पावसाळ्यात त्वचेशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी या ‘आयुर्वेदिक स्किनकेअर टिप्स’ फॉलो करा; जाणून घ्या, त्वचेच्या समस्यांवरील ‘आयुर्वेदीक’ उपाय!

पावसाळ्यात त्वचेशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी या ‘आयुर्वेदिक स्किनकेअर टिप्स’ फॉलो करा; जाणून घ्या, त्वचेच्या समस्यांवरील ‘आयुर्वेदीक’ उपाय!

पावसाळ्यात त्वचेशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी या ‘आयुर्वेदिक स्किनकेअर टिप्स’ फॉलो करा; जाणून घ्या, त्वचेच्या समस्यांवरील ‘आयुर्वेदीक’ उपाय!
Image Credit source: istockphoto.com
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 6:01 PM

पावसाळा सुरू झाला की, त्वचेतून अतिरिक्त तेल निघू लागते. त्वचेवर हे अतिरिक्त तेल (Excess oil) धूळ, घाण आणि बॅक्टेरियाही सोबत घेऊन येत असते. त्यामुळे त्वचेवरील छिद्र बंद होतात. यामुळे पुरळ आणि इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काही आयुर्वेदिक स्किनकेअर (Ayurvedic skincare) टिप्स फॉलो करा. याच्या मदतीने तुम्ही त्वचेशी संबंधित समस्यांपासून स्वतःला वाचवू शकाल. या ऋतूत जास्त घाम आल्याने भरपूर पाणी वाया जाते. अशा स्थितीत डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे असते. दिवसातून किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्या. हे तुमच्या त्वचेला कोरडेपणापासून वाचवेल. यासारखेच्या आणखी काही आयुर्वेदिक टीप्स जाणून घ्या, ज्यामुळे तुमची त्वचा पावसाळ्यातही अधिक चमकदार (More shiny) आणि सुंदर दिसू शकते.

भाज्यांचे ज्यूस प्या

पावसाळा सुरू झाल्यावर तुम्ही, त्वचेची खास काळजी घेण्यासाठी काही ज्यूसचे सेवन करणे गरजेचे असते. यात बीट, गाजर, काकडी, गहू आणि दूधीपासून बनवलेले ज्यूस आवश्यक प्या. हे तुम्हाला हायड्रेट ठेवण्यात मदत करतात. हे केवळ तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करेल असे नाही तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास देखील मदत करेल.

आम्लयुक्त पदार्थ

पावसाळ्यात आम्लयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा. दही, चिंच, लिंबूवर्गीय फळे आणि व्हिनेगरचे सेवन टाळा. आंबवलेले अन्न, खारट आणि मसालेदार अन्न शरीरात पित्त वाढवते. या गोष्टींचे सेवन केल्याने त्वचेवर मुरुम, खाज आणि एक्जिमा सारख्या समस्या उद्भवू शकतात.

हे सुद्धा वाचा

त्वचेसाठी हर्बल पॅक वापरा

पावसाळा म्हणजे तुमच्या त्वचेची छिद्रे बंद होतात. यामुळे डाग, पुरळ यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही त्वचेसाठी आयुर्वेदिक उटने वापरू शकता. यासाठी हळद, कोरफड, चंदन आणि कडुलिंबापासून बनवलेले हर्बल फेस पॅक वापरता येऊ शकतात. यामुळे त्वचेवरील डाग दूर होतात. ते तुमची त्वचा एक्सफोलिएट करतात.

हर्बल तेल मालिश

पावसाळ्यात त्वचेवर ओलावा असल्याने संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत तुम्ही कडुलिंब आणि हळद यांसारख्या हर्बल तेलांनी त्वचेची मालिश करू शकता. यामुळे तुमची त्वचा संक्रमणापासून मुक्त होण्यास मदत होईल. अंघोळ करण्यापूर्वी तुम्ही या तेलाने मालिश करू शकता.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.