडतोब चुकूनही पिऊ नका पाणी, अन्यथा होतील या समस्या
पाणी
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 25, 2021 | 4:42 PM
Share

नवी दिल्ली : सध्या आपल्याला कोरोना महामारीपासून बचाव करायचा आहे आणि आपली प्रतिकारशक्ती बळकट करायची आहे. यासाठी दररोज ताजी फळे खाणे फार महत्वाचे आहे. जर जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषण तत्वयुक्त फळ दररोज मोठ्या प्रमाणात खाल्ली तर एखाद्या व्यक्तीचा आजारी पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. दररोजच्या आहारात हंगामी आणि ताजी फळे समाविष्ट करण्याची देखील डॉक्टर शिफारस करतात. परंतु आपल्याला प्रत्येकाकडून एक सामान्य सल्ला मिळेल, तो असा की फळे खाल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. जाणून घ्या यामागचे कारण काय आहे. (Do not drink water immediately after eating fruit, otherwise these problems will occur)

पोटात पेटके किंवा गॅसची समस्या होऊ शकते

बहुतेक फळ नैसर्गिकरित्या गोड असतात. साखर आणि यीस्टची मात्रा फळांमध्ये जास्त असते, ज्यास योग्य पचवणे आवश्यक आहे. आपण जे जेवण खातो ते पोटापर्यंत पोचल्यावर आपले पोट ते पचवण्यासाठी एक प्रकारचे अॅसिड सोडते. परंतु जर आपण फळ खाल्ले आणि ताबडतोब पाणी प्यायले तर पाण्यामुळे त्या आम्लाची क्षमता कमकुवत होते, जे पचन प्रक्रियेस धीमे करते. म्हणून, फळं खाणे आणि त्वरित पाणी पिण्यामुळे पोटात पेटके आणि गॅसची समस्या उद्भवू शकते.

अतिसार होऊ शकतो

टरबूज, काकडी, खरबूज, लीची अशा फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. अशी फळे खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी प्यायल्यास जुलाब किंवा अतिसार होऊ शकतो, कारण पचन प्रक्रिया नकारात्मक स्वरुपात अधिक वेगवान होते.

पोटाची पीएच पातळी बिघडते

फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्यामुळे आपल्या पचनाशी संबंधित अवयवांचे पीएच पातळी बिघडते. पोटाची सामान्य पीएच पातळी आम्लीय असते, जी 1.5 ते 3.5 दरम्यान असते. तथापि, जर तुम्ही फळं खाल्ली आणि ताबडतोब पाणी प्यायलात तर पचन तंत्राची सामान्य आम्ल पातळी पाण्यात मिसळून कमी होते.

रक्तातील साखरेची पातळी वाढवते

फळं खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे पचन प्रक्रिया धीमी होते, ज्यामुळे अन्न पचन होत नाही त्यापैकी बरेच अन्न पचन तंत्रामध्येच राहते. उर्वरित अन्न चरबीमध्ये रूपांतरीत होते, ज्यामुळे रक्तातील इन्सुलिन वाढते. इन्सुलिन वाढण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका आहे, ज्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणा यासारख्या आजारांचा धोका आहे.

हे आजार होण्याची शक्यता

गोड फळे खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे अपचन, खोकला किंवा साखरेची पातळी वाढण्याची शक्यता आसते, तर लिंबूवर्गीय फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे घश्यात खवखव यासारखे त्रास होऊ शकतात. उदाहरणार्थ- पाण्यात लिंबू पिळणे ही वेगळी गोष्ट आहे आणि लिंबू चाटल्यानंतर पाणी पिण्याने शरीरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात. (Do not drink water immediately after eating fruit, otherwise these problems will occur)

इतर बातम्या

Bank Job 2021: स्टेट बँकेत ‘या’ पदासाठी भरती, 47920 रुपयांपर्यंत पगार मिळणार

गाण्यासाठी उर्दू, अरबीही शिकल्या; निशा भगत यांची गाजलेली गाणी माहीत आहे का?

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?