AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिमवरून आल्यावर ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा आणि झटपट वजन कमी करा!

जर तुम्ही वाढलेले वजन कमी करण्यासाठी जिमला जात असाल तर जिमवरून आल्यानंतर आपण आहारात काय घेतो हे सर्वात महत्वाचे आहे. कारण त्यादरम्यान आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते

जिमवरून आल्यावर 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा आणि झटपट वजन कमी करा!
जिम
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 4:36 PM
Share

मुंबई : जर तुम्ही वाढलेले वजन कमी करण्यासाठी जिमला जात असाल तर जिमवरून आल्यानंतर आपण आहारात काय घेतो हे सर्वात महत्वाचे आहे. कारण त्यादरम्यान आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असलेली ग्रीन कॉफी शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी करण्यात मदत करते. जर तुम्ही जिमला जात असाल तर  सकाळी उपाशी पोटी आणि दुपारी जेवणापूर्वी याचं सेवन करा. (Include these foods in the diet after coming out of the gym)

ग्रीन कॉफी पिल्यानंतर जवळपास अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका. जर तुम्हाला जास्त वजन कमी करायचं नसेल तर सकाळी एकदा याचं सेवन करा. लठ्ठपणा कमी करण्यासाठी चणे खाणे खूप फायदेशीर आहे. कारण चण्यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स असते, जे भूक कमी करून वजन कमी करण्यास मदत करते. यामुळे ज्या लोकांना लठ्ठपणा कमी करायचा आहे त्यांनी आपल्या आहारात चणे घ्यावेत. आपण बऱ्याच वेळा स्नॅक्समध्ये वेगवेगळे पदार्थ खातो.

स्नॅक्समध्ये ओटस घ्यावे आणि त्यामध्ये अक्रोड मिक्स करून खावे. अक्रोड खाल्ल्याने तुम्हाला लवकर भूक देखील लागत नाही. अक्रोड खाल्ल्याने आपले पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते. अक्रोड खाल्ल्याने आपले चयापचय वाढते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. दररोज अक्रोड खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो. डाळी, शाकाहारी लोकांसाठी प्रथिने बनविण्याचा एक चांगला स्रोत आहे, जे शिजविणे सोपे आणि स्वादिष्ट आहे.

वेगवेगळ्या डाळी आपण आहारात घेतल्या पाहिजेत. मूग आणि हरभरा डाळीमध्ये पोषक घटक आणि प्रथिने असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही जर जिमला जात असाल तर आहारात डाळींचा समावेश करा. एक कप डाळीत 18 ग्रॅम प्रथिने आणि 16 ग्रॅम फायबर असते. यामुळे आपले पोट बऱ्याच काळ भरल्यासारखे वाटते आणि बद्धकोष्ठतेची समस्या यामुळे दूर होते. अंडी अनेक पोषक घटक आणि प्रथिने समृद्ध असतात. जे आपल्या शरीरास योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात. अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

(टीप : कोणतेही व्यायामप्रकार करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Makeup Tips | वयाच्या चाळीशीतही सुंदर दिसायचंय? तर मेकअप करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात!

Fitness | वयाच्या 60व्या वर्षीही राहाल तंदुरुस्त, जाणून घ्या ‘या’ योगासनांबद्दल…

(Include these foods in the diet after coming out of the gym)

Follow Us
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?