आजारापासून वाचायचं असेल तर रात्री जेवल्यानंतर इतकी मिनिटे चाला, झोपही चांगली येईल

हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे रात्रीच्या जेवणानंतर लगेच अंथरुणावर आडवे होण्याचा बहुतेकांचा कल असतो. परंतू यामुळे अनेक व्याधी आपल्या जडू शकतात. त्यामुळे रात्रीचे जेवण केल्यानंतर चालण्याचा फायदा होतो. किती वेळ चालावे आणि त्याने काय फायदा होतो पाहूयात..

आजारापासून वाचायचं असेल तर रात्री जेवल्यानंतर इतकी मिनिटे चाला, झोपही चांगली येईल
night walk after dinner Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 8:43 PM

मुंबई | 6 डिसेंबर 2023 : हल्ली बदलत्या रहाणीमानामुळे रात्री जेवल्यानंतर डायरेक्ट बेडवर झोपायला जाण्याचा प्रघात पडला असून तो खूपच धोकादायक आहे. आपण थोरामोठ्यांकडून ऐकले असेल की रात्री जेवणानंतर शतपावली करायला हवी तर जेवण पचायला मदत होते. हे खरंच आहे. रात्री डीनरनंतर केवळ आपले पचनच सुधारण्यास मदत होते असे नाही तर शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. चला पाहूयात कोणते फायदे आपल्याला मिळतात ते…

आपण सकाळी नाश्ता करतो आणि दुपारी जेवण करतो त्यावेळी आपल्या शरीराची हालचाल झाल्याने आपले जेवण पचायला मदत होत असते. परंतू रात्री जेवल्यानंतर थोडे तरी चालायला हवे. कारण जेवणानंतर काही मिनिटात आपल्या शरीरात शुगर तयार व्हायला सुरुवात होते. त्यामुळे शरीराच्या काही हालचाली न केल्याने शुगर लेव्हल वाढत असते. त्यामुळे रात्रीचे जेवण झाल्यानंतर दहा मिनिटे शतपावली करायला हवी. त्यामुळे शुगर लेव्हल कंट्रोल रहायला मदत होते.

वजनही नियंत्रणात

रात्री जेवल्यानंतर चालल्याने शरीरातील मेटोबॉलिझम बूस्ट होतो. ज्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहाण्यास मदत मिळते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रात्री जेवल्यानंतर शतपावली करायला हवी.

पचन यंत्रणा सुधारते

रात्रीचे जेवण झाल्यानंतर नियमित दहा मिनिटे वॉक केल्याने आपले पचनयंत्रणा देखील सुधारते. यामुळे आपल्याला ब्लोटिंग आणि आम्लपित्ताच्या तक्रारी देखील दूर होतात.

रोगप्रतिकारक शक्ती सुधारते

जेवल्यानंतर रात्री शतपावली केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच नैराश्य येणे सारख्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते प्रत्येकाने जेवल्यानंतर लगेच 10 ते 20 मिनिटे चालायला हवे. यामुळे आपण अनेक गंभीर आजार होण्यापासून वाचाल.

धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट.
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?.
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?.