AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात ज्यांचं सेवन करू नये अशा ‘4 गोष्टी’!

सध्या भारतातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. आज आम्ही तुम्हाला या ऋतूत कोणत्या 4 गोष्टींचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया अशा 4 गोष्टी ज्या पावसाळ्यात खाल्ल्या तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं किंवा तुम्ही आजारीही पडू शकता.

पावसाळ्यात ज्यांचं सेवन करू नये अशा '4 गोष्टी'!
do not eat this food
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 07, 2023 | 1:41 PM
Share

मुंबई: पावसाळ्यात आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. काय खायला हवं, काय नाही याची काळजी घ्यावी लागते. बदलत्या हवामानासोबत आपल्याला आपला आहार सुद्धा बदलावा लागतो. हवामान बदललं की आजार वाढतात, रोगराई पसरते. सध्या भारतातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. आज आम्ही तुम्हाला या ऋतूत कोणत्या 4 गोष्टींचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया अशा 4 गोष्टी ज्या पावसाळ्यात खाल्ल्या तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं किंवा तुम्ही आजारीही पडू शकता.

हिरव्या भाज्या

पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांपासून दूर राहावे. या भाज्या खाताना सुद्धा भाजी बनविण्याआधी या नीट धुवून घ्याव्यात. पावसाळ्यात या भाज्यांमध्ये किडे वाढण्याचा धोका असतो, ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पालेभाज्या विशेषतः टाळाव्यात.

मांसाहार

ज्यांना मांसाहाराची आवड आहे त्यांनी या ऋतूत खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. पावसाळ्यात व्यक्तीची पचनशक्ती कमकुवत असते आणि मांसाहारी अन्न पचविण्यासाठी तुमची पचनशक्ती मजबूत असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे अशा हवामानात मांसाहारी पदार्थांचे सेवन न केल्यास उत्तम.

तळलेले अन्न

पावसाळ्यात तळलेले पदार्थ खाणे टाळावे. या ऋतूत तळलेले अन्न लवकर पचत नाही, ज्यामुळे आपल्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. यासोबतच मसालेदार पदार्थांचेही कमीत कमी सेवन करावे.

दही

पावसाच्या या ऋतूत दह्याचे सेवन शक्यतो टाळावे, असे डॉक्टरांचे मत आहे. दहीमध्ये बॅक्टेरिया असतात, ज्याचा या ऋतूत तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या ऋतूत शक्यतो दह्याचे सेवन करू नये.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द