AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हिटॅमिन्सचे अति सेवनही ठरू शकते हानिकारक, जाणून घ्या माहिती

शरीरातील व्हिटॅमिन्सची (जीवनसत्त्व) कमतरता जशी हानिकारक असते, तसेच त्याचे अधिक प्रमाणात सेवन केल्यानेही आरोग्याच्या अनेक प्रकारच्या समस्या देखील उद्भवू शकतात.

व्हिटॅमिन्सचे अति सेवनही ठरू शकते हानिकारक, जाणून घ्या माहिती
Image Credit source: FACEBOOK
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Sep 27, 2022 | 2:01 PM
Share

शरीर निरोगी (healthy body) ठेवण्यासाठी आणि आजारांचा धोका कमी करण्यासाठी आपल्या आहाराद्वारे पोषक द्रव्ये मिळवणे अत्यंत आवश्यक मानले जाते. अवयव निरोगी ठेवण्यात आणि अनेक प्रकारच्या गंभीर आजारांचा धोका कमी करण्यात व्हिटॅमिन्सची (जीवनसत्त्व) (vitamins) विशेष भूमिका मानली जाते. अन्नामध्ये पोषक तत्वांचा अभाव असेल किंवा काही आजार झाला असेल, तर शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता निर्माण होऊ शकते, अशावेळी डॉक्टर त्या व्हिटॅमिन्सच्या सप्लीमेंट्सचे ( vitamin supplements) सेवन करण्याची शिफारस करतात. मात्र डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी ती म्हणजे, शरीरातील व्हिटॅमिन्सची (जीवनसत्त्व) कमतरता जशी हानिकारक असते, तसेच त्याचे अधिक प्रमाणात सेवन केल्यानेही आरोग्याच्या अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

काही अभ्यासातून अशी माहिती समोर आली आहे की, काही व्हिटॅमिन्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवून गंभीर आजार आणि संसर्ग होण्याच्या जोखमीपासून आपले संरक्षण करू शकतात. याच कारणामुळे कोरोना संसर्गाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सर्व लोकांना व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन – डीचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देत होते.

मात्र कमी वेळात अधिक फायदा मिळवण्यासाठी जर तुम्हीही जास्त व्हिटॅमिन्सचं सेवन करत असाल तर त्याचे अनेक दुष्परिणामही होऊ शकतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटॅमिन सप्लीमेंट न घेण्याचा सल्ला दिला जातो. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

व्हिटॅमिन – सी चा अतिरेक :

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते स्कर्व्ही सारख्या रोगापासून बचाव करण्यापर्यंत, व्हिटॅमिन – सी च्या सेवनावर भर दिला जातो. आंबट फळं ही या व्हिटॅमिनचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. प्रौढांसाठी दररोज 2,000 मिलीग्रामच्या प्रमाणात या व्हिटॅमिनचे सेवन करणे सुरक्षित मानले जाते,त्या, मात्र त्याच्या अतिरिक्त सेवनामुळे आरोग्यास अनेक प्रकारचे धोके उद्भवू शकतात. व्हिटॅमिन-सीच्या वाढत्या प्रमाणामुळे अतिसार आणि मळमळ होणे, ही सर्वात सामान्य समस्या आहे. याशिवाय व्हिटॅमिन-सीमुळे शरीरातील ऑक्सलेटही वाढते, ज्यामुळे किडनीमध्ये मूतखडे तयार होण्याचा धोका असतो.

व्हिटॅमिन-डीच्या अतिरेकामुळे होणारे नुकसान :

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, हाडं बळकट करणे यासाठी व्हिटॅमिन-डी हे सर्वात प्रभावी मानले जाते. व्हिटॅमिन – डी याचे शिफारस केलेले प्रमाण 400-800 आययू/दिवस इतके आहे. मात्र यापेक्षा अधिक प्रमाणात हे व्हिटॅमिन घेतल्यास अनेक त्रास होऊ शकतात. व्हिटॅमिन डीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण (हायपरक्लेसीमिया) वाढते, ज्यामुळे मळमळ आणि उलट्या होणे, अशक्तपणा येणे आणि वारंवार लघवी होणे, असा त्रास होऊ शकतो. तसेच व्हिटॅमिन-डीच्या अतिरेकामुळे किडनी स्टोनचाही धोका असतो.

व्हिटॅमिन-ईचा अतिरेक :

व्हिटॅमन-ई हे त्वचा आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते. अनेक रोग आणि संसर्ग याच्याविरूद्ध लढा देण्यासाठी शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी देखील व्हिटॅमिन-ई ची आवश्यकता असते. मात्र याच्या शरीरातील अतिरिक्त प्रमाणामुळे काही परिस्थितीमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो. यामुळे इंट्राक्रॅनिल रक्तस्त्राव होण्याचा धोका देखील वाढतो. त्यामुळे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्हिटॅमिन सप्लीमेंट्सचे सेवन करावे.

व्हिटॅमिन- ए च्या अतिरेकामुळे होणारे नुकसान :

व्हिटॅमिन-ए मुळे, आपले डोळे आणि त्वचेचे संरक्षण तर होतेच, पण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे व्हिटॅमिन सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या व्हिटॅमिनचे अतिरिक्त प्रमाण हे यकृताच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. व्हिटॅमिन-ए सप्लीमेंट्सचे अतिरिक्त सेवन केल्यास तीव्र डोकेदुखी, अंधुक दृष्टी, मळमळ, चक्कर येणे, स्नायू दुखणे असा त्रास होऊ शकतो. तर काही लोकांमध्ये समन्वयाची समस्या देखील उद्भवू शकते.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड