AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्ट्रेस येतोय, झोप उडालीय? पतंजलीने सांगितलेले हे प्राणायाम करा, होईल चमत्कारिक फायदा

मदेवाबाबांचे शिक्षण आणि पतंजली कंपनीने तयार केलेली उत्पादन यांच्या मदतीने अनेक लोकांच्या आरोग्यविषयक समस्या कमी झालेल्या आहेत. दरम्यान, रामदेव बाबांनी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यासाठीही काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. त्या कोणत्या आहेत तेच जाणून घेऊ या...

स्ट्रेस येतोय, झोप उडालीय? पतंजलीने सांगितलेले हे प्राणायाम करा, होईल चमत्कारिक फायदा
ramdev baba
| Updated on: Aug 11, 2025 | 7:19 PM
Share

Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांनी पतंजलीच्या माध्यमातून आयुर्वेदिक उपचार पद्धती घराघरात पोहोचवली आहे. त्वचारोग असो किंवा अन्य आरोग्यविषयक अडचण असो बहुसंख्य आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून चांगले उपचार केले जातात. आजघडीला पतंजलीची अनेक अत्पादनं तुमच्या आजूबाजूला स्टोअर्सवर तसेच ऑनलाईन पोर्टल्सवरही आढळतात. रामदेवाबाबांचे शिक्षण आणि पतंजली कंपनीने तयार केलेली उत्पादन यांच्या मदतीने अनेक लोकांच्या आरोग्यविषयक समस्या कमी झालेल्या आहेत. दरम्यान, रामदेव बाबांनी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यासाठीही काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. त्या कोणत्या आहेत तेच जाणून घेऊ या…

आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळेच अनेक लोकांना शारीरिक तसेच मानसिक समस्या निर्माण होतात. मात्र पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी काही प्राणायाम सांगितलेले आहेत. हे प्राणायाम तुम्ही रोज केले तर तुमचे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य चांगले राहू शकते. या प्राणायामांमुळे स्ट्रेस, इन्झायटी दूर होऊ शकते. हे प्राणायम केल्यास नकारात्मक विचार दूर होतात.

अनुलोम विलोम

बाबा रामदेव यांच्या पतंजली वेलनेसनुसार अनुलोम-विलोम एक फारच प्रभावी प्राणायाम आहे. हा प्राणायाम केल्यास शरीरातील प्राणवायूचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते. तसेच रक्तदाब योग्य प्रमाणात राहतो. मानसिक शांतीही लाभते.

भ्रस्त्रिका प्राणायाम

हा प्राणायम ध्यान साधनेच्या आसनात बसून करावा लागतो. हे आसन करताना स्वत:ला शांत ठेवावे. शांततेत शरीराला कोणताही ताण न देता श्वास घ्यावा आणि बाहेर सोडावा लागतो. असे केल्यास फुफ्फूसाची क्षमता वाढते. तसेच शरीरातील ऊर्जा कायम राहतो. हा प्राणायाम केल्यास मानसिक थकवादेखील दूर होतो

कपालभाती प्राणायाम

पतंजली वेलनेसनुसार कपालभाती प्राणायामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच हृदय, फुफ्फुसाचे आरोग्य सुधारते.

भ्रामरी प्राणायाम

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी भ्रामरी प्राणायाम फार उपयोगी पडतो. या प्राणायाममध्ये दोन्ही हात डोळ्यांवर ठेवून तीन ते पाच सेकंदाच्या कालावधित लयबद्ध पद्धतीने श्वास घ्यावा लागतो. हा श्वास घेताना ओम…असा उच्चार करावा लागतो.

उज्जायी प्राणायामचे फायदे काय आहेत?

मानसिक शांती मिळावी तसेच स्ट्रेस कमी व्हावा तसेच झोपेत सुधारणा व्हावी यासाठी उज्जायी प्राणायाम करावा. या प्राणायामामुळे फुफ्फुसाचे आरोग्य सुधारते. ध्यानमुद्रेत बसून हा प्राणायाम करावा लागतो.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.