AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरीरात रक्ताची कमतरता असेल तर करा या पदार्थांचे सेवन, दहा दिवसात वाढेल रक्त

शरीरातील रक्त कमी झाले तर आणि ॲनिमिया सारखे समस्या होऊ शकते.तसेच शरीरात रक्ताची कमतरता असल्यास श्वास घेण्यास देखील त्रास होतो. यासाठी लोहयुक्त पदार्थ खाणे आवश्यक असते.

शरीरात रक्ताची कमतरता असेल तर करा या पदार्थांचे सेवन, दहा दिवसात वाढेल रक्त
bloodImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 14, 2024 | 6:37 PM
Share

शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे ॲनिमिया सारखे धोकादायक आजार होऊ शकतात. डोकेदुखी, चक्कर येणे, हातपाय थंड पडणे अशी लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास श्वास घेण्यास देखील त्रास होतो. त्वचा पिवळी पडू लागेल आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अनेकदा लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की रक्त वाढवण्यासाठी काय खावे. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी सर्वप्रथम लोहयुक्त पदार्थ खाणे आवश्यक असते. लोह शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते ज्यामुळे रक्ताचे प्रमाण वेगाने वाढते.

दूधही आणि चीज यासारखे दुग्धजन्य पदार्थ देखील शरीराला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी प्रदान करतात. जे रक्तपेशींचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

यासोबतच शक्य असल्यास गुळ आणि शेंगदाण्याचे सेवन करा कारण ते शरीरात ऊर्जा तसेच रक्त वाढवण्यास मदत करतात यासोबतच पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. यामुळे शरीरात रक्ताभिसरण चांगले राहते.

पालक,बीट, डाळिंब आणि गूळ हे लोहाचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत जे रक्त वाढवण्यास खूप उपयुक्त ठरतात. या व्यतिरिक्त संत्री, लिंबू आणि आवळा यासारखी व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेली फळे खाल्ल्याने देखील लोहाचे प्रमाण वाढते. हे खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते. यासोबतच मासे, अंडे आणि चिकन खाल्ल्याने रक्त वाढायला मदत होते.पण हे संतुलित प्रमाणातच खाणे आवश्यक आहे.

ज्या लोकांना अशक्तपणा आहे त्यांनी B 12 आणि फॉलिक ऍसिड ची काळजी घ्यावी. कारण ते रक्त पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात. B 12 ची योग्य पातळी राखण्यासाठी दूध आणि अंडी हे चांगले पर्याय आहेत. शाकाहारी लोक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार B 12 चे सप्लीमेंट्स घेऊ शकतात. फॉलिक ऍसिड साठी आहारात हिरव्या पालेभाज्या, वाटाणे आणि कडधान्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.

शरीरात रक्ताची कमतरता असल्यास तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे देखील फायदेशीर ठरू शकते. तांब्यापासून कमी प्रमाणात लोह पाण्यात विरघळते. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे यामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढेल.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...