छत्र्या काढून ठेवा… अलर्ट आला, मुंबईकरांनो पुढच्या अडीच 3 तासात दाणादाण…
राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल होताना दिसत आहेत. कधी पाऊस तर कधी उष्णता बघायला मिळतंय. त्यामध्येच आता हवामान विभागाने मोठा इशारा दिला. पुढील 3 तास अत्यंत महत्वाचे आहेत.

राज्यात आज अनेक भागात हवामानात मोठा बदल झाला. विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये थेट मोठा इशारा देण्यात आला. रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. यादरम्यानच आता हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला. मुंबईसह, रायगड आणि कोकणात पुढील तीन तासात पावसाला सुरूवात होईल. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊल होईल. भारतीय हवामान विभागाने आज सकाळी नाऊकास्टमध्ये हा इशारा दिला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी आणि मुंबईमध्ये पाऊस होईल. यासोबतच पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आला. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. काही ठिकाणी पावसाच्या सरीही कोसळल्या. गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रचंड उकाडा होता. या पावसामुळे थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातीलही काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला. पुढच्या आठवड्यापर्यंत मॉन्सून राज्यात दाखल होण्याचा अंदाज आहे. मात्र, मॉन्सूनच्या पूर्वीच पाऊस कोसळताना दिसतोय. इगतपुरी शहरात अवकाळी पावसाची जोरदार सुरूवात झालीये. हवा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची सततधार सुरू आहे. अर्ध्या तासांपासून सुरू आहे पाऊस.
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचे ढग कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भात उन्हाने कहर केला. मात्र, मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळत आहे. राज्यावर सध्याच्या घडीला दुहेरी संकट बघायला मिळतंय. मोठा पाऊस होत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यावर पावसाचे सावट आहे. सतत पाऊस सुरू आहे. लातूर, धाराशिव आणि सोलापूर येथेही आज पावसाचा मोठा इशारा देण्यात आलाय.
ऐन एप्रिल आणि मे महिन्यातही पाऊस पडताना दिसला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पिंपरी चिंचवड शहरांमध्येही दुपारच्या सुमाराला अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती.शहराच्या विविध भागात विजेच्या कडकडाट सहमुसळधार पाऊस काल झाला. खेडमध्येही काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने हवामानात एक गारवा निर्माण झाला.
