AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात त्वचेशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी या ‘आयुर्वेदिक स्किनकेअर टिप्स’ फॉलो करा; जाणून घ्या, त्वचेच्या समस्यांवरील ‘आयुर्वेदीक’ उपाय!

पावसाळ्यात त्वचेशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी या ‘आयुर्वेदिक स्किनकेअर टिप्स’ फॉलो करा; जाणून घ्या, त्वचेच्या समस्यांवरील ‘आयुर्वेदीक’ उपाय!

पावसाळ्यात त्वचेशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी या ‘आयुर्वेदिक स्किनकेअर टिप्स’ फॉलो करा; जाणून घ्या, त्वचेच्या समस्यांवरील ‘आयुर्वेदीक’ उपाय!
Image Credit source: istockphoto.com
| Edited By: | Updated on: Jul 04, 2022 | 6:01 PM
Share

पावसाळा सुरू झाला की, त्वचेतून अतिरिक्त तेल निघू लागते. त्वचेवर हे अतिरिक्त तेल (Excess oil) धूळ, घाण आणि बॅक्टेरियाही सोबत घेऊन येत असते. त्यामुळे त्वचेवरील छिद्र बंद होतात. यामुळे पुरळ आणि इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काही आयुर्वेदिक स्किनकेअर (Ayurvedic skincare) टिप्स फॉलो करा. याच्या मदतीने तुम्ही त्वचेशी संबंधित समस्यांपासून स्वतःला वाचवू शकाल. या ऋतूत जास्त घाम आल्याने भरपूर पाणी वाया जाते. अशा स्थितीत डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे असते. दिवसातून किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्या. हे तुमच्या त्वचेला कोरडेपणापासून वाचवेल. यासारखेच्या आणखी काही आयुर्वेदिक टीप्स जाणून घ्या, ज्यामुळे तुमची त्वचा पावसाळ्यातही अधिक चमकदार (More shiny) आणि सुंदर दिसू शकते.

भाज्यांचे ज्यूस प्या

पावसाळा सुरू झाल्यावर तुम्ही, त्वचेची खास काळजी घेण्यासाठी काही ज्यूसचे सेवन करणे गरजेचे असते. यात बीट, गाजर, काकडी, गहू आणि दूधीपासून बनवलेले ज्यूस आवश्यक प्या. हे तुम्हाला हायड्रेट ठेवण्यात मदत करतात. हे केवळ तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करेल असे नाही तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास देखील मदत करेल.

आम्लयुक्त पदार्थ

पावसाळ्यात आम्लयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा. दही, चिंच, लिंबूवर्गीय फळे आणि व्हिनेगरचे सेवन टाळा. आंबवलेले अन्न, खारट आणि मसालेदार अन्न शरीरात पित्त वाढवते. या गोष्टींचे सेवन केल्याने त्वचेवर मुरुम, खाज आणि एक्जिमा सारख्या समस्या उद्भवू शकतात.

त्वचेसाठी हर्बल पॅक वापरा

पावसाळा म्हणजे तुमच्या त्वचेची छिद्रे बंद होतात. यामुळे डाग, पुरळ यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही त्वचेसाठी आयुर्वेदिक उटने वापरू शकता. यासाठी हळद, कोरफड, चंदन आणि कडुलिंबापासून बनवलेले हर्बल फेस पॅक वापरता येऊ शकतात. यामुळे त्वचेवरील डाग दूर होतात. ते तुमची त्वचा एक्सफोलिएट करतात.

हर्बल तेल मालिश

पावसाळ्यात त्वचेवर ओलावा असल्याने संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत तुम्ही कडुलिंब आणि हळद यांसारख्या हर्बल तेलांनी त्वचेची मालिश करू शकता. यामुळे तुमची त्वचा संक्रमणापासून मुक्त होण्यास मदत होईल. अंघोळ करण्यापूर्वी तुम्ही या तेलाने मालिश करू शकता.

Follow Us
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका.
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स.
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण.
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो....
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार.
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट....
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.