AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Side Effects of skipping Breakfast: सकाळचा नाश्ता टाळताय ? हृदयावर होऊ शकतो परिणाम

Skipping breakfast: दिवसभराच्या कामासाठी शरीराला उर्जेची गरज असते. आणि ही उर्जा सकाळी केलेल्या नाश्त्यातून मिळते. नाश्ता टाळायची सवय असेल तर ती आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Side Effects of skipping Breakfast: सकाळचा नाश्ता टाळताय ? हृदयावर होऊ शकतो परिणाम
महाराष्ट्रीय नाश्ता- पोहेImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 26, 2022 | 3:09 PM
Share

आजचं धावपळीचं जग आणि व्यस्त दिनक्रम यामध्ये अनेक जण सकाळी नाश्ता करणं टाळतात. वजन कमी (Weight Loss) करण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीही पोटात कमी कॅलरी जातील असा विचार करून नाश्ता करत नाहीत. मात्र नाश्ता न करण्याची (skipping breakfast) ही सवय शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. सकाळचा नाश्ता किंवा न्याहरी ही आपल्या निरोगी आयुष्यासाठी (health) महत्वपूर्ण आहे. सकाळी केलेला नाश्ता दिवसभरासाठी उर्जा देतो. कामाच्या व्यापात दुपारी, जेवणाची वेळ पाळली जातेच असं नाही. त्यामुळे भूक लागून डोकं दुखणं किंवा बराच वेळ उपाशी राहिल्याने ॲसिडिटी, जळजळ यासारखे त्रास होऊ शकतात. पण सकाळी पोटभर नाश्ता केल्यास अख्ख्या दिवसाची उर्जा तर मिळतेच पण ॲसिडिटीपासूनही बचाव होतो. सकाळची न्याहरी न केल्यास आरोग्यावर तसेच हृदयावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, दिवसभर काम करण्यासाठी उर्जेचा उत्तम स्त्रोत म्हणजे नाश्ता. सकाळचा नाश्ता हा पोटभरीचा तसेच पौष्टिक असावा. यामुळे वजन नियंत्रित राहते तसेच शरीराला पर्याप्त प्रमाणात उर्जाही मिळते. तसेच सकाळी लवकर न्याहरी केल्यास पचनासंबंधित फायदेही शरीराला होतात. न्याहरी करताना प्रथिन, साखर व कर्बोदके यांचे प्रमाण संतुलित असावे. नाश्ता करताना त्यात दूध, फळे यांचाही समावेश करावा.

नाश्ता न केल्यास होतात गंभीर परिणाम

  •  सकाळी नाश्ता न केल्यास हृदयाशी संबंधित आजार वाढू शकतात.
  •  नाश्ता करणे टाळल्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका 27 टक्क्यांनी वाढतो.
  • सकाळी न्याहरी केली नाही तर पोट बराच वेळ रिकामे राहते. नाश्ता स्किप केल्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो .
  • नाश्ता करणे टाळले तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त वाढते.

नाश्ता न केल्यास होणारे अन्य नुकसान :

  • टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
  • सकाळी नाश्ता केला नाही तर रात्रीचे जेवण ते सकाळचे जेवण यामध्ये बराच काळ पोट रिकामे राहते. आणि जास्त खाल्ले जाते. त्यामुळे वजन वाढून व्यक्ती स्थूल होण्याची शक्यता वाढते.
  • नाश्ता न केल्यास भुकेमुळे डोकेदुखी, मायग्रेन, जळजळ, ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्याचा आपल्या तब्येतीवर गंभीर परिणाम होतो.
  • सकाळच्या वेळेत नाश्ता न केल्यास कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
  • नाश्ता न केल्यास पचनाशी संबंधित विकार होऊ शकतात. त्यामुळ केस गळणे, तुटणे अशा इतर समस्याही उद्भवू शकतात.
  • हे सर्व टाळायचे असेल तर सकाळी पौष्टिक व पोटभर नाश्ता करावा.
Follow Us
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.