AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय गं पाळीचा त्रास होतोय…हे घरगुती उपाय कर…तुला नक्की बरं वाटेल!

Health tips – मासिक पाळी हा महिल्यांचा जीवनातील महत्त्वपूर्ण भाग आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांनी खूप त्रास होतो. काही महिलांना पाळी येण्याच्या दोन तीन दिवसांपासून त्रास सुरु होतो. आणि पाळी सुरु झाली की हा त्रास नाहीसा होता. काही घरगुती उपाय केले तर हे मासिक पाळीचे दिवस थोडे फार का होईना सुसह्य जातील.

काय गं पाळीचा त्रास होतोय...हे घरगुती उपाय कर...तुला नक्की बरं वाटेल!
मासिक पाळीतील समस्या
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 1:24 PM
Share

मुंबई : मासिक पाळीचे ते चार ते पाच दिवस महिलांसाठी फार त्रासदायक असतात. यावेळी त्यांना मानसिक आणि अनेक शारीरीक त्रास होत असतो. आज महिला घर आणि नोकरी अशी दुहेरी भूमिका सांभाळते. मग अशावेळी हा त्रास तिला अनेक वेळा अडथळा होतो. काही महिलांना पाळी येण्यापूर्वीच त्रास व्हायला सुरुवात होते. स्तन हळवे होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, डोकेदुखी, झोप न लागणे, चिडचिड, थकवा, थोडे वजन वाढणे अशाप्रकारचे त्रास होतात. साधारण कोणाकोणाला हा त्रास 1-2 आठवडे होतात. पाळीची तारीख जवळ येईल तसे मानसिक आणि शारीरिक त्रासही थोडेफार वाढतात. काही जण गोळ्यांनी  हे त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतात पण त्याचे शरीरावर दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे घरगुती उपाय करुन आपण हा त्रास कसा कमी करु शकतो ते पाहूयात

कोमट तेलाने मालिश

या दिवसांमध्ये कंबर, ओटीपोट दुखतं अशावेळी कोमट तेलाने मालिश केल्यास तुम्हाला आराम मिळतो. मालिश केल्याने शरीराचे काही पॉईंट्स दाबले जातात त्यामुळे शरीराच्या नसा मोकळ्या होतात आणि तुला दुखण्यातून आराम मिळतो.

गरम पाण्याचा शेक

हा तर सगळ्यात उपयुक्त उपाय आहे. गरम पाणीचा शेक हा एखाद्या पेनकिलर गोळीचं काम करतो. या दिवसात ओटीपोट आणि कंबर प्रचंड दुखत असते. अशावेळी गरम पाण्याचा शेक घेतला तर तुम्हाला खूप फायदेशीर होतो.

व्यायाम करणे

अनेक जण यादिवसात व्यायाम करत नाही. व्यायाम करा म्हणजे अगदी जीमला जा असं नाही. तर शरीराला हालचाल होईल म्हणजे चालणे, घरातली कामं करा. ज्यामुळे शरीराची हालचाल होते नसा मोकळ्या होतात आणि तुम्हाला बरं वाटतं.

व्हिटॅमिन डीयुक्त आहार घ्या

या दिवसात व्हिटॅमिन डीची शरीरात कमी होते. म्हणून अशावेळी आपल्याला कंबर आणि पोट दुखतं. त्यामुळे व्हिटॅमिन डीयुक्त आहार या दिवसात घ्यावा.

काही पदार्थ टाळा

या दिवसांमध्ये चहा, कॉफी, आणि काही शीतपेय या दिवसात टाळावीत.

या गोष्टी घ्या

हर्बल टी, ग्रीन टी, बडीशोप, दालचिनी, आलं हिरव्या भाज्या, चिकन, मासे, अक्रोड, बदाम, पपई आणि केळी खायला पाहिजे.

गरम पाण्याने आंघोळ

या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करणे. ज्यामुळे शरीराच्या नसा मोकळ्या होतात. अंग शेकलं जातं आणि दुखण्यापासून तुमची मुक्तता होते.

भरपूर आणि गरम पाणी प्या

या दिवसांमध्ये भरपूर आणि गरम पाणी प्यायलाने तुम्हाला खूप फायदा होता.

वरील घरगुती उपाय केल्यास तुमचे मासिक पाळीचे दिवस जरा सोपे जातील. मात्र काय एक गोष्ट लक्षात ठेवा शरीराशी निगडित गोष्टी असताना कुठलीही गोष्ट करताना तुमच्या डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या. प्रत्येकाचा त्रास त्यांचा शरीराशी संबंधित असतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला कायम महत्त्वपूर्ण असतो.

हेही वाचा :

Stomach flu | तुमच्याही लहानग्यांना पोटाचा त्रास? स्टमक फ्लूची कारणं आणि लक्षणं

Music Therapy | ‘संगीत थेरपी’ चा अवलंब करा …. अन आनंदीदायी जीवनशैली अनुभवा

Herbs : 4 आयुर्वेदिक औषधी वनस्पती ज्या व्हायरल इन्फेक्शन दूर ठेवतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात, जाणून घ्या याबद्दल!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.