आजारापासून वाचायचं असेल तर रात्री जेवल्यानंतर इतकी मिनिटे चाला, झोपही चांगली येईल

हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे रात्रीच्या जेवणानंतर लगेच अंथरुणावर आडवे होण्याचा बहुतेकांचा कल असतो. परंतू यामुळे अनेक व्याधी आपल्या जडू शकतात. त्यामुळे रात्रीचे जेवण केल्यानंतर चालण्याचा फायदा होतो. किती वेळ चालावे आणि त्याने काय फायदा होतो पाहूयात..

आजारापासून वाचायचं असेल तर रात्री जेवल्यानंतर इतकी मिनिटे चाला, झोपही चांगली येईल
night walk after dinner Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 8:43 PM

मुंबई | 6 डिसेंबर 2023 : हल्ली बदलत्या रहाणीमानामुळे रात्री जेवल्यानंतर डायरेक्ट बेडवर झोपायला जाण्याचा प्रघात पडला असून तो खूपच धोकादायक आहे. आपण थोरामोठ्यांकडून ऐकले असेल की रात्री जेवणानंतर शतपावली करायला हवी तर जेवण पचायला मदत होते. हे खरंच आहे. रात्री डीनरनंतर केवळ आपले पचनच सुधारण्यास मदत होते असे नाही तर शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. चला पाहूयात कोणते फायदे आपल्याला मिळतात ते…

आपण सकाळी नाश्ता करतो आणि दुपारी जेवण करतो त्यावेळी आपल्या शरीराची हालचाल झाल्याने आपले जेवण पचायला मदत होत असते. परंतू रात्री जेवल्यानंतर थोडे तरी चालायला हवे. कारण जेवणानंतर काही मिनिटात आपल्या शरीरात शुगर तयार व्हायला सुरुवात होते. त्यामुळे शरीराच्या काही हालचाली न केल्याने शुगर लेव्हल वाढत असते. त्यामुळे रात्रीचे जेवण झाल्यानंतर दहा मिनिटे शतपावली करायला हवी. त्यामुळे शुगर लेव्हल कंट्रोल रहायला मदत होते.

वजनही नियंत्रणात

रात्री जेवल्यानंतर चालल्याने शरीरातील मेटोबॉलिझम बूस्ट होतो. ज्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहाण्यास मदत मिळते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रात्री जेवल्यानंतर शतपावली करायला हवी.

पचन यंत्रणा सुधारते

रात्रीचे जेवण झाल्यानंतर नियमित दहा मिनिटे वॉक केल्याने आपले पचनयंत्रणा देखील सुधारते. यामुळे आपल्याला ब्लोटिंग आणि आम्लपित्ताच्या तक्रारी देखील दूर होतात.

रोगप्रतिकारक शक्ती सुधारते

जेवल्यानंतर रात्री शतपावली केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच नैराश्य येणे सारख्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते प्रत्येकाने जेवल्यानंतर लगेच 10 ते 20 मिनिटे चालायला हवे. यामुळे आपण अनेक गंभीर आजार होण्यापासून वाचाल.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.