AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाकाळात दुसऱ्या आजारांकडे दुर्लक्ष करु नका, कोणी जास्त काळजी घ्यावी? वाचा सविस्तर

कोरोनाच्या या काळात लोक नॉन-कोविड आजारांबाबत बेफिकीर होत आहेत. तर कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडणाऱ्यांपैकी जास्त संख्या जे आधीच गंभीर आजारांनी ग्रासलेले होते त्यांचीच होती.

कोरोनाकाळात दुसऱ्या आजारांकडे दुर्लक्ष करु नका, कोणी जास्त काळजी घ्यावी? वाचा सविस्तर
CORONA AND DOCTOR
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 8:00 AM
Share

मुबई : देशात कोरोना (Corona) व्हायरसच्या तिसऱ्या लाटेत बहुतेक लोकांचे लक्ष हे कोरोनापासून बचाव करण्यावर आहे. त्यासाठी लोक विविध खबरदारी घेत आहेत. यासोबतच ते रोगप्रतिकारशक्ती (health) मजबूत करण्यासाठी अनेक औषधांचा वापर करताहेत, परंतु कोरोनाच्या या काळात लोक नॉन-कोविड आजारांबाबत बेफिकीर होत आहेत. तर कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडणाऱ्यांपैकी जास्त संख्या जे आधीच गंभीर आजारांनी ग्रासलेले होते त्यांचीच होती. दिल्ली, मुंबई आणि इतर अनेक मोठ्या शहरांमधील रुग्णालयांमधून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या मोठी त्यात ज्यांना किडनी, हृदय, यकृत आणि श्वसनाचे गंभीर आजार होते. त्यांच्यामध्ये असे काही लोक होते ज्यांना या गंभीर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि चाचणी दरम्यान ते कोविड पॉझिटिव्ह आढळले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला.

डॉक्टर काय सांगतात?

डॉक्टर असेही म्हणतात की इतर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. अशा परिस्थितीत, त्यांनी त्यांचा रोग वाढू न देणे आणि त्याच्या प्रतिबंध आणि उपचारांसाठी सर्व आवश्यक पावले उचलणे महत्वाचे आहे. विशेषत: हृदयाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे. थंडीच्या काळात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सर्वाधिक असतो. अशा वेळी हृदयरोग्यांनी आवश्यक औषधे सोबत ठेवावीत. याशिवाय तुम्ही नियमितपणे स्वतःची तपासणी करून घेतली पाहिजे. कारण हृदयाशी संबंधित कोणतीही गंभीर समस्या तुमच्यासाठी घातक ठरू शकते. हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचा धोका लक्षणीय वाढतो. कर्करोगाच्या रुग्णांनीही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. यासाठी त्यांनी त्यांची औषधे नियमित घेत राहणे आणि डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहणे आवश्यक आहे.

किडनीच्या रुग्णांनी काळजी घ्यावी

मूत्रपिंडाची कोणतीही समस्या गंभीरपणे घेतली पाहिजे. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी त्यांची औषधे नियमित घ्यावीत. जर एखादी व्यक्ती डायलिसिसवर असेल तर त्याने नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. आहाराचीही काळजी घ्या. राज्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, कोरोनापासून वाचण्यासाठी आपण सर्व उपाययोजना करत आहे, मात्र त्याचवेळी इतर रोगांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

टीप-कोणतीही औषधे घेण्यापूर्वी तुमच्या नियमीत डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

Child health: लहान मुलांच्या डोक्याचा आकर का वाढतो ? काय आहे या आजारामागील कारण!!

‘हे’ पेय थकवा, कमजोरी सारख्या समस्येपासून ठेवते दूर; जाणून घ्या फायदे

हावर्ड हेल्थने सांगितल्या ‘या’ सात टिप्स… कोरोना जवळपासही फिरकणार नाही…

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.