AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हिटॅमिन ‘सी’ची कमी? आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी ची मोठ्या प्रमाणात गरज असते. व्हिटॅमिन सी ची कमी असल्यास त्वचेची चमक कमी होते आणि कोरडेपणा दिसू लागतो. शरीरातील व्हिटॅमिन सी चे प्रमाण वाढवण्यासाठी आंबट फळांचे आणि फळांचे सेवन करणे आवश्यक आहे.

व्हिटॅमिन 'सी'ची कमी? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश
vitamin CImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 23, 2024 | 7:45 AM
Share

व्हिटॅमिन सी हे पोषक तत्व आहे. जे तुम्हाला निरोगी ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. हे केवळ निरोगी राहण्यासाठी नाही तर त्वचेसाठी देखील व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. शरीरातील दात हिरड्या, रक्तवाहिन्या, निरोगी ठेवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत होते. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे त्वचेची चमक कमी होते आणि कोरडेपणा दिसू लागतो. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे सुरकुत्यांसारखी अकाली वृद्धत्वाची लक्षणे दिसतात.

शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता जाणवू लागल्यास आहारात सुधारणा करणे आवश्यक असते. तुम्ही खात्री करण्यासाठी पोषण चाचणी देखील घेऊ शकतात. कारण जर परिस्थिती गंभीर झाली तर स्कर्वी होऊ शकते. ज्यामध्ये चेहरा फिकट होतो, अंगावर पुरळ उठते, दात मोकळे होतात, रक्तस्त्राव यासारखी लक्षणे दिसतात. चला तर जाणून घेऊया व्हिटॅमिन सी साठी कोणत्या गोष्टींचे सेवन कारणे आवश्यक आहे.

हिरव्या पालेभाज्या

व्हिटॅमिन सीच्या कमीवर मात करण्यासाठी शिमला मिरची, ब्रोकली, पालक ,मेथी, फुल कोबी, पत्ता कोबी, कडधान्य यांचा आहारात समावेश करावा. यांची भाजी बनवण्याऐवजी ज्यूस किंवा सूप बनवून पिल्यास त्याचा जास्त फायदा होतो.

आंबट फळांचे सेवन करा

शरीरात विटामिन सी वाढवण्यासाठी आंबट फळांचे सेवन करणे फायदेशीर आहे. तुमच्या आहारात संत्रा किंवा लिंबू,द्राक्ष,आवळा यासारख्या फळांचा समावेश करा. ही फळे सकाळी किंवा संध्याकाळी खाण्याऐवजी दिवसा खाणे जास्त फायदेशीर आहे. कारण त्याच्या थंड आणि आम्लयुक्त स्वभावामुळे जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी त्याचे सेवन केले तर तुम्हाला ऍसिडिटी होण्याची शक्यता असते.

डॉक्टरांशी संपर्क साधा

जर व्हिटॅमिनसी ची कमतरता असेल आणि तुम्हाला त्याची गंभीर लक्षणे जाणवत असतील तर अशा परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जेणेकरून तुम्हाला योग्य आहाराविषयी माहिती मिळू शकेल आणि जर सप्लिमेंट ची गरज असेल तर तेही घ्या फक्त यासाठी तज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल