AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान…भारतामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 46 जणांचा मृत्यू, संकट अजून गेले नाही!

सध्या देशातील या रूग्णसंख्येसह देशातील एकूण रुग्णांची संख्या 4,31,38,393 वर पोहोचली आहे. त्यामध्ये 14,832 सक्रिय केसेसचा समावेश आहे. यामध्ये रिकव्हरी रेट 98.75 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 2.099 रिकव्हरी झाल्यामुळे एकूण संख्या 4,25.99,102 झाली आहे. आकडेवारीनुसार 46 मृत्यूमुळे भारतातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 5,24,459 वर पोहोचली आहे.

सावधान...भारतामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 46 जणांचा मृत्यू, संकट अजून गेले नाही!
Image Credit source: pixabay.com
| Edited By: | Updated on: May 23, 2022 | 12:07 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या (Corona) केसेस कमी झाल्यामुळे देशामधील कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र, पुन्हा एकदा आता कोरोनाने डोकेवर काढल्याचे दिसते आहे. भारतात (India) गेल्या 24 तासामध्ये 2,022 नवीन कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 46 जणांचा जीव गेल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली. ही येणारी आकडेवारी धडकी भरवणारी असून परत एकदा सर्तक राहण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध (Restrictions) हटवल्यामुळे लग्न समारंभ धुमधडाक्यात पार पडत आहेत. तसेच मास्क अजिबात वापरले जाते नाहीये. मुलांना शाळेंना सुट्ट्या असल्यामुळे फिरायल्या जाणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. यामुळे कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते आहे.

24 तासांमध्ये 46 जणांचा मृत्यू

सध्या देशातील या रूग्णसंख्येसह देशातील एकूण रुग्णांची संख्या 4,31,38,393 वर पोहोचली आहे. त्यामध्ये 14,832 सक्रिय केसेसचा समावेश आहे. यामध्ये रिकव्हरी रेट 98.75 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 2.099 रिकव्हरी झाल्यामुळे एकूण संख्या 4,25.99,102 झाली आहे. आकडेवारीनुसार 46 मृत्यूमुळे भारतातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 5,24,459 वर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत 2,94,812 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. नुकताच आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे की, कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 192.38 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.

कोरोना रूग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ

INSACOG ने भारतात कोरोना व्हायरसच्या BA.4 आणि BA.5 ओमिक्रॉन व्हायरल असल्याचे देखील सांगितले आहे आणि ही भारतीयांसाठी अत्यंत धोक्याची घंटा देखील आहे. एक केस तामिळनाडूमध्ये आढळली आहे तर दुसरी तेलंगणामध्ये यामुळे आता नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे. BA.4 आणि BA.5 हे कोरोना व्हायरसचे अतिसंक्रमित प्रकार आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोना रूग्णांची संख्या ही झपाट्याने कमी झाली होती. यामुळे जवळपास सर्वच निर्बंध हटवण्यात आले होते. मात्र, सध्याची कोरोनाच्या रूग्णांची येणारी आकडेवारी चिंता वाढवणारी ठरते आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.