AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hot water Benefit: रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे आहेत असंख्य फायदे, ‘या’ समस्यांपासून मिळेल मुक्ती

कोमट पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. नियमीत गरम पानी पिल्यास अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते.

Hot water Benefit: रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे आहेत असंख्य फायदे, 'या' समस्यांपासून मिळेल मुक्ती
गरम पाणी पिण्याचे फायदेImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 11, 2023 | 4:50 PM
Share

मुंबई, रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने (Hot Water benefits) शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे गॅस आणि अॅसिडिटीची समस्या दूर होते. यामुळे शरीर पूर्णपणे निरोगी राहते. याशिवाय आतड्यांचे आकुंचन होण्यास मदत होते. यामुळे आतड्यांमध्ये अडकलेला मल बाहेर येतो आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. लहान मुलांपासून ते तरुण आणि वृद्धदेखील गरम पाणी पिऊ शकतात. याचा फायदा सर्वांनाच होतो.

काय आहेत फायदे?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान वाढते, ज्यामुळे शरीरातील अंतःस्रावी यंत्रणा सक्रिय होऊन घाम येतो आणि त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. मासिक पाळीच्या काळात ओटीपोटात दुखणे, पाठदुखी, पाय दुखणे हे महिलांना सामान्य झाले आहे. अशा स्थितीत कोमट पाणी प्यायल्याने पोटदुखी आणि दुखण्यांपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो. यासोबतच शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.

हृदयासाठी फायदेशीर

कोमट पाणी शरीरात साठलेली चरबी काढून टाकते, ज्यामुळे तुम्हाला तणावमुक्त वाटते. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो. वजन कमी करणे सोपे होते. वजन कमी करण्याचे अनेक मार्ग असतील. रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने चेहऱ्याची चमक वाढते.

शरीरातील अंतर्गत प्रणाली सुधारली की त्याचा परिणाम त्वचेवरही दिसू लागतो. पचन आणि रक्त परिसंचरण सुधारते. कोमट पाणी प्यायल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळी वर्तुळे यासारख्या वृद्धत्वाच्या समस्या टाळता येतात. तसेच ते मुरुमे होण्यापासून प्रतिबंधित करते. परिणामी, त्वचा अधिक चमकदार आणि स्पष्ट दिसते.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.