AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथेनॉल हे काही नविन इंधन नाही, शंभर वर्षांपूर्वी इथेनॉलची कार धावत होती

ब्राझीलने जगातील पहिली मोठी इथेनॉल परिसंस्था (ecosystem) शून्यापासून उभारली, ज्यासाठी साहजिकच अनेक दशके लागली. भारताला त्या अनुभवातून शिकण्याचा फायदा मिळाला.

इथेनॉल हे काही नविन इंधन नाही, शंभर वर्षांपूर्वी इथेनॉलची कार धावत होती
Henry Ford's Model T could run on petrol, ethanol, or both
| Updated on: Jul 10, 2026 | 8:59 PM
Share

इथेनॉल इंधन हे काही नविन इंधन नाही. हेन्री फोर्ड ( Henry Ford ) यांनी शंभरवर्षांपूर्वी साल 1908 मध्ये  ‘मॉडेल टी’ ( Model T ) हे इथेनॉलवर चालणारे वाहन निर्माण केले होते. ब्राझील आणि अमेरिका यांसारखे देश अनेक दशकांपासून पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करीत आहेत. भारताने हे इंधन घाईघाईने आणले नसून भारत दोन दशकांहून अधिक काळापासून हे इंधन वापरत आहे. भारतात इथेनॉलचा वापर आधीच्या सरकारने सुरु केला होता. अनेक राज्यात इथेनॉल हे इंधन पेट्रोलमध्ये मिक्स केले जाते. २००४ मध्ये या कार्यक्रमाची भारताने अधिकृत घोषणा केली. आणि साल २००६ पासून अनेक राज्यात ‘E5’ (म्हणजेच पेट्रोलमध्ये ५ टक्के मिक्स ) धोरण लागू केले होते.

इथेनॉल धोरणाची घाई केली गेली का?

ब्राझील आणि अमेरिका यांसारखे देश अनेक दशकांपासून पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करीत आले आहेत. भारताचा इथेनॉलचा प्रवासही २००४ मध्ये अधिकृतपणे सुरू झाला होता. हा प्रवास दोन दशकांहून अधिक काळाचा आहे.

२००१: इथेनॉल मिश्रणाचा प्रायोगिक कार्यक्रम सुरू करण्यात आला.

२००४: या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

२००६: अनेक राज्यांमध्ये ‘E5’ (म्हणजेच ५ टक्के मिश्रण) लागू करण्यात आले.

जानेवारी २०१३ : १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाच टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धोरणात्मक आराखडा ‘गॅझेट ऑफ इंडिया’मध्ये (अधिकृत राजपत्र) जारी करण्यात आला. असे असूनही, २०१४ पर्यंत इथेनॉलचे प्रमाण १.५ टक्क्यांच्या आसपासच होते. कारण केवळ ऊसापासून पुरेसे इथेनॉल तयार करणे भारताला शक्य होत नव्हते.

मे २०१८: ‘राष्ट्रीय जैव-इंधन धोरणा’द्वारे ( National Policy on Biofuels ) कच्चा मालाचा स्रोत केवळ उसापुरता मर्यादित न ठेवता त्यात मका आणि अतिरिक्त धान्याचाही समावेश करण्यात आला. तसेच इथेनॉल उत्पादनाला संपूर्ण सरकारी मोहिमेचे स्वरूप देण्यात आले.

जून २०२१ : वाहन उत्पादक, तेल कंपन्या आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर नीती आयोगाने ( NITI Aayog ) एक तपशीलवार कृती-आराखडा ( रोडमॅप ) प्रसिद्ध केला.

ऑगस्ट २०२१ : IOCL, BPCL आणि HPCL यांनी केवळ इथेनॉल उत्पादनासाठी समर्पित प्रकल्प ( Dedicated Ethanol Plants ) उभारण्याकरिता खाजगी गुंतवणुकीला आमंत्रित करण्यात आले. या प्रकल्पांना खरेदीची हमी आणि बँकेकडून वित्तपुरवठा यांसारख्या सुविधांची जोड देण्यात आली.

 भारताने ‘E-20’ मिश्रणाचे उद्दिष्ट इतक्या वेगाने कसे साध्य केले?

२०२१ मध्ये, १० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारताला दरवर्षी सुमारे ५०० ते ६०० कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता होती. नवीन गुंतवणुकीमुळे उत्पादन क्षमता वाढल्याने, इथेनॉलची वार्षिक उपलब्धता १,२०० कोटी लिटर झाली. इथेनॉलचा पुरवठा पुरेसा उपलब्ध झाल्यामुळे, २० टक्के मिश्रणाकडे वाटचाल करणे सोपे झाले.

देशाला लाभ : २०१४-१५ पासून, इथेनॉल मिश्रणामुळे परकीय चलनात १.९७ लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे, ९५२ लाख मेट्रिक टन CO₂ उत्सर्जन कमी झाले आहे आणि १.६६ लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत.

सुरक्षित आणि जागतिक स्तरावर सिद्ध : E20 ला वाहन उत्पादकांसोबत केलेल्या अनेक वर्षांच्या चाचण्यांचा आधार आहे आणि हा मार्ग ब्राझील, अमेरिका आणि जपानसारख्या देशांनी यापूर्वीच स्वीकारला आहे.

२० वर्षांची प्रदीर्घ वाटचाल: भारताचा इथेनॉलचा प्रवास २००१ मध्ये सुरू झाला आणि टप्प्याटप्प्याने केलेले सुधारणा, उद्योगांचे सहकार्य आणि सातत्यपूर्ण गुंतवणूक यांच्या जोरावर २०२५-२६ मध्ये २०% मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

 पेट्रोल पंपावर शुद्ध पेट्रोल, E10 आणि E20 यांची सहज निवड का नाही?

भारत रिफायनरीज, टर्मिनल्स आणि पाईपलाईन्सच्या विशाल जाळ्याद्वारे एक लाखांहून अधिक पेट्रोल पंप चालवतो. देशभरात तीन स्वतंत्र प्रकारची मूळ इंधने ( base fuels ) उपलब्ध केल्यास खर्च अनेक पटींनी वाढेल आणि प्रत्येक केंद्रावर गुणवत्तेचे नियंत्रण करणे अवघड होईल.

प्रीमियम पेट्रोलशी केलेली तुलना योग्य नाही. प्रीमियम पेट्रोल हे मर्यादित प्रमाणात विकले जाणारे, विशेष घटक मिसळलेले एक विशिष्ट उत्पादन असून ते देशभरात उपलब्ध असलेले स्वतंत्र मूळ इंधन नाही.

तर शेतकऱ्यांचे-उद्योजकांचे नुकसान

याव्यतिरिक्त, सध्या अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेचाही प्रश्न आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी इथेनॉल प्रकल्प, साठवणूक आणि लॉजिस्टिक्ससाठी वर्षाला सुमारे १ लाख कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले आहे. आता पुन्हा E10 कडे वळल्यास ही गुंतवणूक वाया जाईल आणि ज्यांनी विश्वासाने हे प्रकल्प उभारले, त्या शेतकऱ्यांचे आणि उद्योजकांचे नुकसान होईल.

 E20 लागू करण्यापूर्वी वाहन उद्योगाचा सल्ला घेतला का?

या बदलाच्या प्रक्रियेत अगदी सुरुवातीपासूनच वाहन उद्योगाशी सल्लामसलत केली गेली होती. उत्पादकांशी E10 सुसंगततेबाबत २०२०-२१ मध्येच चर्चा झाली होती आणि भारताने नियोजित वेळेच्या पाच महिने आधी, जून २०२२ मध्ये E10 चे उद्दिष्ट पूर्ण केले.

E20 साठी ही प्रक्रिया अधिक सखोल होती. हे इंधन पेट्रोल पंपापर्यंत पोहोचण्यापूर्वी इंजिन कॅलिब्रेशन, इंधन प्रणाली, रबरचे भाग, उत्सर्जन आणि इंधन कार्यक्षमता या सर्व बाबींची अनेक टप्प्यांवर चाचणी घेण्यात आली. जर उत्पादकांना E20 च्या सुरक्षिततेबद्दल खात्री पटली नसती, तर त्यांनी E20 साठी वॉरंटी दिली नसती.

E20 मुळे वाहनाचा मायलेज आणि कामगिरीवर परिणाम ?

काही वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेत (मायलेजमध्ये) ३ ते ५ टक्क्यांची घट होऊ शकते. मात्र, प्रत्यक्ष कार चालवताना मायलेज हे इंधनाच्या प्रकारापेक्षा वाहन चालवण्याच्या सवयी, टायरमधील हवा (प्रेशर), सर्व्हिसिंग आणि एअर कंडिशनरचा वापर यांवर अधिक अवलंबून असते.

E20 मुळे पर्यावरणीय फायदे

पेट्रोलच्या ८४.४ च्या तुलनेत, याचे ‘रिसर्च ऑक्टेन नंबर’ (RON) सुमारे १०८.५ इतके असते. हे भारतीय पेट्रोलचे प्रभावी ऑक्टेन रेटिंग (effective octane rating) सुमारे ९५ पर्यंत वाढवते, ज्यामुळे आधुनिक इंजिनमधील ज्वलन प्रक्रिया सुधारते.

E20 साठी अनुकूलित (calibrated) केलेली वाहने अधिक सुरळीतपणे वेग घेतात.

E20 मध्ये ‘अँटी-नॉक’ (anti-knock) गुणधर्म उत्कृष्ट असतात.

E20 मुळे इंजिनची कार्यक्षमता अधिक स्वच्छ राहते आणि त्यातून होणारे सूक्ष्म कण उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होते.

E20 मुळे संपूर्ण जीवनचक्रातील कार्बन उत्सर्जन जवळपास ४० टक्क्यांनी कमी होऊ शकते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा