AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झा महाराष्ट्रात पहिला बळी, देशात तिसरा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क

महाराष्ट्रात एका तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. त्याचबरोबर राज्यात सुध्दा संसर्गजन्य अधिक रुग्ण असल्यामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. लोकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झा महाराष्ट्रात पहिला बळी, देशात तिसरा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क
health department on alertImage Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 15, 2023 | 12:45 PM
Share

अहमदनगर : अहमदनगरला (Ahmadnagar) एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झा (H3N2 Influenza) या संसर्गजन्य आजारामुळे महाराष्ट्रात (maharashtra)पहिला बळी गेला आहे. तर देशात तिसरा मृत्यू (third death in the country) झाल्याने खळबळ उडाली आहे. एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाला संसर्गजन्य आजाराची लागण झाली होती. त्यानंतर तरुणावरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे हा तरुण औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या तो नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झा या संसर्गजन्य आजारामुळे त्याचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. त्याचबरोबर डॉक्टरांनी लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तरुणाचा मृ्त्यू झाल्यामुळे कुटुंबियांना आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.

डॉक्टर म्हणतात नियमावली पाळा

एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झा या संसर्गजन्य आजारामुळे औरंगाबादमधील रहिवासी असलेल्या तरुणाचा अहमदनगरमध्ये मृत्यू झाला आहे. तो विद्यार्थी एमबीबीएसचं शिक्षण घेत होता. नगरमध्ये त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या तो अहमदनगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. मागील आठवड्यात तो ट्रीपसाठी कोकणात गेला होता. ट्रिपवरून आल्यानंतर तो आजारी पडला, त्याची कोवीड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तर त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात रविवारी उपचारासाठी दाखल केले. तेथील तपासणीत कोवीड 19 सोबतच एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. नंतर नगर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्व हॉस्पिटल मधील डॉक्टरांची एक बैठक तातडीने बोलवली. तसेच शहरातील नागरिकांनी काळजी घ्यावी मास्क घालण्याचे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी केले आहे.

राज्यात विविध ठिकाणी पाऊस सुद्धा सुरु

महाराष्ट्रात एका तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. त्याचबरोबर राज्यात सुध्दा संसर्गजन्य अधिक रुग्ण असल्यामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. लोकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून हवामानामध्ये बदल झाल्यामुळे विविध आजार उद्धभवले आहेत. त्याचबरोबर राज्यात विविध ठिकाणी पाऊस सुद्धा सुरु आहे.

Follow Us
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा.
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात...
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात....
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज.
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा.
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय.
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव.
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.