AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : हिवाळ्यामध्ये कमी पाणी पित असाल तर होऊ शकतात हे गंभीर आजार, दिवसात इतकं ग्लास पाणी प्यायचंच

कमी पाणी पिल्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहत नाही त्यामुळे शरीरातील घाण देखील निघून जात नाही. त्यामुळे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. पाणी पिल्यामुळे आपले शरीर दिवसभर हायड्रेट राहते तसेच शरीरातील घाण देखील बाहेर काढून टाकते. तर थंडीच्या दिवसांमध्ये कमी पाणी पिल्यामुळे नेमके काय दुष्परिणाम होतात याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत.

Health : हिवाळ्यामध्ये कमी पाणी पित असाल तर होऊ शकतात हे गंभीर आजार, दिवसात इतकं ग्लास पाणी प्यायचंच
पाणी: पाणी भरपूर प्यायलं की डिहायड्रेशन होत नाही. डिहायड्रेशनने खूप भूक लागते त्यामुळे भरपूर पाणी प्यायलं तर शरीर हायड्रेटेड राहतं आणि अर्थातच भूक लागत नाही. उपवासाच्या दिवसात सतत पाणी पिणे खूपच महत्त्वाचे आहे. लिंबूपाणी प्यायल्याने सुद्धा भुकेवर नियंत्रण राहते. पाण्याने पचन सुद्धा चांगले होते. महत्त्वाचं म्हणजे भूक कमी लागते.
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 07, 2023 | 9:10 PM
Share

मुंबई : सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. थंडीच्या या दिवसांमध्ये अनेक आजार निर्माण होत असतात. मग ताप, थंडी, सर्दी, खोकला असे अनेक आजार निर्माण होताना दिसतात. त्यात थंडीच्या दिवसात लोक जास्त पाणी पित नाहीत. कारण हिवाळ्यामध्ये जास्त तहान लागत नाही. त्यामुळे लोकं फार कमी पाणी पितात. मग कमी पाणी पिल्यामुळे त्याचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम दिसतात. मग लोकांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.

किडनीवर वाईट परिणाम- जर तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये कमी पाणी पिलं तर त्याचा तुमच्या किडनीवर वाईट परिणाम होतो. किडनीवर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नसेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर किडनीवर दबाव येतो, त्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा ट्रॅकमध्ये जळजळ अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये तहान जरी लागली नाही तरी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.

अशक्तपणा येतो –  थंडीच्या दिवसांमध्ये कमी पाणी पिले तर शरीरात अशक्तपणा निर्माण होतो. पाण्याच्या कमतरतामुळे आपले शरीर कमजोर होते त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची, ऑक्सिजनची कमतरता भासते. मग आपल्याला थकवा येतो अशक्तपणा येतो. त्यामुळे प्रत्येकाने भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.

पोटाशी संबंधित आजार – शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्याचा परिणाम आपल्या पोटावर होतो. मग बद्धकोष्ठतापासून ते अन्नपचनाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. तर अशा गंभीर समस्यांचा सामना करायचा नसेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.

त्वचा निस्तेज होते – शरीरात पाण्याची कमतरता असेल तर आपले शरीर हायड्रेट राहत नाही. तसेच शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे आपली त्वचा निस्तेज होते म्हणजेच आपली त्वचा कोरडी पडते. त्यामुळे जर तुम्हाला तुमची त्वचा कोरडी पडू द्यायची नसेल आणि दिवसभर ओलसर ठेवायची असेल तर दररोज पाच ते सात ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे यामुळे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.

थंडीच्या दिवसांमध्ये निरोगी राहायचे असेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने तीन ते चार लिटर पाणी पिणे खूप गरजेचे आहे. थंडीच्या दिवसांमध्ये गंभीर आजारांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर दिवसाला सात ते आठ ग्लास पाणी प्या, यामुळे तुम्हाला कोणतेही आजार होणार नाहीत.

Follow Us
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...