AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रीच्या वेळेस आंबा खाताय? जरा थांबा तज्ज्ञांनी सांगितले यामागचे गंभीर कारण, जाणून घ्या

बहुतेक लोकांना उन्हाळा आंब्यांमुळे आवडतो. आंबा हा सर्वात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या फळांमध्ये गणला जातो. पण अशातच तुम्ही जर रात्री आंबा का खाताय तर तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. चला तर मग तज्ञांकडून जाणून घेऊयात...

रात्रीच्या वेळेस आंबा खाताय? जरा थांबा तज्ज्ञांनी सांगितले यामागचे गंभीर कारण, जाणून घ्या
mangoesImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 01, 2025 | 11:43 AM
Share

आंब्याला फळांचा राजा म्हणतात. उन्हाळ्यात हे सर्वात जास्त आवडणारे फळ आहे. उन्हाळा सुरू झाला की आपल्यापैकी अनेकजण आंबा खुप आवडीने खातात. तसेच प्रत्येक ऋतूमध्ये हंगामी फळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा आंब्यांचे सेवन आरोग्यासाठी अधिक फायद्याचे ठरते. कारण त्यात व्हिटॅमिन ए, सी, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणात असते. तथापि, तज्ज्ञांच्या मते, दिवसा आंबा खाणे फायदेशीर आहे, परंतु रात्री ते खाल्ल्याने काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

आहारतज्ज्ञ आइना सिंघल सांगतात की, बहुतेक लोकांना सकाळी किंवा दुपारी आंबा खायला आवडतो. त्याच वेळी, काही लोक रात्री देखील आंब्यांचे सेवन करतात. पण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रात्री आंबा खाणे टाळावे. रात्री आंबा खाल्ल्याने आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकते, हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

पचनक्रियेवर परिणाम

रात्री शरीराची पचन प्रक्रिया मंदावते. त्यामुळे आंब्यासारखे जड आणि गोड फळ खाल्ले तर ते पचण्यास त्रास होऊ शकतो. यामुळे तुम्हाला गॅस, अपचन, पोटदुखी आणि जडपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रक्तातील साखर वाढली

आंब्यामध्ये नैसर्गिक साखर (फ्रुक्टोज) खूप जास्त असते. रात्री आंबा खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढू शकते, विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते धोकादायक ठरू शकते. झोपण्यापूर्वी साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने इन्सुलिन संवेदनशीलतेवरही परिणाम होऊ शकतो.

वजन वाढणे

आंब्यामध्ये कॅलरीज आणि साखर दोन्ही मोठ्या प्रमाणात असतात. रात्री आंबा खाल्ल्यानंतर, शरीराला कॅलरीज बर्न करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही कारण आपण रात्री कोणतीही शारीरिक हालचाल करत नाही. अशा परिस्थितीत ते फॅटच्या स्वरूपात शरीरात जमा होऊ शकते आणि वजन वाढू शकते.

झोपेचा त्रास

आंबा खाल्ल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते, ज्यामुळे शरीर पूर्णपणे विश्रांती घेऊ शकत नाही. झोपण्यापूर्वी आंबा खाल्ल्यास झोपेचा त्रास होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत झोपेची गुणवत्ता बिघडू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.