AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food Side Effects : हे पदार्थ खाल तर वाढेल डोक्याचा ताप, स्ट्रेस असताना काही पदार्थ खाणे टाळा

आपण काय खातो यावर आपली तब्येत आणि आरोग्य चांगले की खराब हे ठरते. काही पदार्थ असे असतात. त्यामुळे शरीरातील तणावाची पातळी वाढते.

Food Side Effects : हे पदार्थ खाल तर वाढेल डोक्याचा ताप, स्ट्रेस असताना काही पदार्थ खाणे टाळा
Image Credit source: Freepik
| Updated on: Mar 02, 2023 | 3:44 PM
Share

नवी दिल्ली : लोकांच्या रोजच्या आहारात (diet) विविध प्रकारच्या पदार्थांचा समावेश केला जातो. लोक या पदार्थांमधून प्रथिने, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वे घेतात. आपण पौष्टिक आहारच खावा, असा सल्लाही डॉक्टर देतात. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही जे अन्न सकाळ, दुपार, संध्याकाळी जेवत आहात. या सगळ्याचा फायदा (benefits of food) होतो का? डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, आपण जे काही खातो, त्या प्रत्येक पदार्थाचा फायदाच होईल असे नाही. अन्नातील अनेक घटकांचा शरीरावर नकारात्मक परिणाम (negative impact of food) होतो. त्याचबरोबर असे काही पदार्थ आहेत जे तणावाची अर्थात स्ट्रेसची (stress) पातळी वाढवतात. अशावेळी पदार्थांचे काळजीपूर्वक सेवन केले पाहिजे. असे खाद्यपदार्थ कोणते त्याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

गोड पदार्थांमुळे वाढू शकतो स्ट्रेस

साखर किंवा इतर गोड पदार्थ, त्यामध्ये ग्लुकोज, सुक्रोज फ्रक्टोज आढळतात. हे सर्व शरीरातील ऊर्जा पातळी वाढवण्याचे काम करतात. रक्तातील साखरेची पातळी जास्त प्रमाणात कमी होणे किंवा काहीवेळा त्यात जास्त वाढ याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. त्यामुळे तणाव वाढतो. त्याशिवाय केक, पेस्ट्री यांसारखे पदार्थ रक्तातील साखर वाढवतात आणि त्यामुळे एनर्जी लेव्हलही वर-खाली होते. जेव्हा रक्तातील साखर अचानक कमी होते किंवा वाढते, तेव्हा तुमचा मूड खराब होतो आणि तणावाची पातळी वाढू शकते.

अधिक कॅफेनचे सेवन हानिकारक

आजकाल लोकांना हार्ड ड्रिंक्स प्यायला आवडते. अनेक एनर्जी ड्रिंक्स आहेत, ज्यामध्ये कॅफिनचे प्रमाण खूप जास्त असते. कॅफिन शरीराला सक्रिय बनवण्याचे काम करते व उर्जा वाढते. मात्र कॅफेन हे रक्तदाब वाढवण्याचे काम करते. याशिवाय लोक इतर मार्गांनी कॅफिनचे सेवन करू शकतात. पण त्याचा तोटा असा आहे की ते चिंता व स्ट्रेस वाढवण्याचे काम करते. याचा प्रभाव मज्जासंस्थेवर पडतो. तसेच आपला मेंदू आणि हृदयावरही त्याचा परिणाम दिसून येतो.

रिफाइंड कार्ब्सचा वापर

ब्रेडसारख्या पदार्थांद्वारे लोक रिफाइंड कार्ब्सचे खूप जास्त सेवन करतात. यामुळे शरीरात सूज येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे तणाव निर्माण होतो व तो वाढूही शकतो.

कृत्रिम स्वीटनर्स 

शुगर पेशंटकडे पाहून सध्या आर्टिफिशिअल स्वीटनर्सची मागणी वाढली आहे. साखरेला पर्याय म्हणून कृत्रिम स्वीटनर वापरण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. या साखरेचा शरीरातील इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम होत नाही. त्याचबरोबर या प्रकारच्या साखरेचे जास्त सेवन केल्याने शरीरात सूज येऊ शकते, जळजळही वाढू शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळेच चिंता आणि तणाव संबंधित समस्या उद्भवू शकतात.

उच्च चरबीयुक्त आहार

आजच्या जीवनशैलीत लोक स्निग्ध पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने ट्रान्स फॅटचे प्रमाण खूप जास्त असते. त्याचा परिणाम शरीराच्या सर्व अवयवांवर होतो. यामुळे सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत तणाव निर्माण होऊ शकतो व प्रसंगी तो आणखीनच वाढू शकतो.

Follow Us
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा.
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?.
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप.
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.