AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कापलेली फळे गलेच पडत आहेत काळी, फळे ताजी ठेवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डॉक्टर कायम फळे खाण्याचा सल्ला देत असतात. पण आता ऑफिसला किंवा दुसरीकडे कुठे जायचं असेल तर, फळे बरोबर घेताना एक प्रश्न उपस्थित राहतो आणि तो म्हणजे फळे कापल्यानंतर लगेच काळी पडतात... तर फळे जाती ठेवण्यासाठी 5 घरगुती उपाय

कापलेली फळे गलेच पडत आहेत काळी, फळे ताजी ठेवण्यासाठी 5 घरगुती उपाय
| Updated on: Jul 26, 2026 | 4:21 PM
Share

कापल्यानंतर काही मिनिटांतच फळांचा रंग तपकिरी किंवा काळा होतो. ज्यामुळे ती फळे खाण्या ऐवजी फेकली जातात. सफरचंद, केळी, नाशपाती किंवा अ‍ॅव्होकॅडो… यांसारखी फळे रोजच्या आहारात आवश्यक असतात. पण बऱ्याच लोकांना एका सामान्य समस्येचा सामना करावा लागतो. फळे कापल्यानंतर काही मिनिटांतच त्यांचा रंग तपकिरी किंवा काळा होतो. विशेषतः जर ती थोडा वेळ उघडी ठेवली किंवा डब्यात ठेवली, तर ती ताजी दिसत नाहीत. परिणामी, बरेच लोक फळ खराब झाले आहे असे समजून ते फेकून देतात.

मात्र, वैद्यकीय आणि अन्न तज्ञांच्या मते, रंग बदलला म्हणजे फळ खराब झाले असे होत नाही. कापल्यानंतर, जेव्हा फळ हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येते, तेव्हा त्यातील एन्झाइम्सच्या रासायनिक अभिक्रियेमुळे त्याचा रंग बदलू लागतो. यासोबतच, उष्ण हवामान आणि अयोग्य साठवणूक ही समस्या आणखी वाढवतात. थोडी काळजी घेतल्यास आणि काही सोप्या पद्धतींचा अवलंब केल्यास, कापलेली फळे दीर्घकाळ ताजी ठेवणे शक्य आहे.

कापलेल्या सफरचंद, केळी किंवा नाशपातीवर थोडा लिंबाचा रस शिंपडा. लिंबामधील व्हिटॅमिन सी किंवा एस्कॉर्बिक ॲसिड, फळांमधील एन्झाइम्सना हवेच्या संपर्कात आल्यावर रंग बदलण्यापासून रोखते. तथापि, जास्त लिंबाचा रस वापरू नये याची काळजी घ्या, कारण यामुळे फळांची मूळ चव बिघडू शकते. कापलेली फळे डब्यात कधीही उघडी ठेवू नका. कापल्यानंतर लगेचच ती हवाबंद डब्यात ठेवा. हवेच्या संपर्कात जेवढा कमी येईल, तेवढी फळे कमी काळी पडतील.

फळे जास्त काळ खोलीच्या तापमानात ठेवणे कधीही योग्य नाही. जर तुम्ही ते लगेच खाणार नसाल, तर ते रेफ्रिजरेटरमध्ये हवाबंद डब्यात ठेवा. थंड तापमान एन्झाइमची प्रक्रिया मंदावते आणि फळांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यास मदत करते. गरजेनुसार फळे कापा: फळे अगोदर कापून ठेवणे टाळा. जेव्हा गरज असेल तेव्हाच, जेवढी फळे लागतील तेवढी कापा. यामुळे फळांचे पौष्टिक मूल्य, चव आणि नैसर्गिक रंग टिकून राहील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, फळे कापण्यासाठी नेहमी स्वच्छ, कोरडी भांडी, धारदार चाकू आणि स्वच्छ कटिंग बोर्ड वापरा. ​​फळे फ्रिजमध्ये जास्त काळ साठवून ठेवू नका.

Follow Us
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या घरी, राज्याच्या राजकारणात मोठं घडतंय?
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत ठाकरे
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत उद्धव ठाकरे हे काय म्हणाले?